शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
8
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
9
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
10
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
11
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
12
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
13
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
14
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
15
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
16
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
17
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
18
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
19
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
20
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या

बंधाऱ्यात संरक्षण भिंतीचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 12:11 AM

येथून वाहणाऱ्या वैलोचना नदीपात्रात नळ योजनेच्या विहिरीच्या खालील भागात सन २०१२-१३ या वर्षात तब्बल ४० लाख रुपये खर्च करून शिवकालीन बंधारा बांधण्यात आला. मात्र बंधाºयालगत नदी काठाला संरक्षण भिंत बांधण्यात न आल्याने दरवर्षीच्या पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहामुळे नदी काठाची हानी होत आहे.

ठळक मुद्देनदीकाठाची होतेय हानी : सात वर्षांपूर्वी बांधला शिवकालीन बंधारा

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : येथून वाहणाऱ्या वैलोचना नदीपात्रात नळ योजनेच्या विहिरीच्या खालील भागात सन २०१२-१३ या वर्षात तब्बल ४० लाख रुपये खर्च करून शिवकालीन बंधारा बांधण्यात आला. मात्र बंधाºयालगत नदी काठाला संरक्षण भिंत बांधण्यात न आल्याने दरवर्षीच्या पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहामुळे नदी काठाची हानी होत आहे. सिंचन विभागाने सदर बंधाºयाला संरक्षक भिंत बांधावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन वैरागड येथील वैलोचना नदीपात्रात नळ योजनेच्या विहिरीच्या खालील भागात पाणी जिरावा, या उद्देशाने शिवकालीन बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली. मात्र या बंधाºयाचा मूळ उद्देश सफल झाला नाही. कारण नदीपात्रात समांतर बंधारा बांधला गेला असला तरी नदी काठाच्या दोन्ही बाजू खुल्या आहेत. नदीपात्रात खोलवर मुरलेले पाणी बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूने विशेषत: खालच्या बाजूने प्रवाहित होत असते. त्यामुळे या बंधाºयाचा उन्हाळ्यात नळ योजनेच्या विहिरीला उपयोग होत नाही. तसेच आजवर झालाही नाही.बंधाऱ्याच्या बाजूला संरक्षण भिंत नसल्याने नदीपात्रात मुरलेले पाणी बाजूने निघून जाते. शिवाय पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहाने देखील दरवर्षी नदीचाकाठ खचत आहे. परिणामी बंधाऱ्यालगत शेती असलेल्या शेतकºयांचे नुकसान होण्याची शक्यता बळावला आहे. त्यामुळे वैरागड येथील शिवकालीन बंधाऱ्याला संरक्षण भिंत बांधण्यात यावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे. एकूणच शिवकालीन बंधाऱ्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.कढोलीच्या बंधाऱ्याची पुनरावृत्ती होऊ नयेकुरखेडा तालुक्याच्या कढोली येथे सती नदीपात्रात नळ पाणीपुरवठा योजनेची विहीर असलेल्या खालील भागात चुकीच्या पद्धतीने शिवकालीन बंधारा बांधण्यात आला. येथेही संरक्षण भिंतीअभावी नदी किनाऱ्याची फार मोठी हानी झाली. अशीच पुनरावृत्ती वैरागड येथील शिवकालीन बंधाºयांची होऊ नये, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.