शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पक्क्या रस्त्यांचा अभाव; २० गावांतील नागरिकांचा सुरू आहे खडतर प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 13:46 IST

रेगुंठा परिसर : प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क रेगुंठा : सिरोंचा तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या रेगुंठा परिसरातील तब्बल २० गावांमध्ये अद्यापही पक्के रस्ते नाहीत. ग्रामसडक योजनेचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र आहे. शासनाच्या उदासीन धोरणामुळे या परिसरातील, गावांतील नागरिकांना खडतर प्रवास करावा लागत आहे. मात्र, याकडे शासन व प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप नागरिकांचा आहे.

सिरोंचा तालुका मुख्यालयापासून ७० किमी अंतरावर रेगुंठा हे गाव आहे. या परिसरात अद्यापही पक्क्या रस्त्यांची प्रतीक्षा आहे. परिसरातील नागरिकांना शासकीय कामांसह इतर कामांसाठी अनेकदा तालुका मुख्यालयी जावे लागते. मात्र, पक्क्या रस्त्यांअभावी नागरिकांना त्रासदायक प्रवास करावा लागतो. पर्सेवाडा बेज्जूरपल्ली मार्गाने जीव धोक्यात घालून पहाडीवरून कच्च्या रस्त्याने प्रवास करावा लागत आहे. पर्सेवाडा- बेज्जूरपल्ली हा मार्ग सिरोंचा व अहेरी या दोन्ही तालुक्यांना जोडतो. येथून वाहनांची नेहमीच वर्दळ असते. विशेष म्हणजे, रेगुंठा परिसरांतर्गत रेगुंठा, कोटापल्ली, कोत्तूर, नारसिंहापल्ली, मुलदिम्या, मोयाबीनपेठा, बोकाटगुडम, दर्सेवाडा, पिरमडा, येल्ला, पर्सेवाडा, चिक्याला आदींसह एकूण २० गावांचा समावेश आहे. या परिसरातील गावांची लोकसंख्या १५ ते १८ हजारांच्या आसपास आहे. सदर गावांतील नागरिकांना विविध कामांसाठी सिरोंचा तालुका मुख्यालय गाठावे लागते. मात्र पक्क्या रस्त्यांअभावी त्यांची वाट खडतर बनली आहे. 

बसफेरीही बंद 

  • रेगुंठा परिसरात पक्के रस्ते नसल्याने या भागातील बसफेरी बंद आहे. बसफेरीअभावी नागरिकांना खासगी वाहनांचा आश्रय घ्यावा लागतो. हा प्रवास बारमाही सुरू आहे. आणखी किती दिवस हा प्रवास सुरू राहणार, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. 
  • रेगुंठा परिसरातील अनेक नागरिक दररोज विविध कामानिमित्त तालुका मुख्यालय सिरोंचा व अहेरी येथे येतात. त्यांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो.
टॅग्स :road transportरस्ते वाहतूकGadchiroliगडचिरोली