शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

पक्क्या रस्त्यांचा अभाव; २० गावांतील नागरिकांचा सुरू आहे खडतर प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 13:46 IST

रेगुंठा परिसर : प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क रेगुंठा : सिरोंचा तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या रेगुंठा परिसरातील तब्बल २० गावांमध्ये अद्यापही पक्के रस्ते नाहीत. ग्रामसडक योजनेचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र आहे. शासनाच्या उदासीन धोरणामुळे या परिसरातील, गावांतील नागरिकांना खडतर प्रवास करावा लागत आहे. मात्र, याकडे शासन व प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप नागरिकांचा आहे.

सिरोंचा तालुका मुख्यालयापासून ७० किमी अंतरावर रेगुंठा हे गाव आहे. या परिसरात अद्यापही पक्क्या रस्त्यांची प्रतीक्षा आहे. परिसरातील नागरिकांना शासकीय कामांसह इतर कामांसाठी अनेकदा तालुका मुख्यालयी जावे लागते. मात्र, पक्क्या रस्त्यांअभावी नागरिकांना त्रासदायक प्रवास करावा लागतो. पर्सेवाडा बेज्जूरपल्ली मार्गाने जीव धोक्यात घालून पहाडीवरून कच्च्या रस्त्याने प्रवास करावा लागत आहे. पर्सेवाडा- बेज्जूरपल्ली हा मार्ग सिरोंचा व अहेरी या दोन्ही तालुक्यांना जोडतो. येथून वाहनांची नेहमीच वर्दळ असते. विशेष म्हणजे, रेगुंठा परिसरांतर्गत रेगुंठा, कोटापल्ली, कोत्तूर, नारसिंहापल्ली, मुलदिम्या, मोयाबीनपेठा, बोकाटगुडम, दर्सेवाडा, पिरमडा, येल्ला, पर्सेवाडा, चिक्याला आदींसह एकूण २० गावांचा समावेश आहे. या परिसरातील गावांची लोकसंख्या १५ ते १८ हजारांच्या आसपास आहे. सदर गावांतील नागरिकांना विविध कामांसाठी सिरोंचा तालुका मुख्यालय गाठावे लागते. मात्र पक्क्या रस्त्यांअभावी त्यांची वाट खडतर बनली आहे. 

बसफेरीही बंद 

  • रेगुंठा परिसरात पक्के रस्ते नसल्याने या भागातील बसफेरी बंद आहे. बसफेरीअभावी नागरिकांना खासगी वाहनांचा आश्रय घ्यावा लागतो. हा प्रवास बारमाही सुरू आहे. आणखी किती दिवस हा प्रवास सुरू राहणार, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. 
  • रेगुंठा परिसरातील अनेक नागरिक दररोज विविध कामानिमित्त तालुका मुख्यालय सिरोंचा व अहेरी येथे येतात. त्यांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो.
टॅग्स :road transportरस्ते वाहतूकGadchiroliगडचिरोली