शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

डाेळ्यांचे पारणे फिटणाऱ्या साेमनूर संगमावर सुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:08 IST

अंकीसा : महाराष्ट्र, छत्तीसगड व तेलंगणा या तीन राज्यांच्या सीमेवर असलेले साेमनूर संगमाचे निसर्ग साैंदर्य डाेळ्याचे पारणे फिटणारे आहे. ...

अंकीसा : महाराष्ट्र, छत्तीसगड व तेलंगणा या तीन राज्यांच्या सीमेवर असलेले साेमनूर संगमाचे निसर्ग साैंदर्य डाेळ्याचे पारणे फिटणारे आहे. या ठिकाणचे निसर्ग साैंदर्य पाहण्यासाठी तिन्ही राज्यातील पर्यटक येतात. या ठिकाणी बससह सुविधा पुरविल्यास पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत हाेईल. मात्र याकडे शासनाचे दुर्लक्ष हाेत आहे.

सिरोंचा तालुक्यातील साेमनूर येथे गोदावरी व इंद्रावती या दाेन नद्यांचा संगम आहे. इंद्रावती नदी महाराष्ट्र व छत्तीसगड राज्याची दुभाजक आहे. तर गाेदावरी नदी तेलंगणा व महाराष्ट्र राज्याची दुभाजक आहे. त्यामुळे या ठिकाणी तीनही राज्यातील पर्यटक व शालेय विद्यार्थी येतात. दाेन नद्यांचा विस्तीर्ण संगम, साेबत बाजूला माेठमाेठी पहाडी आहे. या पहाडांवर घनदाट जंगल आहे. पाण्याचा खळखळणारा आवाज कित्येक दूर अंतरावर ऐकायला येतो. निसर्ग साैंदर्याने नटलेला सोमनूर संगम विकासापासून वंचित राहिलेला आहे. या ठिकाणी जाण्यासाठी बस उपलब्ध होत नसल्याने पर्यटकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. खासगी वाहनांच्या सहायाने प्रवास करावा लागत आहे. महाशिवरात्रीनिमित्त महादेवाची यात्रा भरते. यात्रेनिमित्त या ठिकाणी माेठ्या प्रमाणात नागरिक येतात. या ठिकाणी बससह इतर सुविधा निर्माण झाल्यास पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत हाेईल. या ठिकाणी काही वेळ थांबण्यासाठी किंवा विश्रांती घेण्यासाठी इमारतीची आवश्यकता आहे.

पर्यटकांना बसची प्रतीक्षा

सोमनूर संगम येथे महाशिवरात्रीच्या दरम्यान यात्रा भरण्यात येते. या एकच दिवशी एसटी परिवहन मंडळाच्या वतीने बस सुरू केली जाते; मात्र इतरवेळी बससुविधा राहत नाही. आसरअल्ली ते सोमनूर संगम पर्यंतच्या रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. रस्त्यावर पूर्णपणे खड्डे निर्माण झाले आहेत. काही ठिकाणी डांबर उकळून गेले आहे.याचा मोठा त्रास पर्यटकांना होत आहे. रस्त्याची डागडुजी करावी अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.