शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
4
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
5
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
6
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
7
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
8
"सेटवर ते मस्ती करायचे पण मी...", अशोक सराफ यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा
9
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
10
आमिर खानच्या घरी पोहचले २५ आयपीएस अधिकारी, चाहते पडले चिंतेत, म्हणाले - "रेड पडली आहे का?"
11
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
12
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
13
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
14
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
15
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
16
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
17
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
18
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
19
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
20
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले

वीज जोडणी व पाईप पुरवठ्याचा अभाव; शेतकरी हवालदिल

By admin | Updated: September 10, 2015 01:30 IST

आरमोरी कृषी विभागामार्फत तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना अनुदानावर मोटारपंप पुरविण्यात आले. मात्र विद्युत जोडणी करण्यात आली नाही.

कृषी व विद्युत विभागाचा भोंगळ कारभार : शेती सिंचनाचा प्रश्न ऐरणीवरजोगीसाखरा/मार्र्कंडादेव : आरमोरी कृषी विभागामार्फत तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना अनुदानावर मोटारपंप पुरविण्यात आले. मात्र विद्युत जोडणी करण्यात आली नाही. तसेच चामोर्शी तालुक्यात योजनेंतर्गत कृषी विभागाने शेतकऱ्यांना मोटारपंप दिले. मात्र पाईपचा पुरवठा केला नाही. तसेच महावितरणच्या वतीने वीज जोडणी करण्यात आली नाही. त्यामुळे शेती सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला असून कृषी व विद्युत विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.आरमोरी तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये सिंचन विहिरी खोदल्या आहेत. कृषी विभागाच्या वतीने विहीर व पाण्याचे स्त्रोत असलेल्या शेतकऱ्यांना अनुदानावर कृषिपंप पुरविण्यात आले. काही शेतकऱ्यांनी बचतगटांकडून कर्ज घेऊन पैशाची जुडवाजुडव केली व त्यानंतर महावितरणकडे वीज जोडणीसाठी डिमांडची रक्कम भरली. मात्र महावितरणच्या वतीने अद्यापही कृषिपंपाना वीज जोडणी देण्यात आली नाही. अत्यल्प पाऊस असल्यामुळे रोवणी झालेले धानपीक वाचवायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.चामोर्शी तालुक्यात अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून मोटारपंपचा पुरवठा करण्यात आला. मात्र यासाठी लागणारे पाईपचा पुरवठा करण्यात आला नाही. तसेच कृषिपंपाना वीज जोडणी देण्यात आली नाही. त्यामुळे पाण्याचे स्त्रोत उपलब्ध असूनही वीज जोडणी व पाईपअभावी शेतकऱ्यांचे कृषिपंप धूळखात पडले आहे. यासंदर्भात तालुका कृषी कार्यालय चामोर्शीकडे विचारणा केली असता, आमच्या कार्यालयात पाईपचा पुरवठा झाला नाही, असे उत्तर मिळाले. एकूणच शेतकरी अडचणीत आहे. धानपीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडदरवर्षीच्या तुलनेत यंदा गडचिरोली जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाला आहे. मात्र कृषी विभागाने रोवणी व आवत्यांची खोटी टक्केवारी दिली असल्याचा आरोप अनेक शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने यंदा झालेल्या पावसाची आकडेवारी फुगवून सांगितली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. दुष्काळामुळे शेतातील धानपीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची केवीलवाणी धडपड सुरू असल्याचे दिसून येते.दुष्काळ परिस्थितीचे सर्वेक्षण करून मदत द्यायंदा निसर्गाने लहरीपणा दाखविला. सुरुवातीच्या काळात पाऊस पडल्यानंतर पावसाने कायमची उसंत घेतली. त्यामुळे शेत जमिनीतील धानपिकाचे पऱ्हे करपायला लागले. अशावेळी शेतकऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करून कृषिपंपाच्या सहाय्याने पऱ्हांना पाणीपुरवठा केला. त्यानंतर दोन ते तीन दिवस पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पुन्हा निसर्गाने डोळे वटारल्याने रोवणीचा हंगाम धोक्यात आला. नापिकीची परिस्थिती असल्यामुळे प्रशासनाने तत्काळ सर्वेक्षण करून शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.