शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

वीज जोडणी व पाईप पुरवठ्याचा अभाव; शेतकरी हवालदिल

By admin | Updated: September 10, 2015 01:30 IST

आरमोरी कृषी विभागामार्फत तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना अनुदानावर मोटारपंप पुरविण्यात आले. मात्र विद्युत जोडणी करण्यात आली नाही.

कृषी व विद्युत विभागाचा भोंगळ कारभार : शेती सिंचनाचा प्रश्न ऐरणीवरजोगीसाखरा/मार्र्कंडादेव : आरमोरी कृषी विभागामार्फत तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना अनुदानावर मोटारपंप पुरविण्यात आले. मात्र विद्युत जोडणी करण्यात आली नाही. तसेच चामोर्शी तालुक्यात योजनेंतर्गत कृषी विभागाने शेतकऱ्यांना मोटारपंप दिले. मात्र पाईपचा पुरवठा केला नाही. तसेच महावितरणच्या वतीने वीज जोडणी करण्यात आली नाही. त्यामुळे शेती सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला असून कृषी व विद्युत विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.आरमोरी तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये सिंचन विहिरी खोदल्या आहेत. कृषी विभागाच्या वतीने विहीर व पाण्याचे स्त्रोत असलेल्या शेतकऱ्यांना अनुदानावर कृषिपंप पुरविण्यात आले. काही शेतकऱ्यांनी बचतगटांकडून कर्ज घेऊन पैशाची जुडवाजुडव केली व त्यानंतर महावितरणकडे वीज जोडणीसाठी डिमांडची रक्कम भरली. मात्र महावितरणच्या वतीने अद्यापही कृषिपंपाना वीज जोडणी देण्यात आली नाही. अत्यल्प पाऊस असल्यामुळे रोवणी झालेले धानपीक वाचवायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.चामोर्शी तालुक्यात अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून मोटारपंपचा पुरवठा करण्यात आला. मात्र यासाठी लागणारे पाईपचा पुरवठा करण्यात आला नाही. तसेच कृषिपंपाना वीज जोडणी देण्यात आली नाही. त्यामुळे पाण्याचे स्त्रोत उपलब्ध असूनही वीज जोडणी व पाईपअभावी शेतकऱ्यांचे कृषिपंप धूळखात पडले आहे. यासंदर्भात तालुका कृषी कार्यालय चामोर्शीकडे विचारणा केली असता, आमच्या कार्यालयात पाईपचा पुरवठा झाला नाही, असे उत्तर मिळाले. एकूणच शेतकरी अडचणीत आहे. धानपीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडदरवर्षीच्या तुलनेत यंदा गडचिरोली जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाला आहे. मात्र कृषी विभागाने रोवणी व आवत्यांची खोटी टक्केवारी दिली असल्याचा आरोप अनेक शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने यंदा झालेल्या पावसाची आकडेवारी फुगवून सांगितली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. दुष्काळामुळे शेतातील धानपीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची केवीलवाणी धडपड सुरू असल्याचे दिसून येते.दुष्काळ परिस्थितीचे सर्वेक्षण करून मदत द्यायंदा निसर्गाने लहरीपणा दाखविला. सुरुवातीच्या काळात पाऊस पडल्यानंतर पावसाने कायमची उसंत घेतली. त्यामुळे शेत जमिनीतील धानपिकाचे पऱ्हे करपायला लागले. अशावेळी शेतकऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करून कृषिपंपाच्या सहाय्याने पऱ्हांना पाणीपुरवठा केला. त्यानंतर दोन ते तीन दिवस पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पुन्हा निसर्गाने डोळे वटारल्याने रोवणीचा हंगाम धोक्यात आला. नापिकीची परिस्थिती असल्यामुळे प्रशासनाने तत्काळ सर्वेक्षण करून शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.