शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

बसफेरीअभावी पायपीट कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 5:00 AM

खराब रस्त्याचे कारण दाखवून या मार्गावरील बसफेरी बंद करण्यात आली, तेव्हापासून अद्यापही व्यंकटापूर-आवलमरी-रेगुंठा बसफेरी सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. या मार्गे बसफेरी सुरू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

ठळक मुद्देआवलमरी परिसरातील नागरिक संतप्त : बसफेरी सुरू न केल्यास आंदोलन करणार

मुन्ना कांबळे।लोकमत न्यूज नेटवर्कव्यंकटापूर : अहेरी तालुक्याच्या व्यंकटापूर परिसरात अनेक गावे आहेत. या गावांमध्ये बसफेरी काही वर्षांपर्यत सुरू होती; परंतु खराब रस्त्याचे कारण दाखवून या मार्गावरील बसफेरी बंद करण्यात आली, तेव्हापासून अद्यापही व्यंकटापूर-आवलमरी-रेगुंठा बसफेरी सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. या मार्गे बसफेरी सुरू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.अहेरी-व्यंकटापूर-आवलमारी-रेगुंठा बस सेवा काही वर्षांपूर्वी सुरळीत चालू होती. मात्र सदर मार्गावरील रस्ता पेद्दावट्रा- रेगुंठापर्यंतचा रस्ता अत्यंत खराब असल्याचे कारण दाखवून या मार्गावरील बसफेरी बंद करण्यात आली. सध्या या मार्गाचे खडीकरण, डांबरीकरण झाले आहे. रस्ता सुस्थितीत आहे. पक्का रस्ता तयार झाल्याने रहदारीही वाढली आहे. त्यामुळे या मार्गावरील बसफेरी सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून वारंवार केली जात आहे.विशेष म्हणजे, आगर व्यवस्थापकांना निवेदन देऊन बस सेवाफेरी सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. एवढेच नव्हे तर बसफेरी सुरू करण्याच्या मागणीचा ठराव ग्रामस्थांनी ग्रामसभेत मंजूर करून तो आगर व्यवस्थापकांना पाठविला. परंतु अद्यापही बसफेरी सुरू झाली नाही. दुर्गम भागातील नागरिकांना सेवा उपलब्ध करून देण्याकडे आगार प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप नागरिकांकडून होत आहे. व्यंकटापूर, आवलमरी, रेगुंठा परिसरात बसफेरी सुरू न केल्यास चक्काजाम आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन या मार्गे बसफेरी सुरू करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.रूग्णांच्याही हालअपेष्टाव्यंकटापूर व रेगुंठा भागात वाहतुकीची कोणतीही साधने उपलब्ध नाहीत. या परिसरातील नागरिकांना पायी तसेच खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. अनेकदा नागरिक पायी अहेरीपर्यंत पायवाटेने जंगलातून येतात. पावसाळ्यात या भागातील नागरिकांना प्रचंड त्रास होतो. त्यांना साधने उपलब्ध होत नाही. रुग्णांनासुद्धा वेळीच साधने मिळत नाही. त्यामुळे त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. प्रसंगी वाटेतच रुग्ण दगावल्याच्या घटना या भागात घडल्या आहेत. व्येंकटापूर, आवलमारी, रेगुंठा या परिसरात बस सेवा सुरू झाल्यास परिसरातील नागरिकांसाठी सोय होईल. जंगलातून तसेच पायवाटेने नागरिक ये-जा करतात, तेही थांबण्यास मदत होईल.