शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

केंद्रावर बारदान्याचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 01:18 IST

आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी संस्थांमार्फत घोट परिसरात अनेक ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. महामंडळाच्या वतीने सुरुवातील या केंद्रांवर अल्प प्रमाणात बारदान्याचा पुरवठा करण्यात आला.

ठळक मुद्देशेतकरी अडचणीत : महामंडळाकडून महिनाभरापासून पुरवठा नाही

लोकमत न्यूज नेटवर्कघोट : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी संस्थांमार्फत घोट परिसरात अनेक ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. महामंडळाच्या वतीने सुरुवातील या केंद्रांवर अल्प प्रमाणात बारदान्याचा पुरवठा करण्यात आला. मात्र हा बारदाना लवकरच संपला. त्यानंतर महामंडळाच्या वतीने केंद्रांवर बारदान्याचा पुरवठा करण्यात आला नाही. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला बारदाणाही संपण्याच्या मार्गावर आहे. परिणामी शेतकरी अडचणीत आले आहेत.ज्या शेतकºयांकडे बारदाना उपलब्ध आहे, त्याच शेतकऱ्यांचे धान महामंडळ व संस्थांच्या वतीने खरेदी केले जात आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे स्वत:चा बारदाना उपलब्ध नाही, असे शेतकरी धानविक्री प्रक्रियेत अडचणीत सापडले आहेत.धानाची विक्री करूनही एक महिना उलटला. मात्र महामंडळाच्या वतीने संबंधित शेतकऱ्यांना धानाचे चुकारे अदा करण्यात आले नाही. ३० नोव्हेंबर २०१८ पूर्वी शेतकऱ्यांचे धान चुकारे अदा करण्यात आले. मात्र त्यानंतर धानाची विक्री केलेल्या शेतकऱ्यांचे धान चुकारे प्रलंबितच आहे. घोट परिसरात गुंडापल्ली, गिलगाव, घोट, भाडभिडी, रेगडी, सोनापूर, मक्केपल्ली, अड्याळ, आमगाव, मार्र्कंडा (कं.) आदी १० धान खरेदी केंद्र आहेत. सदर १० केंद्रांवर बारदान्याचा तुटवडा आहे. मात्र या गंभीर बाबीकडे आदिवासी विकास महामंडळाचे दुर्लक्ष होत आहे.आदिवासी विकास महामंडळाने शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन घोट परिसरातील सर्वच १० केंद्रांवर बारदान्याचा पुरेशा प्रमाणात पुरवठा करावा, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे. बारदाना लवकर उपलब्ध न झाल्यास धानविक्रीअभावी शेतकऱ्यांची प्रचंड अडचण होणार आहे.शेतकऱ्यांकडून ३० हजार बारदान्याची खरेदीघोट व भाडभिडी केंद्राच्या वतीने शेतकऱ्यांकडून आतापर्यंत ३० ते ४० हजार इतका बारदाना संस्थेच्या वतीने खरेदी करण्यात आला आहे. आता शेतकऱ्यांकडेही बारदाना शिल्लक नसल्याने महामंडळाच्या केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना अडचण येत आहे. येत्या काही दिवसांत आविका संस्थांच्या केंद्रांवर बारदाना उपलब्ध न झाल्यास अनेक शेतकरी खासगी व्यापाऱ्यांकडे नेऊन आपल्या धानाची विक्री करण्याची शक्यता आहे. मात्र खासगी व्यापाऱ्याकडे रास्त भाव मिळत नाही. यात शेतकºयांची आर्थिक पिळवणूक होत असते.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी