शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
2
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
3
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
4
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
5
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
6
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
7
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
8
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
9
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
10
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
11
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
12
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष
13
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
14
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
15
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
16
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
17
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
18
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
19
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
20
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?

श्रमदानातून पुलालगतचा रस्ता बांधला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 06:00 IST

मात्र गावकऱ्यांनी तयार केलेला रस्ता पावसाळ्यापर्यंतच राहणार आहे. पावसाळ्यामध्ये नदीला पाणी आल्यानंतर सदर मार्ग नदीत वाहून जाते. या पुलाची ही दरवर्षीची समस्या बनली आहे. त्यामुळे पुलाचा विस्तार करणे आवश्यक आहे. मुख्य मार्गापासून राजोलीपर्यंतचा मार्ग मार्च २०१८ मध्ये बांधण्यात आला होता. या मार्गाची देखभाल व दुरूस्ती करण्याची जबाबदारी २०२३ पर्यंत संबंधित ठेकेदाराची आहे.

ठळक मुद्देराजोलीवासीयांचा पुढाकार : दरवर्षी पावसाळ्यात वाहून जातो रस्ता; कायमस्वरूपी समस्या सोडवा

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : तालुक्यातील राजोली नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाजवळचा रस्ता वाहून गेला. नागरिकांनी श्रमदानातून पुलापर्यंत रस्ता बांधला.राजोली गावाला जाताना पडत असलेल्या नदीवर नागरिकांच्या मागणीनंतर शासनाने पूल बांधला. मात्र पुलाचे काम व्यवस्थित करण्यात आले नाही. काही दिवसांतच पुलाच्या बाजूची माती वाहून गेली. नदीचा विस्तार झाल्याने नदीच्या किनारा व पूल यांच्यामध्ये काही अंतर पडले. पुलाजवळचा भाग नदीत रूपांतर झाला आहे. त्यामुळे आता दरवर्षी पावसाळ्यात सदर पूल निकामी होते. पलिकडे जायचे असेल तर सर्वप्रथम नदीचे पाणी ओलांडावे लागते. त्यानंतर पूल येतो. मात्र उंच पुलावर चढणे अशक्य होते. पावसाळा संपल्यानंतर या मार्गावरून वाहतूक करणे शक्य होते. मात्र पुलाला जोडणारा रस्ता तयार करावा लागतो. दरवर्षीची ही समस्या आहे. प्रशासनाचे अधिकारी लक्ष देत नसल्याने गावकऱ्यांनी श्रमदानातून पुलापर्यंतचा रस्ता तयार केला. या रस्त्यावरून आता वाहतूक सुरू झाली आहे.मात्र गावकऱ्यांनी तयार केलेला रस्ता पावसाळ्यापर्यंतच राहणार आहे. पावसाळ्यामध्ये नदीला पाणी आल्यानंतर सदर मार्ग नदीत वाहून जाते. या पुलाची ही दरवर्षीची समस्या बनली आहे. त्यामुळे पुलाचा विस्तार करणे आवश्यक आहे.मुख्य मार्गापासून राजोलीपर्यंतचा मार्ग मार्च २०१८ मध्ये बांधण्यात आला होता. या मार्गाची देखभाल व दुरूस्ती करण्याची जबाबदारी २०२३ पर्यंत संबंधित ठेकेदाराची आहे. त्याकरिता निधी सुद्धा वाढवून दिला. मात्र या मार्गाची डागडुजी केली नाही. परिसरातील शेतकरी आता धान्य व इतर साहित्य धानोरा येथे आणत आहेत तसेच शालेय विद्यार्थी व इतर नागरिकांचीही या मार्गाने वर्दळ राहते.रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. डांबर पूर्णपणे उखडून गेला आहे. रस्त्यावरची गिट्टी बाहेर निघाली आहे.तालुक्यातील इतरही मार्गांची दुरवस्थायावर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील बहुतांश डांबरी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक कमालीचे त्रस्त आहेत. पावसाळा संपला असल्याने आता बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरूवात करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा या मार्गावरून वाहतूक करणे उन्हाळ्यापर्यंत अशक्य होणार आहे. गावांमधील अंतर्गत रस्त्यांचीही वाट लागली असल्याचे दिसून येते.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक