शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

श्रमदानातून पुलालगतचा रस्ता बांधला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 06:00 IST

मात्र गावकऱ्यांनी तयार केलेला रस्ता पावसाळ्यापर्यंतच राहणार आहे. पावसाळ्यामध्ये नदीला पाणी आल्यानंतर सदर मार्ग नदीत वाहून जाते. या पुलाची ही दरवर्षीची समस्या बनली आहे. त्यामुळे पुलाचा विस्तार करणे आवश्यक आहे. मुख्य मार्गापासून राजोलीपर्यंतचा मार्ग मार्च २०१८ मध्ये बांधण्यात आला होता. या मार्गाची देखभाल व दुरूस्ती करण्याची जबाबदारी २०२३ पर्यंत संबंधित ठेकेदाराची आहे.

ठळक मुद्देराजोलीवासीयांचा पुढाकार : दरवर्षी पावसाळ्यात वाहून जातो रस्ता; कायमस्वरूपी समस्या सोडवा

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : तालुक्यातील राजोली नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाजवळचा रस्ता वाहून गेला. नागरिकांनी श्रमदानातून पुलापर्यंत रस्ता बांधला.राजोली गावाला जाताना पडत असलेल्या नदीवर नागरिकांच्या मागणीनंतर शासनाने पूल बांधला. मात्र पुलाचे काम व्यवस्थित करण्यात आले नाही. काही दिवसांतच पुलाच्या बाजूची माती वाहून गेली. नदीचा विस्तार झाल्याने नदीच्या किनारा व पूल यांच्यामध्ये काही अंतर पडले. पुलाजवळचा भाग नदीत रूपांतर झाला आहे. त्यामुळे आता दरवर्षी पावसाळ्यात सदर पूल निकामी होते. पलिकडे जायचे असेल तर सर्वप्रथम नदीचे पाणी ओलांडावे लागते. त्यानंतर पूल येतो. मात्र उंच पुलावर चढणे अशक्य होते. पावसाळा संपल्यानंतर या मार्गावरून वाहतूक करणे शक्य होते. मात्र पुलाला जोडणारा रस्ता तयार करावा लागतो. दरवर्षीची ही समस्या आहे. प्रशासनाचे अधिकारी लक्ष देत नसल्याने गावकऱ्यांनी श्रमदानातून पुलापर्यंतचा रस्ता तयार केला. या रस्त्यावरून आता वाहतूक सुरू झाली आहे.मात्र गावकऱ्यांनी तयार केलेला रस्ता पावसाळ्यापर्यंतच राहणार आहे. पावसाळ्यामध्ये नदीला पाणी आल्यानंतर सदर मार्ग नदीत वाहून जाते. या पुलाची ही दरवर्षीची समस्या बनली आहे. त्यामुळे पुलाचा विस्तार करणे आवश्यक आहे.मुख्य मार्गापासून राजोलीपर्यंतचा मार्ग मार्च २०१८ मध्ये बांधण्यात आला होता. या मार्गाची देखभाल व दुरूस्ती करण्याची जबाबदारी २०२३ पर्यंत संबंधित ठेकेदाराची आहे. त्याकरिता निधी सुद्धा वाढवून दिला. मात्र या मार्गाची डागडुजी केली नाही. परिसरातील शेतकरी आता धान्य व इतर साहित्य धानोरा येथे आणत आहेत तसेच शालेय विद्यार्थी व इतर नागरिकांचीही या मार्गाने वर्दळ राहते.रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. डांबर पूर्णपणे उखडून गेला आहे. रस्त्यावरची गिट्टी बाहेर निघाली आहे.तालुक्यातील इतरही मार्गांची दुरवस्थायावर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील बहुतांश डांबरी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक कमालीचे त्रस्त आहेत. पावसाळा संपला असल्याने आता बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरूवात करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा या मार्गावरून वाहतूक करणे उन्हाळ्यापर्यंत अशक्य होणार आहे. गावांमधील अंतर्गत रस्त्यांचीही वाट लागली असल्याचे दिसून येते.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक