शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

श्रमदानातून पुलालगतचा रस्ता बांधला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 06:00 IST

मात्र गावकऱ्यांनी तयार केलेला रस्ता पावसाळ्यापर्यंतच राहणार आहे. पावसाळ्यामध्ये नदीला पाणी आल्यानंतर सदर मार्ग नदीत वाहून जाते. या पुलाची ही दरवर्षीची समस्या बनली आहे. त्यामुळे पुलाचा विस्तार करणे आवश्यक आहे. मुख्य मार्गापासून राजोलीपर्यंतचा मार्ग मार्च २०१८ मध्ये बांधण्यात आला होता. या मार्गाची देखभाल व दुरूस्ती करण्याची जबाबदारी २०२३ पर्यंत संबंधित ठेकेदाराची आहे.

ठळक मुद्देराजोलीवासीयांचा पुढाकार : दरवर्षी पावसाळ्यात वाहून जातो रस्ता; कायमस्वरूपी समस्या सोडवा

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : तालुक्यातील राजोली नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाजवळचा रस्ता वाहून गेला. नागरिकांनी श्रमदानातून पुलापर्यंत रस्ता बांधला.राजोली गावाला जाताना पडत असलेल्या नदीवर नागरिकांच्या मागणीनंतर शासनाने पूल बांधला. मात्र पुलाचे काम व्यवस्थित करण्यात आले नाही. काही दिवसांतच पुलाच्या बाजूची माती वाहून गेली. नदीचा विस्तार झाल्याने नदीच्या किनारा व पूल यांच्यामध्ये काही अंतर पडले. पुलाजवळचा भाग नदीत रूपांतर झाला आहे. त्यामुळे आता दरवर्षी पावसाळ्यात सदर पूल निकामी होते. पलिकडे जायचे असेल तर सर्वप्रथम नदीचे पाणी ओलांडावे लागते. त्यानंतर पूल येतो. मात्र उंच पुलावर चढणे अशक्य होते. पावसाळा संपल्यानंतर या मार्गावरून वाहतूक करणे शक्य होते. मात्र पुलाला जोडणारा रस्ता तयार करावा लागतो. दरवर्षीची ही समस्या आहे. प्रशासनाचे अधिकारी लक्ष देत नसल्याने गावकऱ्यांनी श्रमदानातून पुलापर्यंतचा रस्ता तयार केला. या रस्त्यावरून आता वाहतूक सुरू झाली आहे.मात्र गावकऱ्यांनी तयार केलेला रस्ता पावसाळ्यापर्यंतच राहणार आहे. पावसाळ्यामध्ये नदीला पाणी आल्यानंतर सदर मार्ग नदीत वाहून जाते. या पुलाची ही दरवर्षीची समस्या बनली आहे. त्यामुळे पुलाचा विस्तार करणे आवश्यक आहे.मुख्य मार्गापासून राजोलीपर्यंतचा मार्ग मार्च २०१८ मध्ये बांधण्यात आला होता. या मार्गाची देखभाल व दुरूस्ती करण्याची जबाबदारी २०२३ पर्यंत संबंधित ठेकेदाराची आहे. त्याकरिता निधी सुद्धा वाढवून दिला. मात्र या मार्गाची डागडुजी केली नाही. परिसरातील शेतकरी आता धान्य व इतर साहित्य धानोरा येथे आणत आहेत तसेच शालेय विद्यार्थी व इतर नागरिकांचीही या मार्गाने वर्दळ राहते.रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. डांबर पूर्णपणे उखडून गेला आहे. रस्त्यावरची गिट्टी बाहेर निघाली आहे.तालुक्यातील इतरही मार्गांची दुरवस्थायावर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील बहुतांश डांबरी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक कमालीचे त्रस्त आहेत. पावसाळा संपला असल्याने आता बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरूवात करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा या मार्गावरून वाहतूक करणे उन्हाळ्यापर्यंत अशक्य होणार आहे. गावांमधील अंतर्गत रस्त्यांचीही वाट लागली असल्याचे दिसून येते.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक