अंकिसा : सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथील मुख्य मार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. या मार्गावरून आसरअल्लीदरम्यानच्या गावातील नागरिक ये-जा करीत असल्याने या मार्गावरून वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. त्यामुळे सदर मार्गाची बांधकाम विभागाने दुरूस्ती करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
कॅम्प एरियात डासांचा प्रादुर्भाव वाढला
गडचिरोली : शहरातील कॅम्प एरियातील अनेक नाल्या तुंबल्या असल्याने परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
विज्ञान महाविद्यालयातील वसतिगृह सुरू करा
गडचिरोली : शहरातील चामोर्शी मार्गावरील शासकीय विज्ञान महाविद्यालयाच्या परिसरात वसतिगृहाची प्रशस्त इमारत बांधण्यात आली आहे. या महाविद्यालयात ग्रामीण व दुर्गम भागातील शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना भाड्याच्या खोलीत वास्तव्य करावे लागत आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी सदर वसतिगृह सुरू करावे, अशी मागणी होत आहे.
अवजड वाहनांमुळे जिल्ह्यातील रस्त्यांचे हाल
गडचिरोली : छत्तीसगड व तेलंगणा राज्यात ये-जा करणारी वाहने धानोरा-गडचिरोली-आष्टी मार्गे जातात. सदर ट्रक मोठमोठे लोखंडी साहित्य घेऊन जातात. या वाहनामुळे गडचिरोली जिल्ह्यातील मुख्य राज्य महामार्गांची दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
घोट मदत केंद्राला पोलीस ठाण्याचा दर्जा द्या
घोट : चामोर्शी तालुक्यातील घोट पोलीस मदत केंद्रात नागरिकांच्या तक्रारी न स्वीकारता चामोर्शी येथे पाठविण्यात येते. घोट येथे असलेल्या पोलीस मदत केंद्राला पोलीस ठाण्याचा दर्जा प्रदान करण्यात यावा तसेच सुभाषग्राम गावाला घोट पोलीस मदत केंद्रात समाविष्ट करून घ्यावे, अशी मागणी होत आहे.
गोगाव बस थांब्यावर गतिरोधक उभारा
गडचिरोली : गडचिरोली-आरमोरी मार्गावर भरधाव वाहतूक होत असल्याने गोगाव येथील बसथांब्यावर गतिरोधक निर्माण करावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. गतिरोधकाअभावी या ठिकाणी अनेकदा अपघात घडले आहेत.
ग्रामपंचायत संगणक योजनेचा बोजवारा
सिरोंचा : तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जनतेची कामे तत्काळ व्हावी, यासाठी शासनाने लाखो रूपये खर्च करून ग्रामपंचायतींना संगणक संच पुरविले. मात्र अनेक संगणक नादुरूस्तस्थितीत असून काही धूळ खात आहेत. परिणामी ग्रामपंचायतीच्या आॅनलाईन कामाचा बोजवारा उडाला आहे.
कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करा
आरमोरी : शहरासह तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात कचरा व्यवस्थापनाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे अनेक गावांच्या बाहेर कचºयाचे ढीग नेऊन टाकले जातात व या कचºयावर दिवसभर जनावरे पसरून राहतात. त्यामुळे येथे कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यापूर्वी अनेकदा सदर मागणी करण्यात आली. पंरतु या मागणीकडे दुर्लक्ष झाले.
चामोर्शीतील तलावाचे सौंदर्यीकरण करा
चामोर्शी : शहरालगत असलेल्या तलावाचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. चामोर्शी शहरात फिरण्यासाठी व निवांत बसण्यासाठी प्रशस्त जागा नाही, त्यामुळे शहरातील तलावाचे सौंदर्यीकरण करावे, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.
वयोवृध्दांना मिळते अनियमित मानधन
गडचिरोली : वयाचे ६५ वर्ष पूर्ण करणाºया वयोवृध्द नागरिकांना शासनाच्या योजनेतून दरमहा मानधन देण्याची योजना आहे. मात्र प्रशासकीय दिरंगाईमुळे तीन ते चार महिन्यांचे मानधन थकीत राहते. त्यामुळे वयोवृध्द नागरिकांना आर्थिक अडचण जाणवते. बºयाच वृद्धांना कुणाचा आधारही नाही. त्यामुळे वयोवृध्द लाभार्थ्यांना नियमित दरमहा मानधन अदा करण्यात यावे, अशी मागणी आहे.