शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
4
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
5
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
6
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
7
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
8
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
9
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
10
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
11
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
12
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
13
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
14
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
15
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
16
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
17
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
18
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
19
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
20
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!

आलापल्लीतील खसरा डेपो असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 01:07 IST

आलापल्ली येथील खसरा विक्री आगारात कोट्यवधी रूपयांचे सागवान, बांबू, जळाऊ बिट तसेच बांबू उपलब्ध आहे. मात्र या विक्री आगाराच्या सुरक्षेबाबत वन विभाग गंभीर असल्याचे दिसून येत नाही. सध्या नक्षलवाद्यांकडून आजुबाजुच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वन विभागाच्या डेपोची जाळपोळ सुरू आहे.

ठळक मुद्देयापूर्वी पाच ते सहा वेळा झाली जाळपोळ : कोट्यवधी रूपयाची संपती वाऱ्यावर, वनविभाग कमालीचा सुस्त

प्रशांत ठेपाले ।लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : आलापल्ली येथील खसरा विक्री आगारात कोट्यवधी रूपयांचे सागवान, बांबू, जळाऊ बिट तसेच बांबू उपलब्ध आहे. मात्र या विक्री आगाराच्या सुरक्षेबाबत वन विभाग गंभीर असल्याचे दिसून येत नाही. सध्या नक्षलवाद्यांकडून आजुबाजुच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वन विभागाच्या डेपोची जाळपोळ सुरू आहे. मात्र असे प्रकार होत असताना देखील वन विभागाने सुरक्षेच्या दृष्टीकोणातून या डेपोमध्ये कोणतीही उपाययोजना केली नाही.आलापल्ली-एटापल्ली या मुख्य मार्गावर आलापल्लीपासून अर्धा किमी अंतरावर ३५ वर्ष जुना खसरा डेपो पूर्णत: असुरक्षित आहे. महाराष्ट्रातील क्रमांक १ चा बिट विक्री डेपो म्हणून प्रसिध्द आहे. सध्या या बिटात जवळपास साग व इतर प्रकारचे मिळून ११ हजार बिट उपलब्ध आहेत. यातील सात हजार बिट सागवान व चार हजार बिट सिसमचे आहे. या डेपोत २००९ पासून बराच माल शिल्लक पडलेला दिसून येतो. यात प्रामुख्याने ४०० घन मीटर इमारती माल उपलब्ध असून यातील काही मालाची विक्री झाली. जवळपास दोन लाखापेक्षा अधिक लांब बांबू या डेपोत उपलब्ध आहे. एकदा खरेदी केलेला माल समाजकंटक अथवा विघातक कृत्यांमध्ये जळून नष्ट होत असेल तर शासनाकडून ग्राहकाला कोणतीही नुकसान भरपाई मिळण्याची शाश्वती नाही. सदर माल आगीत भस्म झाल्यास ग्राहकाला संपूर्ण मालाचे पैसे अदा करावे लागते. म्हणजे ग्राहकाचा मालही गेला व पैसेही गेले, अशी परिस्थिती होते. यापूर्वी सदर डेपोला पाच ते सहा वेळा आग लागली. यात खरेदीदारांचे व ठेकेदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. २००९ पासून अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्रातील या सर्वात मोठ्या बिट डेपोकडे लोकांनी पाठ फिरविली आहे. मागील दहा वर्षात या आगाराचे १०० कोटी रूपये रॉयल्टीचे नुकसान झाल्याची माहिती आहे. असे असले तरी सद्य:स्थितीत सदर खसरा डेपोमधून वर्षाकाठी १० कोटीचा महसूल शासनाला प्राप्त होत असतो. मात्र या डेपोच्या सुरक्षीततेकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत आहे.रात्री चौकीदारांच्या भरवशावरच डेपोसदर डेपोत एकूण १० ते १२ नियमित कर्मचारी असून याच कर्मचाºयांच्या भरवशावर ४१ हेक्टरमधील या डेपोची सुरक्षा अवलंबून आहे. रात्रपाळीला येथे तीन ते चार चौकीदार कर्तव्यावर असतात. सुरक्षेच्या दृष्टीने या डेपोत एकच लोखंडी मचान आहे. मात्र त्याला सर्च लाईटची व्यवस्था नाही. एवढ्या मोठ्या या खसरा डेपोत कुठल्याही भागात दिव्यांची व्यवस्था नाही. चौकीदारांसाठी वन प्रशासनाने टार्चचा पुरवठा केलेला नाही. येथील चौकीदार स्वत:कडीलच टार्च वापरतात. सदर डेपोमध्ये केवळ कार्यालयपुरता मर्यादीत विद्युत पुरवठा आहे. दोन हातपंप पाण्यासाठी उपलब्ध असून येथे लाकूड फाटा मोठ्या प्रमाणात असल्याने सरपटणाºया प्राण्यांचा प्रादुर्भाव आहे. प्राथमिक उपचाराची कोणतीही सोय नाही. जाळपोळ होण्याआधी येथे पुरेशी सुरक्षा व्यवस्था देण्याची मागणी आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग