शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

स्वच्छतेतून गाव निरोगी ठेवा

By admin | Updated: October 7, 2015 02:27 IST

गावात स्वच्छता ठेवणे अत्यावश्यक आहे. गावातील नागरिकांचे आरोग्य निरोगी राहिल्यास गावाचा विकास शक्य आहे.

खासदारांचे गावकऱ्यांना आवाहन : तळोधी मो. येथे ग्रामस्वच्छतेवर मार्गदर्शन कार्यक्रमतळोधी मो. : गावात स्वच्छता ठेवणे अत्यावश्यक आहे. गावातील नागरिकांचे आरोग्य निरोगी राहिल्यास गावाचा विकास शक्य आहे. त्यामुळे सर्व गावकऱ्यांनी घर, घरासभोवतालचा परिसर व संपूर्ण गावाची स्वच्छता राखावी, जेणेकरून गाव निरोगी राहील, असे आवाहन खासदार अशोक नेते यांनी गावकऱ्यांना केले. राष्ट्रीय स्वच्छता मिशन, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत चामोर्शी तालुक्यातील तळोधी मो. येथे सोमवारी आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. देवराव होळी, माजी जि.प. अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, चामोर्शीच्या पं.स. सभापती शशी चिळंगे, रमेश भुरसे, डॉ. भारत खटी, पं.स.चे माजी उपसभापती बंडू चिळंगे, ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी सुरजागडे, उपसरपंच किशोर गटकोजवार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कुनघाडकर आदी उपस्थित होते. पुढे बोलताना खासदार नेते म्हणाले, तळोधी मो. गावाच्या विकासासाठी आपण कटीबध्द आहोत. गावकऱ्यांनी एकत्र येऊन गावात विकासासाठी पुढाकार घ्यावा, गावकऱ्यांना संपूर्ण सहकार्य करण्यात येईल. असे अभिवचनही खासदार नेते यांनी यावेळी दिले. याप्रसंगी आमदार डॉ. देवराव होळी, रवींद्र ओल्लालवार यांनी गावाच्या विकासासंदर्भात मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच माधुरी सुरजागडे, संचालन ग्राम विकास अधिकारी देवानंद फुलझेले यांनी केले तर आभार विनायक कुनघाडकर यांनी मानले. (वार्ताहर)