शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

काेरची तालुक्यातील रस्त्यांवरून प्रवास झाला अवघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:27 IST

मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे व जड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्ता पूर्णत: खराब झाला आहे, तसेच बोरी, झगडवाही, गाहाणेगटा, बेतकाठी, टेकाबेदळ, ...

मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे व जड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्ता पूर्णत: खराब झाला आहे, तसेच बोरी, झगडवाही, गाहाणेगटा, बेतकाठी, टेकाबेदळ, मांजुखडका अल्लीटोला, बोटेकसाकडून जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना त्रास होत आहे; परंतु रस्ता दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

चौकातील सभागृहाची दुरवस्था

गडचिराेली : शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेले इंदिरा गांधी चाैकालगत राजीव गांधी सभागृह आहे. या सभागृहात विविध राजकीय पक्ष संघटना व प्रशासनाच्या वतीने बरेच कार्यक्रम वर्षभर घेतले जातात. मात्र, या राजीव गांधी सभागृहाच्या परिसरात प्रचंड अस्वच्छता पसरली आहे. बऱ्याच नागरिकांनी येथे स्वच्छतागृहारासारखा या सभागृहाचा वापर सुरू केला आहे. सायंकाळच्या वेळेस काही मद्यपी आपला मद्य प्राशनाचा कार्यक्रम आटाेपून घेतात.

मध संकलनातून राेजगारनिर्मिती शक्य

काेरची : जिल्ह्यात मध संकलनाला चांगला वाव आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना मध संकलनाचे प्रशिक्षण दिल्यास चांगल्या दर्जाचे मध संकलन होण्यास मदत होईल. त्यामुळे मध संकलनाचे प्रशिक्षण देण्याची मागणी केली जात आहे. तालुक्यात माेठ्या प्रमाणात जंगल आहे. यातून सहज मध उपलब्ध हाेऊ शकते. यासाठी मध संकलनाचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे.

मिरकलमध्ये खांब लावले; मात्र विजेचा पत्ता नाही

अहेरी : तालुका मुख्यालयापासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या मिरकल गावाला जाण्यासाठी रस्ता नाही. प्रधानमंत्री ग्रामसडक याेजनेंतर्गतही या गावाला रस्ता बांधून देण्यात आला नाही. त्यामुळे जंगलातून जाणाऱ्या पायवाटेने हे गाव गाठावे लागते. विजेचे खांब लावले. मात्र वीज पाेहाेचली नाही. वीजपुरवठा करण्याची मागणी हाेत आहे.

मातीचे बंधारे बांधण्याची मागणी

सिराेंचा : वनविभागातर्फे दोन वर्षांपूर्वी जंगलातील सहा स्थानांवर मातीचे बांध बांधण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता; परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सदर प्रस्ताव अजूनही धूळखात पडला आहे. मातीचे बंधारे निर्माण झाल्यास सिंचनाची सोय होईल.

कचरा व्यवस्थापनाकडे हाेत आहे दुर्लक्ष

आरमोरी : शहरासह तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात कचरा व्यवस्थापनाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे अनेक गावांच्या बाहेर कचऱ्याचे ढीग नेऊन टाकले जातात व या कचऱ्यावर दिवसभर जनावरे भटकत असतात. त्यामुळे येथे कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करावा, अशी मागणी होत आहे.