शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

काेरची तालुक्यातील रस्त्यांवरून प्रवास झाला अवघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:27 IST

मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे व जड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्ता पूर्णत: खराब झाला आहे, तसेच बोरी, झगडवाही, गाहाणेगटा, बेतकाठी, टेकाबेदळ, ...

मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे व जड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्ता पूर्णत: खराब झाला आहे, तसेच बोरी, झगडवाही, गाहाणेगटा, बेतकाठी, टेकाबेदळ, मांजुखडका अल्लीटोला, बोटेकसाकडून जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना त्रास होत आहे; परंतु रस्ता दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

चौकातील सभागृहाची दुरवस्था

गडचिराेली : शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेले इंदिरा गांधी चाैकालगत राजीव गांधी सभागृह आहे. या सभागृहात विविध राजकीय पक्ष संघटना व प्रशासनाच्या वतीने बरेच कार्यक्रम वर्षभर घेतले जातात. मात्र, या राजीव गांधी सभागृहाच्या परिसरात प्रचंड अस्वच्छता पसरली आहे. बऱ्याच नागरिकांनी येथे स्वच्छतागृहारासारखा या सभागृहाचा वापर सुरू केला आहे. सायंकाळच्या वेळेस काही मद्यपी आपला मद्य प्राशनाचा कार्यक्रम आटाेपून घेतात.

मध संकलनातून राेजगारनिर्मिती शक्य

काेरची : जिल्ह्यात मध संकलनाला चांगला वाव आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना मध संकलनाचे प्रशिक्षण दिल्यास चांगल्या दर्जाचे मध संकलन होण्यास मदत होईल. त्यामुळे मध संकलनाचे प्रशिक्षण देण्याची मागणी केली जात आहे. तालुक्यात माेठ्या प्रमाणात जंगल आहे. यातून सहज मध उपलब्ध हाेऊ शकते. यासाठी मध संकलनाचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे.

मिरकलमध्ये खांब लावले; मात्र विजेचा पत्ता नाही

अहेरी : तालुका मुख्यालयापासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या मिरकल गावाला जाण्यासाठी रस्ता नाही. प्रधानमंत्री ग्रामसडक याेजनेंतर्गतही या गावाला रस्ता बांधून देण्यात आला नाही. त्यामुळे जंगलातून जाणाऱ्या पायवाटेने हे गाव गाठावे लागते. विजेचे खांब लावले. मात्र वीज पाेहाेचली नाही. वीजपुरवठा करण्याची मागणी हाेत आहे.

मातीचे बंधारे बांधण्याची मागणी

सिराेंचा : वनविभागातर्फे दोन वर्षांपूर्वी जंगलातील सहा स्थानांवर मातीचे बांध बांधण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता; परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सदर प्रस्ताव अजूनही धूळखात पडला आहे. मातीचे बंधारे निर्माण झाल्यास सिंचनाची सोय होईल.

कचरा व्यवस्थापनाकडे हाेत आहे दुर्लक्ष

आरमोरी : शहरासह तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात कचरा व्यवस्थापनाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे अनेक गावांच्या बाहेर कचऱ्याचे ढीग नेऊन टाकले जातात व या कचऱ्यावर दिवसभर जनावरे भटकत असतात. त्यामुळे येथे कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करावा, अशी मागणी होत आहे.