शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
2
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
3
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
4
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
5
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
6
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
7
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
8
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
9
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
10
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
11
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
12
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
13
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
14
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
16
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
17
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
18
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
19
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
20
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट

काेरची तालुक्यातील रस्त्यांवरून प्रवास झाला अवघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:27 IST

मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे व जड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्ता पूर्णत: खराब झाला आहे, तसेच बोरी, झगडवाही, गाहाणेगटा, बेतकाठी, टेकाबेदळ, ...

मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे व जड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्ता पूर्णत: खराब झाला आहे, तसेच बोरी, झगडवाही, गाहाणेगटा, बेतकाठी, टेकाबेदळ, मांजुखडका अल्लीटोला, बोटेकसाकडून जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना त्रास होत आहे; परंतु रस्ता दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

चौकातील सभागृहाची दुरवस्था

गडचिराेली : शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेले इंदिरा गांधी चाैकालगत राजीव गांधी सभागृह आहे. या सभागृहात विविध राजकीय पक्ष संघटना व प्रशासनाच्या वतीने बरेच कार्यक्रम वर्षभर घेतले जातात. मात्र, या राजीव गांधी सभागृहाच्या परिसरात प्रचंड अस्वच्छता पसरली आहे. बऱ्याच नागरिकांनी येथे स्वच्छतागृहारासारखा या सभागृहाचा वापर सुरू केला आहे. सायंकाळच्या वेळेस काही मद्यपी आपला मद्य प्राशनाचा कार्यक्रम आटाेपून घेतात.

मध संकलनातून राेजगारनिर्मिती शक्य

काेरची : जिल्ह्यात मध संकलनाला चांगला वाव आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना मध संकलनाचे प्रशिक्षण दिल्यास चांगल्या दर्जाचे मध संकलन होण्यास मदत होईल. त्यामुळे मध संकलनाचे प्रशिक्षण देण्याची मागणी केली जात आहे. तालुक्यात माेठ्या प्रमाणात जंगल आहे. यातून सहज मध उपलब्ध हाेऊ शकते. यासाठी मध संकलनाचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे.

मिरकलमध्ये खांब लावले; मात्र विजेचा पत्ता नाही

अहेरी : तालुका मुख्यालयापासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या मिरकल गावाला जाण्यासाठी रस्ता नाही. प्रधानमंत्री ग्रामसडक याेजनेंतर्गतही या गावाला रस्ता बांधून देण्यात आला नाही. त्यामुळे जंगलातून जाणाऱ्या पायवाटेने हे गाव गाठावे लागते. विजेचे खांब लावले. मात्र वीज पाेहाेचली नाही. वीजपुरवठा करण्याची मागणी हाेत आहे.

मातीचे बंधारे बांधण्याची मागणी

सिराेंचा : वनविभागातर्फे दोन वर्षांपूर्वी जंगलातील सहा स्थानांवर मातीचे बांध बांधण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता; परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सदर प्रस्ताव अजूनही धूळखात पडला आहे. मातीचे बंधारे निर्माण झाल्यास सिंचनाची सोय होईल.

कचरा व्यवस्थापनाकडे हाेत आहे दुर्लक्ष

आरमोरी : शहरासह तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात कचरा व्यवस्थापनाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे अनेक गावांच्या बाहेर कचऱ्याचे ढीग नेऊन टाकले जातात व या कचऱ्यावर दिवसभर जनावरे भटकत असतात. त्यामुळे येथे कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करावा, अशी मागणी होत आहे.