शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

हे नदीवरचे पूल की मृत्यूचे सापळे? गडचिरोली जिल्ह्यातील वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 13:47 IST

Gadchiroli News हे नदीवरचे पूल की मृत्यूचे सापळे? गडचिरोली जिल्ह्यातील वास्तव

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आरमोरी-ब्रम्हपुरी मार्गावरील वैनगंगा नदीवरील पुलाचे कठडे वाहून गेले आहेत. कठड्यांअभावी एखादे वाहने नदीत कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. आरमोरी-ब्रम्हपुरी मार्गावरून जिल्हाभरातील नागरिक नागपूर येथे जातात. त्यामुळे या मार्गावरून रात्रंदिवस वाहनांची वर्दळ राहते. नदीवरील पूल अतिशय जुना आहे. त्यामुळे या पुलावर सिमेंटचे कठडे बांधण्यात आले नाहीत. परिणामी लोखंडी कठडे उभारावे लागतात. यावर्षी वैनगंगा नदीला पूर आला. पुराचे पाणी पुलावर चढल्याने अनेक लोखंडी कठडे वाहून गेले. तर काही कठडे वाकले आहेत. कठडे नसल्याने एखादे वाहन पुलावरून नदीत कोसळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच एक युवक नदीत कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला. पुन्हा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मकर संक्रांतीच्या निमित्ताने आरमोरी शहरातील शेकडो नागरिक पवित्र स्नानासाठी वैनगंगा नदीवर एकत्र येतात. अशावेळी अनुचित प्रकार घडू शकते. त्यामुळे बांधकाम विभागाने कठडे उभारावे, अशी मागणी युवारंग संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.काही कठडे वाकलेअनेक वर्षांच्या कालावधीनंतर वैनगंगा नदीवर पुलाचे पाणी चढले. पुराच्या पाण्यामुळे काही कठडे तुटून पुराच्या पाण्यासोबत वाहून गेले. तर काही कठडे वाकले आहेत. त्यांची दुरूस्ती करण्याची गरज आहे. वैनगंगा नदीवरील पूल उंच आहे. दोन जिल्ह्यांना जोडणारा पूल असल्याने या पुलावरून वाहनांची दिवसरात्र वर्दळ राहते. त्यामुळे कठडे व्यवस्थित असणे आवश्यक आहे.

टॅग्स :riverनदी