शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

वैफल्यग्रस्त बेरोजगार युवकांसाठी जिल्ह्यात लोहप्रकल्प आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:43 IST

या जिल्ह्यात शेतीशिवाय दुसरे उत्पन्नाचे साधन नाही. तेंदुपत्ता हंगाम हा काही दिवसांपुरता मर्यादित असतो. यामुळे सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढली ...

या जिल्ह्यात शेतीशिवाय दुसरे उत्पन्नाचे साधन नाही. तेंदुपत्ता हंगाम हा काही दिवसांपुरता मर्यादित असतो. यामुळे सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढली आहे. रोजगार नसल्यामुळे ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांना सुरजागड लोहप्रकल्पामुळे रोजगाराची संधी चालून आली आहे. लॉयड्स मेटल्सने कोनसरी येथील लोहप्रकल्प लवकरात लवकर उभारावा आणि त्यात स्थानिक लोकांनाच रोजगाराची संधी द्यावी, अशी अपेक्षा धर्मरावबाबांनी व्यक्त केली.

पत्रपरिषदेला माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम-हलगेकर, श्रीनिवास गोडशेलवार, लीलाधर भरडकर, सुरेंद्र अलोने आदी राकाँचे पदाधिकारी उपस्थित होते.

(बॉक्स)

राज्य सरकारला मोठा महसूल

सुरजागड लोहखाणीतून जवळपास ३० लाख मे.टन लोहदगड काढले जाईल. त्यापैकी ५ लाख मे.टन घुग्गुसच्या कारखान्यात जाईल, तर उर्वरित २५ लाख मे.टन कोनसरीसह इतर ठिकाणच्या लोहप्रकल्पांमध्ये प्रक्रिया करण्यासाठी जाईल. यातून राज्य सरकारला वार्षिक ५१६ कोटी रुपयांचा महसूल आणि १६० कोटींची रॉयल्टी मिळेल. याशिवाय कंपनीच्या सीएसआर फंडातून एटापल्ली, अहेरी तालुक्यात मोठी विकासात्मक कामे होतील, असा विश्वास धर्मरावबाबांनी व्यक्त केला.

(बॉक्स)

ओरिसातील आदिवासींचा आर्थिक उदय, मग माझ्या जिल्ह्यात का नाही?

यावेळी धर्मरावबाबा म्हणाले, ज्या त्रिवेणी अर्थमूव्हर्स कंपनीला लॉयड्स मेटल्सने हा कंत्राट दिला. त्या कंपनीकडे ओरिसात सुरजागडसारख्या ११ खाणींचे काम आहे. त्या सर्व खाणी आदिवासी भागात आहेत. आज तेथील सर्व आदिवासींच्या झोपड्यांचे रूपांतर स्लॅबच्या घरात झाले. त्यांच्याकडे गाड्या-घोड्या येऊन आर्थिक उदय झाला. मग माझ्या जिल्ह्यातील आदिवासींनी तसेच राहायचे का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

(बॉक्स)

आदिवासींचे दैवत नष्ट होणार हा अपप्रचार

लोहखाणीमुळे सुरजागड पहाडावरील आदिवासींचे दैवत, परंपरा, संस्कृती नष्ट होईल, असा अपप्रचार काही लोकांनी सुरू केला; पण तसे काहीही होणार नाही. लोहखाणीसाठी दिलेली जागा पूजास्थळापासून बरीच दूर आहे. मीसुद्धा आदिवासी असून माझ्यासाठीही ते श्रद्धास्थान आहे. माझे श्रद्धास्थान उद्ध्वस्त होणार असते तर मी स्वस्थ बसलो नसतो, असेही धर्मरावबाबांनी

यावेळी स्पष्ट केले. युवकांच्या हाताला काम मिळाल्यास आदिवासी समाज आर्थिकदृष्ट्या भक्कम होऊन संस्कृती, परंपरा टिकविण्यास अजून वाव मिळेल, असे ते म्हणाले.