शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

अहेरीत जंतूयुक्त पाणीपुरवठा

By admin | Updated: July 11, 2015 02:28 IST

मागील आठ दिवसांपासून शहरातील काही भागांमध्ये जंतुयुक्त व दूषित पाण्याचा पुरवठा केला जात असल्याने विविध प्रकारचे आजार होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

अहेरी : मागील आठ दिवसांपासून शहरातील काही भागांमध्ये जंतुयुक्त व दूषित पाण्याचा पुरवठा केला जात असल्याने विविध प्रकारचे आजार होण्याचा धोका निर्माण झाला आहे. दूषित व जंतूयुक्त पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.अहेरी शहराला नळ योजनेच्या माध्यमातून पाण्याचा पुरवठा केला जातो. सदर योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून चालविली जात आहे. या पाणीपुरवठा योजनेची संपूर्ण जबाबदारी प्राधिकरणाकडेच सोपविण्यात आली आहे. अहेरी शहरातील वॉर्ड क्र. ४ मधील इंदिरा नगरामधील बेघर कॉलनीत मागील काही दिवसांपासून अशुद्ध व दूषित पाण्याचा पुरवठा केला जात आहे. पाण्यामध्ये विविध प्रकारचे जंतू आढळून येत आहेत. सदर जंतूयुक्त पाणी पिणे तर सोडाच घरी वापरणेही अशक्य होत आहे. काही नागरिक सदर पाण्याचा वापर करण्याऐवजी विहीर व हातपंपाचे पाणी वापरत आहेत. पावसाळ्याच्या दिवसात पाण्याबाबत विशेष सतर्क राहणे गरजेचे आहे, असा सल्ला शासन व प्रशासनाकडूनच देण्यात येते. अहेरीमध्ये मात्र विपरित परिस्थिती दिसून येत आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बेघर कॉलनीतील श्रीनिवास तुम्मावार, सुमित्रा पुरोहित, चरण मडावी, बापू रामगिरवार, लक्ष्मीदास झोडे यांच्यासह काही नागरिकांच्या नळांमध्ये अशा प्रकारचा दूषित पाण्याचा पुरवठा केला जात आहे. माजी ग्राम पंचायत सदस्य शैलेश पटवर्धन यांनीही समस्या नगर परिषदेचे प्रशासक सुरेश पुप्पलवार यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. प्राधिकरणासह नगर पंचायतीचेही या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष झाले आहे. नगर पंचायतीने ही समस्या सोडवावी, अशी मागणी वॉर्डातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)