शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

अहेरीत जंतूयुक्त पाणीपुरवठा

By admin | Updated: July 11, 2015 02:28 IST

मागील आठ दिवसांपासून शहरातील काही भागांमध्ये जंतुयुक्त व दूषित पाण्याचा पुरवठा केला जात असल्याने विविध प्रकारचे आजार होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

अहेरी : मागील आठ दिवसांपासून शहरातील काही भागांमध्ये जंतुयुक्त व दूषित पाण्याचा पुरवठा केला जात असल्याने विविध प्रकारचे आजार होण्याचा धोका निर्माण झाला आहे. दूषित व जंतूयुक्त पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.अहेरी शहराला नळ योजनेच्या माध्यमातून पाण्याचा पुरवठा केला जातो. सदर योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून चालविली जात आहे. या पाणीपुरवठा योजनेची संपूर्ण जबाबदारी प्राधिकरणाकडेच सोपविण्यात आली आहे. अहेरी शहरातील वॉर्ड क्र. ४ मधील इंदिरा नगरामधील बेघर कॉलनीत मागील काही दिवसांपासून अशुद्ध व दूषित पाण्याचा पुरवठा केला जात आहे. पाण्यामध्ये विविध प्रकारचे जंतू आढळून येत आहेत. सदर जंतूयुक्त पाणी पिणे तर सोडाच घरी वापरणेही अशक्य होत आहे. काही नागरिक सदर पाण्याचा वापर करण्याऐवजी विहीर व हातपंपाचे पाणी वापरत आहेत. पावसाळ्याच्या दिवसात पाण्याबाबत विशेष सतर्क राहणे गरजेचे आहे, असा सल्ला शासन व प्रशासनाकडूनच देण्यात येते. अहेरीमध्ये मात्र विपरित परिस्थिती दिसून येत आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बेघर कॉलनीतील श्रीनिवास तुम्मावार, सुमित्रा पुरोहित, चरण मडावी, बापू रामगिरवार, लक्ष्मीदास झोडे यांच्यासह काही नागरिकांच्या नळांमध्ये अशा प्रकारचा दूषित पाण्याचा पुरवठा केला जात आहे. माजी ग्राम पंचायत सदस्य शैलेश पटवर्धन यांनीही समस्या नगर परिषदेचे प्रशासक सुरेश पुप्पलवार यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. प्राधिकरणासह नगर पंचायतीचेही या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष झाले आहे. नगर पंचायतीने ही समस्या सोडवावी, अशी मागणी वॉर्डातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)