शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
4
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! ब्रोकरेज फर्मकडून 'या' ५ शेअर्सना खरेदीचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
5
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
6
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
7
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
8
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
9
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
10
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
11
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
12
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
13
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
14
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
15
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
16
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
17
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
18
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
19
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा

मजगीच्या कामांना पसंती

By admin | Updated: February 9, 2016 01:01 IST

गडचिरोली जिल्ह्यात धानाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते.

जिल्हाभरात ९९० कामे सुरू : ४६ हजार ५९३ मजुरांच्या हाताला कामगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात धानाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे ग्रामसभा मजगीच्या कामांना विशेष पसंती दर्शवित असून एकूण कामांपैकी निम्मी कामे मजगीची केली जातात. ६ फेब्रुवारीच्या अहवालानुसार ग्रामपंचायत स्तरावरील एकूण ५६२ कामांपैकी सुमारे २६७ कामे मजगीची सुरू आहेत. ग्रामीण भागातील रोजगाराची समस्या सोडविण्यासाठी केंद्र शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना सुरू केली. या योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला किमान १०० दिवसांचा रोजगार देण्याची हमी आहे. गडचिरोली जिल्ह्यात धान पीक निघाल्यानंतर रोजगार हमी योजनेच्या कामांची मागणी वाढते. ग्रामपंचायतस्तरावरच्या कामांचे नियोजन करण्याची जबाबदारी ग्रामसभेवर आहे. विविध प्रकारचे काम करता येत असले तरी सर्वाधिक कामे मजगीची मंजूर केली जातात. ६ फेब्रुवारी रोजीच्या अहवालानुसार जिल्हाभरात ग्रामपंचायत स्तरावर ५६२ कामे सुरू आहेत. या कामांवर एकूण ३२ हजार ६६७ मजूर काम करीत आहेत. यामध्ये ७८ रस्त्याची कामे सुरू असून त्यावर ८ हजार ८७७ मजूर काम करीत आहेत. बोडीची ४५ कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यावर २ हजार ७३७ मजूर काम करीत आहेत. मजगीची २६७ कामांवर १७ हजार ३३२ मजूर काम करीत आहेत. चार शेततळ्यांच्या कामावर ९० मजूर, ८३ सिंचन विहिरींच्या कामावर ८१७ मजूर, वृक्ष लागवडीच्या ३८ कामांवर १३५ मजूर, १० शौचालय बांधकामावर २१ मजूर, १४ भातखाचर कामांवर ८४३ मजूर, सात मामा तलाव दुरूस्तीवर ८३५ मजूर, तीन सिमेंट बंधारे कामांवर ९९ मजूर व इतर चार कामांवर ७२१ मजूर काम करीत आहेत. एकूण कामांपैकी निम्मी कामे मजगीची असून एकूण मजुरांपैकी निम्मे मजूर मजगीच्या कामावर कार्यरत आहेत. (नगर प्रतिनिधी)कामाची मागणी वाढली धान पीक निघाल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील शेतमजुराला व अल्पभूधारक शेतकऱ्याला कामासाठी शोधाशोध करावी लागते. त्यामुळे डिसेंबर महिन्यानंतर रोहयो कामाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. सद्य:स्थितीत रोहयोच्या कामावर सुमारे ४६ हजार ५९३ मजूर काम करीत आहेत. जिल्हाभरात ग्रामपंचायतचे ५६२ व यंत्रणास्तरावरील ४२८ कामे सुरू आहेत. रोहयो कामांची मागणी आता तेंदूपत्ता संकलन करण्याच्या अवधीपर्यंत वाढणार आहे. १०० ग्रामपंचायतींना कामाची प्रतीक्षागडचिरोली जिल्ह्यात एकूण ४५७ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी ३५७ ग्रामपंचायतीमध्ये कामे सुरू आहेत. मात्र ११० ग्रामपंचायतीमध्ये अजुनही कामे सुरू झालेली नाहीत. या ग्रामपंचायतीमध्येही कामे सुरू करण्यात यावी, अशी मागणी या ग्रामपंचायतीमधील नागरिकांकडून केली जात आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.