शहरं
Join us  
Trending Stories
1
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
2
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
3
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
4
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
5
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
6
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
7
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
8
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
9
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
10
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
11
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
12
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
13
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
14
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
15
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
16
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
17
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
18
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
19
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
20
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!

मजगीच्या कामांना पसंती

By admin | Updated: February 9, 2016 01:01 IST

गडचिरोली जिल्ह्यात धानाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते.

जिल्हाभरात ९९० कामे सुरू : ४६ हजार ५९३ मजुरांच्या हाताला कामगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात धानाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे ग्रामसभा मजगीच्या कामांना विशेष पसंती दर्शवित असून एकूण कामांपैकी निम्मी कामे मजगीची केली जातात. ६ फेब्रुवारीच्या अहवालानुसार ग्रामपंचायत स्तरावरील एकूण ५६२ कामांपैकी सुमारे २६७ कामे मजगीची सुरू आहेत. ग्रामीण भागातील रोजगाराची समस्या सोडविण्यासाठी केंद्र शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना सुरू केली. या योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला किमान १०० दिवसांचा रोजगार देण्याची हमी आहे. गडचिरोली जिल्ह्यात धान पीक निघाल्यानंतर रोजगार हमी योजनेच्या कामांची मागणी वाढते. ग्रामपंचायतस्तरावरच्या कामांचे नियोजन करण्याची जबाबदारी ग्रामसभेवर आहे. विविध प्रकारचे काम करता येत असले तरी सर्वाधिक कामे मजगीची मंजूर केली जातात. ६ फेब्रुवारी रोजीच्या अहवालानुसार जिल्हाभरात ग्रामपंचायत स्तरावर ५६२ कामे सुरू आहेत. या कामांवर एकूण ३२ हजार ६६७ मजूर काम करीत आहेत. यामध्ये ७८ रस्त्याची कामे सुरू असून त्यावर ८ हजार ८७७ मजूर काम करीत आहेत. बोडीची ४५ कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यावर २ हजार ७३७ मजूर काम करीत आहेत. मजगीची २६७ कामांवर १७ हजार ३३२ मजूर काम करीत आहेत. चार शेततळ्यांच्या कामावर ९० मजूर, ८३ सिंचन विहिरींच्या कामावर ८१७ मजूर, वृक्ष लागवडीच्या ३८ कामांवर १३५ मजूर, १० शौचालय बांधकामावर २१ मजूर, १४ भातखाचर कामांवर ८४३ मजूर, सात मामा तलाव दुरूस्तीवर ८३५ मजूर, तीन सिमेंट बंधारे कामांवर ९९ मजूर व इतर चार कामांवर ७२१ मजूर काम करीत आहेत. एकूण कामांपैकी निम्मी कामे मजगीची असून एकूण मजुरांपैकी निम्मे मजूर मजगीच्या कामावर कार्यरत आहेत. (नगर प्रतिनिधी)कामाची मागणी वाढली धान पीक निघाल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील शेतमजुराला व अल्पभूधारक शेतकऱ्याला कामासाठी शोधाशोध करावी लागते. त्यामुळे डिसेंबर महिन्यानंतर रोहयो कामाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. सद्य:स्थितीत रोहयोच्या कामावर सुमारे ४६ हजार ५९३ मजूर काम करीत आहेत. जिल्हाभरात ग्रामपंचायतचे ५६२ व यंत्रणास्तरावरील ४२८ कामे सुरू आहेत. रोहयो कामांची मागणी आता तेंदूपत्ता संकलन करण्याच्या अवधीपर्यंत वाढणार आहे. १०० ग्रामपंचायतींना कामाची प्रतीक्षागडचिरोली जिल्ह्यात एकूण ४५७ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी ३५७ ग्रामपंचायतीमध्ये कामे सुरू आहेत. मात्र ११० ग्रामपंचायतीमध्ये अजुनही कामे सुरू झालेली नाहीत. या ग्रामपंचायतीमध्येही कामे सुरू करण्यात यावी, अशी मागणी या ग्रामपंचायतीमधील नागरिकांकडून केली जात आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.