शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
3
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
4
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
5
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
6
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
7
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
8
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
9
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
10
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
11
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
12
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
13
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?
14
Amazon.in च्या 'ग्रेट सेव्हिंग्ज सेलिब्रेशन' स्टोअरफ्रंटसह GST बचतीचा धमाका
15
तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस
16
Vodafone-Idea च्या शेअरमध्ये मोठी घसरण, AGR प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला
17
“STकडे १३ हजार एकर लँड बँक, NAREDCOने विकासात योगदान द्यावे”; प्रताप सरनाईक यांचे आवाहन
18
पोस्ट ऑफिसची गॅरंटी! फक्त ₹५० लाखांचा विमाच नाही, 'या' स्कीममध्ये मिळतात टॅक्स आणि कर्जाचे फायदे
19
“PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा”: राऊत, ठाकरे गट बळीराजासाठी रस्त्यावर उतरणार
20
'लडाख हिंसाचार' प्रकरणी आता मोदी सरकार 'अ‍ॅक्शन मोड'वर! दिल्लीहून एक दूत पाठवला; उपराज्यपालांनी बैठक बोलावली

मजगीच्या कामांना पसंती

By admin | Updated: February 9, 2016 01:01 IST

गडचिरोली जिल्ह्यात धानाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते.

जिल्हाभरात ९९० कामे सुरू : ४६ हजार ५९३ मजुरांच्या हाताला कामगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात धानाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे ग्रामसभा मजगीच्या कामांना विशेष पसंती दर्शवित असून एकूण कामांपैकी निम्मी कामे मजगीची केली जातात. ६ फेब्रुवारीच्या अहवालानुसार ग्रामपंचायत स्तरावरील एकूण ५६२ कामांपैकी सुमारे २६७ कामे मजगीची सुरू आहेत. ग्रामीण भागातील रोजगाराची समस्या सोडविण्यासाठी केंद्र शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना सुरू केली. या योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला किमान १०० दिवसांचा रोजगार देण्याची हमी आहे. गडचिरोली जिल्ह्यात धान पीक निघाल्यानंतर रोजगार हमी योजनेच्या कामांची मागणी वाढते. ग्रामपंचायतस्तरावरच्या कामांचे नियोजन करण्याची जबाबदारी ग्रामसभेवर आहे. विविध प्रकारचे काम करता येत असले तरी सर्वाधिक कामे मजगीची मंजूर केली जातात. ६ फेब्रुवारी रोजीच्या अहवालानुसार जिल्हाभरात ग्रामपंचायत स्तरावर ५६२ कामे सुरू आहेत. या कामांवर एकूण ३२ हजार ६६७ मजूर काम करीत आहेत. यामध्ये ७८ रस्त्याची कामे सुरू असून त्यावर ८ हजार ८७७ मजूर काम करीत आहेत. बोडीची ४५ कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यावर २ हजार ७३७ मजूर काम करीत आहेत. मजगीची २६७ कामांवर १७ हजार ३३२ मजूर काम करीत आहेत. चार शेततळ्यांच्या कामावर ९० मजूर, ८३ सिंचन विहिरींच्या कामावर ८१७ मजूर, वृक्ष लागवडीच्या ३८ कामांवर १३५ मजूर, १० शौचालय बांधकामावर २१ मजूर, १४ भातखाचर कामांवर ८४३ मजूर, सात मामा तलाव दुरूस्तीवर ८३५ मजूर, तीन सिमेंट बंधारे कामांवर ९९ मजूर व इतर चार कामांवर ७२१ मजूर काम करीत आहेत. एकूण कामांपैकी निम्मी कामे मजगीची असून एकूण मजुरांपैकी निम्मे मजूर मजगीच्या कामावर कार्यरत आहेत. (नगर प्रतिनिधी)कामाची मागणी वाढली धान पीक निघाल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील शेतमजुराला व अल्पभूधारक शेतकऱ्याला कामासाठी शोधाशोध करावी लागते. त्यामुळे डिसेंबर महिन्यानंतर रोहयो कामाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. सद्य:स्थितीत रोहयोच्या कामावर सुमारे ४६ हजार ५९३ मजूर काम करीत आहेत. जिल्हाभरात ग्रामपंचायतचे ५६२ व यंत्रणास्तरावरील ४२८ कामे सुरू आहेत. रोहयो कामांची मागणी आता तेंदूपत्ता संकलन करण्याच्या अवधीपर्यंत वाढणार आहे. १०० ग्रामपंचायतींना कामाची प्रतीक्षागडचिरोली जिल्ह्यात एकूण ४५७ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी ३५७ ग्रामपंचायतीमध्ये कामे सुरू आहेत. मात्र ११० ग्रामपंचायतीमध्ये अजुनही कामे सुरू झालेली नाहीत. या ग्रामपंचायतीमध्येही कामे सुरू करण्यात यावी, अशी मागणी या ग्रामपंचायतीमधील नागरिकांकडून केली जात आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.