शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

पिकांवर किडींचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हाभरातील ४ हजार ६४० हेक्टर पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. हजारो रूपयांच्या कीटकनाशकांची फवारणी करूनही किड आटोक्यात येत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.यावर्षी पावसाने सुरूवातीपासूनच हुलकावणी दिली. त्यामुळे धानाची रोवणी उशीरा झाली. अगदी आॅगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत धान रोवणीची कामे सुरू होती. रोवणी उशीरा झाल्याने तसेच वातावरणात ...

ठळक मुद्देदमट हवामानाचा परिणाम : ५ हजार ६४० हेक्टर क्षेत्रावर प्रादुर्भाव वाढलाकृषी विभागाचा सल्लाकरपा व मानमोडी या रोगाच्या नियंत्रणासाठी रोग प्रतिबंधक जातीचा वापर करावा, रोवणीनंतर १५ दिवसांनी पानांवर करपा रोगाची लक्षणे दिसताच कार्बंडाझीम १० ग्रॅम किंवा हिनोसान ६ मिली किंवा कॉपर आॅक्झीक्लोराईड २५ ग्रॅम किंवा ट्रायकोझोल ७ ग्रॅम यापैकी कोणतेही एक बुरशीकडाकरपा रोगाच्या नियंत्रणासाठी कॉपर आॅक्सीक्लोराईड २५ ग्रॅम व स्ट्रेप्टोसायक्लिन ०.५ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळवून १० दिवसांच्या अंतराने दोन ते तीन फवारण्या कराव्या.खोडकिड्याच्या नियंत्रणासाठी फेनी ट्रोथीआॅन १६ मिली, क्विनॉलफॉस ३२ मिली यापैकी एक कीटकनाशक प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारावे. ट्रायकोग्रामा, जॅपेनिकम हे परोपजीवी कीटक हेक्टरी ५० हजार या प्रमाणात सात दिवसांच्या अंतराने तीन ते चार वेळा सोडावे.गादमाशीच्या नियंत्रणासाठी सभोवतालच्या पुरक देवधानाचा नाश करावा, गादमाशी प्रवण क्षेत्रात १० आणि ३० दिवसांनी तर इतर क्षेत्रात पाच टक्के चंदेरी पोंगे इतका प्रादुर्भाव आढळताच दानेदार फोरेट १० टक्के १० किलो अथवा क्विनॉलफास ५ टक्के १५ किलो प्रती हेक्टरी बांधीमध

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हाभरातील ४ हजार ६४० हेक्टर पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. हजारो रूपयांच्या कीटकनाशकांची फवारणी करूनही किड आटोक्यात येत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.यावर्षी पावसाने सुरूवातीपासूनच हुलकावणी दिली. त्यामुळे धानाची रोवणी उशीरा झाली. अगदी आॅगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत धान रोवणीची कामे सुरू होती. रोवणी उशीरा झाल्याने तसेच वातावरणात दमटपणा असल्याने धान पिकावर कडाकरपा, पाने गुंडाळणारी अळी, तुडतुडे, खोडकिडा, गादमाशी आदी रोगांचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे दिसून आले आहे.विशेष करून देसाईगंज, आरमोरी, कुरखेडा, कोरची, अहेरी, एटापल्ली, भामरागड या तालुक्यांमध्ये किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कृषी केंद्र चालक व कृषी सहायक यांचा सल्ला घेत शेतकरी धान पिकावर विविध प्रकारची कीटकनाशके फवारत आहेत. मात्र रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. उशीरा रोवणे झाल्याने धानाच्या उत्पादनात घट होणार आहे. ही बाब निश्चित असताना त्यातच आता किडीनेही आक्रमण केले आहे. त्यामुळे उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.धान पिकावर वाढलेला प्रादुर्भाव लक्षात घेऊन कृषी विभाग सतर्क झाला असून जिल्हाभरातील कृषी सहायक किडीच्या प्रकारानुसार कोणती कीटकनाशके फवारावी याबाबत मार्गदर्शन करीत आहेत.मागील आठ दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे व दिवसा कडक ऊन पडत असल्याने वातावरणात दमटपणा निर्माण झाला आहे. दमट वातावरणात नवीन किडीची संख्या झपाट्याने वाढते. त्यामुळे किडीचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याचा धोका कृषी विभागाच्या अधिकाºयांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केला आहे.२ हजार ८२७ हेक्टरवरील कीड नियंत्रणातधान, सोयाबिन, तूर आदी पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे लक्षात येताच शेतकºयांनी कृषी सहायकांच्या सल्ल्यानुसार कीटकनाशकांची फवारणी केली आहे. त्यामुळे जिल्हाभरातील २ हजार ८२७ हेक्टरवरील किड नियंत्रणात आली आहे. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील ३०२ हेक्टर, धानोरा तालुक्यातील २१९ हेक्टर, मुलचेरा १९१, चामोर्शी तालुक्यातील ४८७, देसाईगंज तालुक्यातील ३१८, आरमोरी ६२७, अहेरी तालुक्यातील ४६०, एटापल्ली १४५, भामरागड तालुक्यातील ३६ हेक्टरवरील रोग नियंत्रणात आले आहे.