शहरं
Join us  
Trending Stories
1
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
2
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
3
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
4
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
5
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
6
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
7
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
8
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
9
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
10
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
11
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
12
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
13
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
14
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
15
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
16
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
17
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
18
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
19
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
20
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण

बोड्यांमुळे वाढले सिंचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 11:17 PM

धान पिकाला सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गाव बोड्यांची दुरूस्ती करण्यासाठी शासनाने विशेष कार्यक्रम आखला आहे. या अंतर्गत मागील दोन वर्षात सुमारे २४१ बोड्यांची दुरूस्ती झाली आहे. यावर ३४ लाख ७५ हजार रूपयांचा खर्च झाला आहे.

ठळक मुद्दे२४१ बोड्यांची दुरुस्ती : दोन वर्षात ३४ लाखांचा निधी खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : धान पिकाला सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गाव बोड्यांची दुरूस्ती करण्यासाठी शासनाने विशेष कार्यक्रम आखला आहे. या अंतर्गत मागील दोन वर्षात सुमारे २४१ बोड्यांची दुरूस्ती झाली आहे. यावर ३४ लाख ७५ हजार रूपयांचा खर्च झाला आहे.धान पिकाला अगदी रोवण्यापासून ते कापणीपर्यंत पाणी उपलब्ध करावे लागते. मात्र जिल्ह्यात कन्नमवार जलाशय वगळता एकही मोठा सिंचन प्रकल्प नाही. त्यामुळे सिंचनाचा भार मामा तलाव, बोड्या यांना सांभाळावे लागते. बहुतांश बोड्या या इंग्रज काळातील आहेत. काळाच्या ओघात बोड्यांमध्ये गाळ जमा झाल्याने बोड्यांची पाणी साठवण क्षमता कमी झाली. त्याचबरोबर पार फुटल्याने काही बोड्यांमध्ये पाणी साचूनही राहत नव्हते. त्यामुळे बोड्या दुरूस्त करणे आवश्यक होते.शासनाकडून मामा तलाव दुरूस्तीसाठी निधी दिला जात होता. मात्र बोड्यांच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले जात होते. परिणामी बोड्यांवर अवलंबून असलेले धानाचे क्षेत्र धोक्यात आले होते. शासनाने २०१६-१७ या वर्षात बोड्यांची दुरूस्ती करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ४४० बोड्यांच्या दुरूस्तीचे लक्षांक देण्यात आले होते. यासाठी २०१६-१७ या वर्षात अर्ज मागविण्यात आले होते. सुमारे २०२८ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी ४३२ बोड्या बांधकामास मंजुरी देण्यात आली. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत २४१ बोड्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. ९९ बोड्यांचे अनुदान सुध्दा वितरित करण्यात आले आहे.गडचिरोली जिल्ह्यात मामा तलावांसोबतच बोड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. विशेष करून एटापल्ली, भामरागड, सिरोंचा या तालुक्यांमध्ये शेती केवळ बोडीच्या पाण्यावर अवलंबून आहे. एका बोडीच्या माध्यमातून जवळपास ५० ते २०० हेक्टर जमिनीला सिंचनाची सुविधा उपलब्ध होते. त्यामुळे सिंचन उपलब्ध करून देण्यात बोड्यांना विशेष महत्त्व आहे. ही बाब लक्षात घेऊन बोड्यांची दुरूस्ती करणे आवश्यक आहे. यापूर्वी केवळ मामा तलावांची दुरूस्ती केली जात होती. विद्यमान शासनाने मात्र तलावांसोबतच बोड्यांचीही दुरूस्ती करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. सदर उपक्रम पुढे चालू ठेवत जिल्हाभरातील सर्वच बोड्यांची दुरूस्ती होणे आवश्यक आहे. बोडी आटल्यानंतर त्या ठिकाणी रबी पिकांची पेरणी केली जाते. बोडीतील गाळात रबी पीक चांगले येत असल्याने काही शेतकरी पिकांची लागवड करण्यासाठी बोड्या भाड्याने घेत असल्याचेही दिसून येते.मत्स्य व्यवसायास मिळाली चालनाबोडीच्या पाण्याचा उपयोग मुख्यत: धान शेतीसाठी केला जातो. मात्र काही शेतकऱ्यानी बोड्यांमध्ये मत्स्य शेती सुध्दा करण्यास सुरूवात केली आहे. यामुळे नागरिकांना दुहेरी रोजगार उपलब्ध झाला आहे. विशेष करून मुलचेरा, चामोर्शी तालुक्यांमधील बोड्यांमध्ये शेतकरी मत्स्य व्यवसाय करीत असल्याचे दिसून येत आहे.