शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
3
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
4
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
5
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
6
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
7
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
8
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
9
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
10
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
11
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
12
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
13
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
15
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
16
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
17
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
18
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
19
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
20
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  

बोड्यांमुळे वाढले सिंचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 23:18 IST

धान पिकाला सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गाव बोड्यांची दुरूस्ती करण्यासाठी शासनाने विशेष कार्यक्रम आखला आहे. या अंतर्गत मागील दोन वर्षात सुमारे २४१ बोड्यांची दुरूस्ती झाली आहे. यावर ३४ लाख ७५ हजार रूपयांचा खर्च झाला आहे.

ठळक मुद्दे२४१ बोड्यांची दुरुस्ती : दोन वर्षात ३४ लाखांचा निधी खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : धान पिकाला सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गाव बोड्यांची दुरूस्ती करण्यासाठी शासनाने विशेष कार्यक्रम आखला आहे. या अंतर्गत मागील दोन वर्षात सुमारे २४१ बोड्यांची दुरूस्ती झाली आहे. यावर ३४ लाख ७५ हजार रूपयांचा खर्च झाला आहे.धान पिकाला अगदी रोवण्यापासून ते कापणीपर्यंत पाणी उपलब्ध करावे लागते. मात्र जिल्ह्यात कन्नमवार जलाशय वगळता एकही मोठा सिंचन प्रकल्प नाही. त्यामुळे सिंचनाचा भार मामा तलाव, बोड्या यांना सांभाळावे लागते. बहुतांश बोड्या या इंग्रज काळातील आहेत. काळाच्या ओघात बोड्यांमध्ये गाळ जमा झाल्याने बोड्यांची पाणी साठवण क्षमता कमी झाली. त्याचबरोबर पार फुटल्याने काही बोड्यांमध्ये पाणी साचूनही राहत नव्हते. त्यामुळे बोड्या दुरूस्त करणे आवश्यक होते.शासनाकडून मामा तलाव दुरूस्तीसाठी निधी दिला जात होता. मात्र बोड्यांच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले जात होते. परिणामी बोड्यांवर अवलंबून असलेले धानाचे क्षेत्र धोक्यात आले होते. शासनाने २०१६-१७ या वर्षात बोड्यांची दुरूस्ती करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ४४० बोड्यांच्या दुरूस्तीचे लक्षांक देण्यात आले होते. यासाठी २०१६-१७ या वर्षात अर्ज मागविण्यात आले होते. सुमारे २०२८ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी ४३२ बोड्या बांधकामास मंजुरी देण्यात आली. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत २४१ बोड्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. ९९ बोड्यांचे अनुदान सुध्दा वितरित करण्यात आले आहे.गडचिरोली जिल्ह्यात मामा तलावांसोबतच बोड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. विशेष करून एटापल्ली, भामरागड, सिरोंचा या तालुक्यांमध्ये शेती केवळ बोडीच्या पाण्यावर अवलंबून आहे. एका बोडीच्या माध्यमातून जवळपास ५० ते २०० हेक्टर जमिनीला सिंचनाची सुविधा उपलब्ध होते. त्यामुळे सिंचन उपलब्ध करून देण्यात बोड्यांना विशेष महत्त्व आहे. ही बाब लक्षात घेऊन बोड्यांची दुरूस्ती करणे आवश्यक आहे. यापूर्वी केवळ मामा तलावांची दुरूस्ती केली जात होती. विद्यमान शासनाने मात्र तलावांसोबतच बोड्यांचीही दुरूस्ती करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. सदर उपक्रम पुढे चालू ठेवत जिल्हाभरातील सर्वच बोड्यांची दुरूस्ती होणे आवश्यक आहे. बोडी आटल्यानंतर त्या ठिकाणी रबी पिकांची पेरणी केली जाते. बोडीतील गाळात रबी पीक चांगले येत असल्याने काही शेतकरी पिकांची लागवड करण्यासाठी बोड्या भाड्याने घेत असल्याचेही दिसून येते.मत्स्य व्यवसायास मिळाली चालनाबोडीच्या पाण्याचा उपयोग मुख्यत: धान शेतीसाठी केला जातो. मात्र काही शेतकऱ्यानी बोड्यांमध्ये मत्स्य शेती सुध्दा करण्यास सुरूवात केली आहे. यामुळे नागरिकांना दुहेरी रोजगार उपलब्ध झाला आहे. विशेष करून मुलचेरा, चामोर्शी तालुक्यांमधील बोड्यांमध्ये शेतकरी मत्स्य व्यवसाय करीत असल्याचे दिसून येत आहे.