शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

धानखरेदीची मर्यादा वाढवा, लूट थांबवा; विजय वडेट्टीवार यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2022 16:09 IST

कमी मर्यादेमुळे शेतकऱ्यांना आपला धान नाईलाजाने व्यापाऱ्यांना द्यावा लागतो

गडचिरोली : आधारभूत केंद्रावर शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या धानाची मर्यादा वाढविण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली. कमी मर्यादेमुळे शेतकऱ्यांना आपला धान नाईलाजाने व्यापाऱ्यांना द्यावा लागतो. यातून त्यांची लूट होण्याची शक्यता असून ही बाब अन्यायकारक असल्याचे त्यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले.

पूर्व विदर्भातील गडचिरोलीसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. गडचिरोली जिल्ह्यात धान हेच मुख्य पीक आहे. शासनाकडून शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी केली जाते. पण खरेदीसाठी कमी मर्यादा असल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते.

यावर्षी अतिवृष्टीचा धैर्याने सामना करीत शेतकऱ्यांनी दुबार व तिबार पेरणी करून धानपीक जगविले. यानंतर रोगराईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. आता धानपीक हातात येत असताना, शासनाकडून धान खरेदीसाठी अत्यल्प मर्यादा देण्यात आल्याने आपला शेतमाल कुठे विकावा? असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. सरकारने शेतकऱ्यांना आधार देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

गडचिरोली जिल्ह्यावर अन्याय का?

जिल्ह्यात एकरी ९.६० क्विंटलची मर्यादा देण्यात आली आहे. मात्र, यामुळे अनेक शेतकरी आधारभूत केंद्रावर धानाची विक्री करू शकत नाही. परिणामी त्यांना खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करावी लागते. जिल्ह्यालगत असलेल्या भंडारा, गोंदिया जिल्ह्यांमध्ये शासकीय आधारभूत केंद्रावर एकरी १३ क्विंटलची मर्यादा आहे. त्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात अत्यल्प मर्यादा देण्यात आल्याने हा गडचिरोलीतील धान उत्पादकांवर अन्याय असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार