शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

उत्पन्न ठप्प, कर्जाचे हप्ते भरायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 05:00 IST

काेराेनामुळे मागील वर्षीही लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला हाेता. पुन्हा दुसऱ्या लाटेत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शासनाने जिल्हाबंदी केली आहे. त्यामुळे लांब प्रवासासाठी वाहन भाड्याने घेणे बंद झाले आहे. तसेच लग्न व इतर समारंभांमध्ये नागरिकांच्या उपस्थितीवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. परिणामी ग्राहक मिळणे कठीण झाले आहे. 

ठळक मुद्देवाहनात हवा भरण्यासाठीही पैसे नाहीत, कर्जावरील व्याज माफ करा

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : काेराेनामुळे भाड्याने प्रवासी वाहने देण्याचा व्यवसाय जवळपास ठप्प पडला आहे. त्यामुळे वाहनाच्या कर्जाचे हप्ते कसे भरावे, असा प्रश्न वाहनमालकांसमाेर उभा ठाकला आहे.काहीतरी राेजगार असावा या उद्देशाने काही बेराेजगार युवकांनी सुमाे, स्काॅर्पिओ, झायलाे, बाेलेराे, तसेच कार वर्गातील वाहने खरेदी करून व्यवसाय सुरू केला. बहुतांशजण चालक व मालक स्वत:च आहेत. ही सर्वच वाहने ८ ते १० लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीची आहेत. अनेक वाहनांसाठी फायनान्स कंपन्यांकडून कर्ज काढण्यात आले आहे. काेराेनामुळे मागील वर्षीही लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला हाेता. पुन्हा दुसऱ्या लाटेत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शासनाने जिल्हाबंदी केली आहे. त्यामुळे लांब प्रवासासाठी वाहन भाड्याने घेणे बंद झाले आहे. तसेच लग्न व इतर समारंभांमध्ये नागरिकांच्या उपस्थितीवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. परिणामी ग्राहक मिळणे कठीण झाले आहे. मागील वर्षभरापासून उत्पन्न ठप्प पडले असल्याने वाहनासाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते कसे भरावे, असा प्रश्न या वाहनमालकांसमाेर  उपस्थित झाला आहे. शासनानेच आता कर्जावरील किमान व्याज तरी माफ करावे, अशी त्यांची अपेक्षा आहे.

वाहने सुरू, पण गॅरेज बंदवाहन क्षमतेच्या निम्मे प्रवासी बसवून प्रवास करण्यास शासनाने अनुमती दिली आहे. मात्र, गॅरेज व ऑटाेमाेबाईलची दुकाने बंद आहेत. एखादेवेळी वाहनात बिघाड निर्माण झाल्यास दुरुस्ती करण्यास अडचण निर्माण हाेत आहेत. सामानही मिळत नसल्याने थाेडाफार जरी वाहनात बिघाड निर्माण झाल्यास ते घरीच ठेवावे लागत आहे. गॅरेज बंद असल्याने त्यांचाही राेजगार हिरावला गेला आहे.

अडचणींचा डाेंगरवाहन बंद राहिले तरी वाहनाची देखभाल व दुरुस्ती करावीच लागते. त्यामुळे वाहनाचा किमान खर्च सुरूच राहतो. हा खर्च न केल्यास वाहन बंद पडण्याची शक्यता राहते. कर्ज काढून वाहन खरेदी केले आहे. कर्जाचे हप्ते लाखाेच्या घरात आहेत. हे हप्ते कसे भरावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

दिवसातून एखादा ग्राहक मिळेल या आशेने वाहने शहरातील कार पाॅईंटवर लावली जात आहेत. मात्र, ग्राहकच मिळत नसल्याने आम्ही हतबल झालाे आहाेत. दुसऱ्या जिल्ह्यात साेडण्यासाठी ई-पास काढलेली एखादी व्यक्ती मिळते. लाॅकडाऊनमुळे वाहनांचा व्यवसाय जवळपास ठप्पच पडला आहे.संदीप कांबळे, वाहन चालक-मालक

कर्ज काढून वाहन खरेदी केले. वर्षभरापासून या व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यामुळे वाहनांच्या कर्जाचे हप्ते कसे भरावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. लाॅकडाऊनच्या कालावधीतील स्थिती लक्षात घेता कर्जावरील व्याज माफ करावे. तसेच कर्जाचे हप्ते भरण्याची मुदत वाढवून देण्याची गरज आहे.सुनील तामशेटवार, वाहन चालक-मालक

 

गॅरेजवाल्यांचे पाेट-पाणी बंद

मागील महिनाभरापासून गॅरेज बंद आहेत. दरराेज येणाऱ्या उत्पन्नातून संसाराचा प्रपंच सुरू हाेता. मात्र, दुकानच बंद असल्याने राेजीराेटी थांबली आहे. मागील महिनाभरापासून आम्ही कसे जीवन जगत आहाेत, हे आम्हालाच माहीत.सूरज रामटेके, गॅरेज मालक

वाहन हे अत्यावश्यक वस्तू झाली आहे. मंत्री, जिल्हाधिकारी व इतर सर्वसामान्य सर्वच नागरिक संचारबंदीतही वाहनाचा वापर करीत आहेत. वाहन बिघडल्यास त्यांचे कामकाजच ठप्प पडू  शकते. गॅरेजचा  अत्यावश्यक सेवेत समावेश करून ते सुरू करू  देण्याची परवानगी आवश्यक हाेती.सुरेश मडावी, गॅरेज मजूर

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या