शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

जिल्ह्यात ५,५५२ शेतकऱ्यांनी केले शेतीचे मातीपरीक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 16:14 IST

Gadchiroli : ३७२८ शेतकऱ्यांना मिळाल्या आरोग्य पत्रिका

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मानवी शरीराचे आरोग्य सुदृढ राहिल्यास व्यक्ती चांगले कार्य करते, त्याचप्रमाणे जमिनीचे आरोग्य कसे आहे हे जाणने महत्त्वाचे आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील ५५५२ शेतकऱ्यांनी जमिनीचे माती परीक्षण करून घेतले. तपासणी केलेल्या पैकी ३ हजार ७२८ शेतकऱ्यांना जमिन आरोग्य पत्रिकेचे वितरण करण्यात आले.

गडचिरोली तालुक्यातील ६४० शेतकऱ्यांनी जमिनीचे आरोग्य तपासले. चामोर्शी तालुक्यातील ३२५, मुलचेरा ३०९, धानोरा १००९, देसाईगंज ६००, आरमोरी ३५२, कुरखेडा ५२१, कोरची २, अहेरी ७०६ व सिरोंचा तालुक्यातील २३६ शेतकऱ्यांचा समावेश आहे. मृदा तपासणीमधून शेतकऱ्यांना आपल्या शेतीत कोणते पीक चांगले येऊ शकते याची माहिती मिळू शकते. मात्र, काही शेतकरी मृदा परीक्षणाकडे पाठ फिरवतात.

  •  

असा आहे आरोग्य पत्रिका वितरणाचा तपशीलतालुका                                                    शेतकरी गडचिरोली                                                 ५४८चामोर्शी                                                     १२८८मुलचेरा                                                     २००धानोरा                                                      ५७९देसाईगंज                                                   ५४४आरमोरी                                                    १८५कुरखेडा                                                    ९८कोरची                                                       २अहेरी                                                        ३८६सिरोंचा                                                      १८६एटापल्ली                                                   ७१२भामरागड                                                    ०

जमिनीच्या आरोग्य पत्रिकेचे फायदे कोणते?

माती परीक्षण केल्यामुळे शेतकऱ्याला आपल्या जमिनीत कोणत्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे किंवा कोणते घटक जास्त प्रमाणात आहे याची माहिती मिळते. यामुळे खतांचे आणि सूक्ष्म मूलद्रव्यांचे नियोजन करणे सोयीचे होते.

माती परीक्षण अहवालानुसार खते दिल्यास रासायनिक खतांवरील अवाजवी खर्च टाळता येतो आणि त्याचे दुष्परिणामही टाळता येतात.

माती परीक्षण अहवालानुसार खते दिल्यास ती योग्य, संतुलित आणि शिफारसीत प्रमाणात दिली जातात. यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारते आणि तिची उत्पादकता वाढून पिकांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते.

माती परीक्षण केल्यामुळे जमिनीचे भौतिक, रासायनिक, जैविक गुणधर्म टिकवून ठेवता येतात. 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी