शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

जिल्ह्यात डोळ्याच्या साथीनंतर तापाने फणफणले चिमुकले; शासकीय रुग्णालयात गर्दी

By दिगांबर जवादे | Updated: August 8, 2023 14:16 IST

जलजन्य आजाराने पसरले हातपाय

दिगांबर जवादे

गडचिराेली : मागील १५ दिवसांपासून जिल्ह्यात डाेळ्यांची साथ आहे. या साथीच्या रुग्णांची संख्या वाढताच आता तापाचीही साथ वाढली आहे. विशेषकरून लहान मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे पालक चिंतेत आहेत. रुग्णालयांमधील ओपीडी रुग्णांची संख्या वाढत आहे.

एकाच गावात राहणाऱ्या बऱ्याच लोकांना जेव्हा एकच आजार होतो, तेव्हा त्या आजाराला साथीचा आजार म्हणतात. एकेकाळी अशा साथीच्या आजारांना तोंड देताना मृत्युमुखी पडावे लागल्याची अनेक उदाहरणे असत. पण, वैद्यकीय शास्त्राच्या प्रगतीनंतर अशा साथीच्या रोगांची कारणे समजू लागली आणि त्यावर उपायही होऊ लागले. साथीचे रोग बहुधा त्या भागातील दूषित पाण्यामुळे होतात, डासांमुळे, कुत्र्यांमुळे किंवा उंदरांमुळे पसरतात किंवा आजार झालेला रुग्ण दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यास त्याला व इतरांना आजार हाेताे. अशाप्रकारे आजाराचे रुग्ण वाढत जातात.

पावसाळ्यात सतत पाऊस पडत असल्याने सभाेवतालच्या वातावरणात फार माेठे बदल हाेतात. परिसरात अस्वच्छता असल्यास आणखी साथीचे राेग पसरतात. पावसामुळे नद्याचे पाणी दूषित हाेते. काही गावांमध्ये जलशुद्धीकरण केंद्र नाही. तसेच, पाणी वापरले जाते. काही नागरिक तर हेच पाणी पिण्यासाठीही वापरतात. विशेष म्हणजे या कालावधीत मानवाची राेगप्रतिकारक शक्ती व पचन शक्ती कमी झालेली राहते. परिणामी काेणताही साथराेग बळावतात.

या आजारांचा धोका

गॅस्ट्रो, कॉलरा, अतिसार, कावीळ, विषमज्वर या आजारांचेही प्रमाण वाढलेले असते. या राेगांवर आता प्रभावी उपाय आहेत. वेळीच उपचार घेतल्यास हे राेग बरे हाेतात. मात्र, उपचाराला उशीर झाल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वेळीच दक्षता घेणे गरजेचे आहे.

आराेग्य यंत्रणा अलर्ट

जिल्ह्यात साथीच्या राेगाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे आराेग्य विभागाची यंत्रण अलर्ट झाली आहे. रुग्णांना औषधाेपचार करून त्यांना घ्यावयाची खबरदारी याबाबत मार्गदर्शन केले जात आहे.

उघड्यावरचे पदार्थ टाळा, हात स्वच्छ धुवा

डाेळे येण्याच्या आजाराची लागण झाली असल्यास दाेन ते तीन दिवस घराच्या बाहेर निघू नये. कुटुंबातील इतर सदस्यांपासूनही दूर राहावे. स्वत:चे कपडे वेगळे ठेवावे. हात वेळाेवेळी सॅनिटाइझ करावे. काेमट पाण्याने डाेळे स्वच्छ धुवावे. शक्यताे शिजलेलेच अन्न घ्यावे. उघड्यावरचे अन्न आणि पाणी टाळावे. पाणी गरम करून प्यावे. जेवण करण्यापूर्वी किंवा काहीही खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावे.

डाॅ. रूपेश पेंदाम, जिल्हा साथराेग अधिकारी.

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटलGadchiroliगडचिरोली