शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

जिल्ह्यात डोळ्याच्या साथीनंतर तापाने फणफणले चिमुकले; शासकीय रुग्णालयात गर्दी

By दिगांबर जवादे | Updated: August 8, 2023 14:16 IST

जलजन्य आजाराने पसरले हातपाय

दिगांबर जवादे

गडचिराेली : मागील १५ दिवसांपासून जिल्ह्यात डाेळ्यांची साथ आहे. या साथीच्या रुग्णांची संख्या वाढताच आता तापाचीही साथ वाढली आहे. विशेषकरून लहान मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे पालक चिंतेत आहेत. रुग्णालयांमधील ओपीडी रुग्णांची संख्या वाढत आहे.

एकाच गावात राहणाऱ्या बऱ्याच लोकांना जेव्हा एकच आजार होतो, तेव्हा त्या आजाराला साथीचा आजार म्हणतात. एकेकाळी अशा साथीच्या आजारांना तोंड देताना मृत्युमुखी पडावे लागल्याची अनेक उदाहरणे असत. पण, वैद्यकीय शास्त्राच्या प्रगतीनंतर अशा साथीच्या रोगांची कारणे समजू लागली आणि त्यावर उपायही होऊ लागले. साथीचे रोग बहुधा त्या भागातील दूषित पाण्यामुळे होतात, डासांमुळे, कुत्र्यांमुळे किंवा उंदरांमुळे पसरतात किंवा आजार झालेला रुग्ण दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यास त्याला व इतरांना आजार हाेताे. अशाप्रकारे आजाराचे रुग्ण वाढत जातात.

पावसाळ्यात सतत पाऊस पडत असल्याने सभाेवतालच्या वातावरणात फार माेठे बदल हाेतात. परिसरात अस्वच्छता असल्यास आणखी साथीचे राेग पसरतात. पावसामुळे नद्याचे पाणी दूषित हाेते. काही गावांमध्ये जलशुद्धीकरण केंद्र नाही. तसेच, पाणी वापरले जाते. काही नागरिक तर हेच पाणी पिण्यासाठीही वापरतात. विशेष म्हणजे या कालावधीत मानवाची राेगप्रतिकारक शक्ती व पचन शक्ती कमी झालेली राहते. परिणामी काेणताही साथराेग बळावतात.

या आजारांचा धोका

गॅस्ट्रो, कॉलरा, अतिसार, कावीळ, विषमज्वर या आजारांचेही प्रमाण वाढलेले असते. या राेगांवर आता प्रभावी उपाय आहेत. वेळीच उपचार घेतल्यास हे राेग बरे हाेतात. मात्र, उपचाराला उशीर झाल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वेळीच दक्षता घेणे गरजेचे आहे.

आराेग्य यंत्रणा अलर्ट

जिल्ह्यात साथीच्या राेगाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे आराेग्य विभागाची यंत्रण अलर्ट झाली आहे. रुग्णांना औषधाेपचार करून त्यांना घ्यावयाची खबरदारी याबाबत मार्गदर्शन केले जात आहे.

उघड्यावरचे पदार्थ टाळा, हात स्वच्छ धुवा

डाेळे येण्याच्या आजाराची लागण झाली असल्यास दाेन ते तीन दिवस घराच्या बाहेर निघू नये. कुटुंबातील इतर सदस्यांपासूनही दूर राहावे. स्वत:चे कपडे वेगळे ठेवावे. हात वेळाेवेळी सॅनिटाइझ करावे. काेमट पाण्याने डाेळे स्वच्छ धुवावे. शक्यताे शिजलेलेच अन्न घ्यावे. उघड्यावरचे अन्न आणि पाणी टाळावे. पाणी गरम करून प्यावे. जेवण करण्यापूर्वी किंवा काहीही खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावे.

डाॅ. रूपेश पेंदाम, जिल्हा साथराेग अधिकारी.

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटलGadchiroliगडचिरोली