शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, दारिद्रय रेषेखालील कुटुंबाला मिळते आर्थिक अनुदान; येथे करावा संपर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 16:58 IST

Gadchiroli : राष्ट्रीय कुटुंब योजनेतून मिळतेय अर्थसहाय्य

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या कर्ता स्त्री-पुरुष मरण पावल्यास राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेत कुटुंबियांना एकरकमी २० हजार रुपये दिले जातात. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात ४७ कुटूंबांना एकरकमी २० हजार रूपये अर्थसहाय देण्यात आल्याची माहिती आहे. संकटात सापडलेल्या व निराधार कुटुंबीयांशी ही योजना दिलासादायक ठरत असल्याचे दिसून येते.

महसूल विभागाच्या वतीने या योजनेची प्रभावी जनजागृती केली जाते. शासकीय मेळावे, शिबिर तसेच पोलिस विभागाच्या जनजागरण मेळाव्यात महसूल विभागाच्या वतीने स्टॉल लावून या योजनेची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविली जाते. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना हि योजना दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना आर्थिक मदत देण्यासाठी आहे. या योजनेअंतर्गत, १८ ते ५९ वयोगटातील प्राथमिक कमावणारा माणूस मरण पावल्यास त्याच्या कुटुंबाला २० हजार रुपये एकरकमी मदत दिली जाते. १ लाख दारिद्रय रेषेखालील कुटुंब शहरी व ग्रामीण मिळून बाराही तालुक्यात एकुण १ लाख २३ हजार कुटुंब दारिद्र्य रेषेखालील यादीत आहेत

काय आहे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना?दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील १८ ते ५९ वर्ष वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियास एक रकमी २० हजार अर्थसहाय्य देण्यात येते.

वर्षभरात २५ कुटुंबांना प्रत्येकी २० हजारजिल्ह्यात वर्षीरात ४७ कुटूंबांना एकरकमी २० हजार रूपये अर्थसहाय देण्यात आले आहे. तहसील कार्यालयामार्फत अर्ज पडताळणीची कार्यवाही करण्यात येते.

संपर्क कोठे कराल?अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/तहसीदार संजय गांधी योजना तसेच तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो.

या योजनेची वैशिष्ट्येःही मदत मृत्यूचे कारण विचारात न घेता दिली जाते. कुटुंबातील कमावत्या व्यक्तीच्या मृत्यूच्या प्रत्येक घटनेत ही मदत दिली जाते. ही मदत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील शोकग्रस्त कुटुंबाला दिली जाते. ही मदत मृत गरीब व्यक्तीच्या कुटुंबातील जो सदस्य घराचा प्रमुख असल्याचे आढळून येईल, त्याला दिली जाते. या योजनेची अंमलबजावणी 'राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम' या छत्र योजनेअंतर्गत केली जाते.

 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली