शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बारावीच्या निकालात सुधारणा

By admin | Updated: May 31, 2017 02:05 IST

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या बारावीच्या परीक्षेत यावर्षी जिल्ह्यातील ८५.५७ टक्के विद्यार्थ्यांनी यश मिळविले.

८५.५७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण : प्लाटिनम ज्युबिली स्कूलचा कार्तिकेय जिल्ह्यात प्रथम लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या बारावीच्या परीक्षेत यावर्षी जिल्ह्यातील ८५.५७ टक्के विद्यार्थ्यांनी यश मिळविले. त्यात २१० विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. नागपूर विभागातील ६ जिल्ह्यात गडचिरोली निकालात पाचव्या स्थायी आहे. आदिवासीबहुल आणि नक्षलग्रस्त भाग असतानाही गडचिरोली जिल्ह्याने हे मिळविले आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८२.७१ टक्के होता. तो यावर्षी ३ टक्क्यांनी वाढला आहे. गडचिरोली शहरातील प्लॅटिनम ज्युबिली स्कूलचा विद्यार्थी कार्तिकेय शंकरराव कोरंटलावार याने ९२.१५ टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. देसाईगंज येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयाचा संकेत पुंडलिक बोथे हा ९१.३८ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात द्वितीय आला आहे, तर गडचिरोलीच्या शिवाजी विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी पियुष मनोज अलोनी याने ९०.९२ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात तृतीय स्थान पटकावले आहे. जिल्ह्यातून १३ हजार ५९६ विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १३ हजार ५८३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून ११ हजार ६२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात सर्वाधिक ६८१५ विद्यार्थी कला शाखेतील, ४२०९ विद्यार्थी विज्ञान, २२६ विद्यार्थी वाणिज्य तर ३७३ विद्यार्थी व्होकेशनल शाखेचे आहेत. विज्ञान शाखेचे सर्वाधिक (९५.०१ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये २१० विद्यार्थी प्रावीण्य श्रेणी, २७१७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर ७९८७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील ११ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. याशिवाय ९ शाळांमधील एका शाखेचा निकाल १०० टक्के लागला आहे. कार्तिकेयला करायचेय वडिलांचे स्वप्न पूर्ण ९२.१५ टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावणाऱ्या कार्तिकेय शंकर कोरंटलावार याला आयएएस होऊन वडिलांचे अपुरे स्वप्न पूर्ण करायचे आहे. त्याच्या या यशाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’कडे आपल्या भावना व्यक्त करताना कार्तिकेयन याने या यशाचे गमकही उलगडले. कार्तिकेयचे वडील शंकर कोरंटलावार धानोरा पंचायत समितीत सहायक लेखाधिकारी आहे तर आई विमल नवेगाव येथील जि.प.शाळेत शिक्षिका आहे. आपल्या या यशात आई-वडिलांचे वेळोवेळी मिळालेले पाठबळ, प्लॅटिनम ज्युबिली शाळेचे प्राचार्य आमलानी, उपप्राचार्य मंगर व इतर शिक्षकवृदांचे योग्य मार्गदर्शन यांचा मोठा वाटा आहे. ट्युशन असली तरी खरे ज्ञान शाळेतच मिळते असे त्याने सांगितले. वडीलांना आयएएस व्हायचे होते. परंतू त्यावेळच्या त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना आयएएसची तयारी करता आली नाही. मात्र वडिलांचे ते अधुरे स्वप्न आपण पूर्ण करणार, असे कार्तिकेय सांगतो. प्रथम आयआयटीला प्रवेश घेऊन नंतर आयएएसची तयारी करणार असल्याचे त्याने सांगितले. त्यासाठी आई-वडिलांनीही त्याला पूर्ण पाठबळ देण्याची तयारी दर्शविली. विशेष म्हणजे दहावीतही कार्तिकेयने ९३.६० टक्के गुण मिळविले होते. शाळेतील शिस्तीचे वातावरण आणि योग्य मार्गदर्शन यामुळे कार्तिकेयला हे यश मिळविता आल्याचे त्याच्या वडीलांनी लोकमतला सांगितले.