शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

धान भरडाई थांबल्यामुळे खरेदीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 06:00 IST

जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानांमधून फोर्टिफाईड (प्रोटिनयुक्त प्रक्रिया केलेला) तांदूळ नागरिकांना दिला जाणार आहे. त्यासाठी लागणारा महिन्याकाठी ३७ हजार क्विंटल तांदूळ भरडाई केला जात आहे. मात्र इतर जिल्ह्यांना तांदूळ पुरवण्यासाठी संबंधित जिल्ह्यांकडून अद्याप मागणीच झालेली नसल्यामुळे त्यांसाठी धानाची भरडाई करून तो तांदूळ सुरक्षित कुठे ठेवायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देठेवण्यासाठी जागाच नाही : पुरवठ्यासाठी इतर जिल्ह्यांकडून मागणीच न आल्याने अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून शासनाच्या हमीभावानुसार खरेदी केलेल्या धानाची भरडाई होत नसल्यामुळे खरेदी केंद्रांवर आता धान ठेवणे कठीण झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांकडून आणखी धान खरेदी करणे जवळजवळ अशक्य होऊन अनेक ठिकाणची धान खरेदी ठप्प झाली आहे. यामुळे प्रशासनापुढे नवीन पेच निर्माण झाला आहे.जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानांमधून फोर्टिफाईड (प्रोटिनयुक्त प्रक्रिया केलेला) तांदूळ नागरिकांना दिला जाणार आहे. त्यासाठी लागणारा महिन्याकाठी ३७ हजार क्विंटल तांदूळ भरडाई केला जात आहे. मात्र इतर जिल्ह्यांना तांदूळ पुरवण्यासाठी संबंधित जिल्ह्यांकडून अद्याप मागणीच झालेली नसल्यामुळे त्यांसाठी धानाची भरडाई करून तो तांदूळ सुरक्षित कुठे ठेवायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी धान भरडाईचे काम जवळजवळ ठप्प झाले आहे.यावर्षी आदिवासी विकास महामंडळाच्या ८९ आणि मार्केटिंग फेडरेशनच्या १७ अशा एकूण १०६ केंद्रांवरून शेतकºयांकडील धानाची खरेदी झाली. त्यात महामंडळाने ७ लाख १५ हजार ७४७ क्विंटल तर मार्केटिंग फेडरेशनने २ लाख ४८ हजार ४४५ क्विंटल अशी एकूण ९ लाख ६४ हजार १९३ क्विंटल धान खरेदी केली. त्यापैकी जेमतेम १ लाख ९ हजार क्विंटल धान भरडाईसाठी देण्यात आला आहे. एकूण धान खरेदीच्या १२ ते १३ टक्केच धानाची भरडाई झाली असल्यामुळे मोठ्या प्रमाणात खरेदी केंद्रांच्या प्रांगणात धान पडून आहे.गडचिरोली जिल्ह्यातील तांदळाचा पुरवठा राज्यातील अनेक जिल्ह्यांना केला जातो. कोणत्या जिल्ह्यांना किती तांदळाची गरज आहे याची मागणी नोंदवून तसा पुरवठा करण्याचे नियोजन आतापर्यंत होणे अपेक्षित होते. परंतू संबंधित जिल्ह्यांच्या मागणीबाबत अद्याप जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव आला नसल्याचे समजते. वास्तविक तशी मागणी आल्यास त्यानुसार धान भरडाईसाठी देऊन खरेदी केंद्रांवर आणखी धान ठेवण्यासाठी जागा उपलब्ध होऊ शकते. मात्र तसे झाले नसल्यामुळे पेच निर्माण झाला आहे.फोर्टिफाईडवर तांदळावर भरजिल्ह्यातील नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी स्वस्त धान्य दुकानांमधून फोर्टिफाईड तांदूळ देण्याचा निर्णय प्रशासनाने आधीच घेतला आहे. त्यासाठी जिल्ह्यात महिन्याकाठी ३७ हजार क्विंटल एवढ्याच तांदळाची गरज असते. साध्या तांदळावर प्रक्रिया करून त्याला फोर्टिफाईड बनविण्यासाठी १० राईस मिलर्सना कंत्राट दिला आहे. त्यामुळे या तांदळाशिवाय बाहेरगावी तांदूळ पुरविण्यासाठी अद्याप आदेश मिळाला नसल्यामुळे त्या धानाची भरडाई ठप्प आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड