शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
2
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
3
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
4
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
5
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
6
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
7
शेअर बाजाराची मजबूत सुरुवात: सेन्सेक्स १३६ अंकांनी वधारला, निफ्टी २४,७०० च्या जवळ; हे स्टॉक्स तेजीत
8
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
9
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
10
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
11
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
12
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
13
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
14
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
15
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
16
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
17
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
18
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
19
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
20
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान

धान भरडाई थांबल्यामुळे खरेदीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 06:00 IST

जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानांमधून फोर्टिफाईड (प्रोटिनयुक्त प्रक्रिया केलेला) तांदूळ नागरिकांना दिला जाणार आहे. त्यासाठी लागणारा महिन्याकाठी ३७ हजार क्विंटल तांदूळ भरडाई केला जात आहे. मात्र इतर जिल्ह्यांना तांदूळ पुरवण्यासाठी संबंधित जिल्ह्यांकडून अद्याप मागणीच झालेली नसल्यामुळे त्यांसाठी धानाची भरडाई करून तो तांदूळ सुरक्षित कुठे ठेवायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देठेवण्यासाठी जागाच नाही : पुरवठ्यासाठी इतर जिल्ह्यांकडून मागणीच न आल्याने अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून शासनाच्या हमीभावानुसार खरेदी केलेल्या धानाची भरडाई होत नसल्यामुळे खरेदी केंद्रांवर आता धान ठेवणे कठीण झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांकडून आणखी धान खरेदी करणे जवळजवळ अशक्य होऊन अनेक ठिकाणची धान खरेदी ठप्प झाली आहे. यामुळे प्रशासनापुढे नवीन पेच निर्माण झाला आहे.जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानांमधून फोर्टिफाईड (प्रोटिनयुक्त प्रक्रिया केलेला) तांदूळ नागरिकांना दिला जाणार आहे. त्यासाठी लागणारा महिन्याकाठी ३७ हजार क्विंटल तांदूळ भरडाई केला जात आहे. मात्र इतर जिल्ह्यांना तांदूळ पुरवण्यासाठी संबंधित जिल्ह्यांकडून अद्याप मागणीच झालेली नसल्यामुळे त्यांसाठी धानाची भरडाई करून तो तांदूळ सुरक्षित कुठे ठेवायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी धान भरडाईचे काम जवळजवळ ठप्प झाले आहे.यावर्षी आदिवासी विकास महामंडळाच्या ८९ आणि मार्केटिंग फेडरेशनच्या १७ अशा एकूण १०६ केंद्रांवरून शेतकºयांकडील धानाची खरेदी झाली. त्यात महामंडळाने ७ लाख १५ हजार ७४७ क्विंटल तर मार्केटिंग फेडरेशनने २ लाख ४८ हजार ४४५ क्विंटल अशी एकूण ९ लाख ६४ हजार १९३ क्विंटल धान खरेदी केली. त्यापैकी जेमतेम १ लाख ९ हजार क्विंटल धान भरडाईसाठी देण्यात आला आहे. एकूण धान खरेदीच्या १२ ते १३ टक्केच धानाची भरडाई झाली असल्यामुळे मोठ्या प्रमाणात खरेदी केंद्रांच्या प्रांगणात धान पडून आहे.गडचिरोली जिल्ह्यातील तांदळाचा पुरवठा राज्यातील अनेक जिल्ह्यांना केला जातो. कोणत्या जिल्ह्यांना किती तांदळाची गरज आहे याची मागणी नोंदवून तसा पुरवठा करण्याचे नियोजन आतापर्यंत होणे अपेक्षित होते. परंतू संबंधित जिल्ह्यांच्या मागणीबाबत अद्याप जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव आला नसल्याचे समजते. वास्तविक तशी मागणी आल्यास त्यानुसार धान भरडाईसाठी देऊन खरेदी केंद्रांवर आणखी धान ठेवण्यासाठी जागा उपलब्ध होऊ शकते. मात्र तसे झाले नसल्यामुळे पेच निर्माण झाला आहे.फोर्टिफाईडवर तांदळावर भरजिल्ह्यातील नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी स्वस्त धान्य दुकानांमधून फोर्टिफाईड तांदूळ देण्याचा निर्णय प्रशासनाने आधीच घेतला आहे. त्यासाठी जिल्ह्यात महिन्याकाठी ३७ हजार क्विंटल एवढ्याच तांदळाची गरज असते. साध्या तांदळावर प्रक्रिया करून त्याला फोर्टिफाईड बनविण्यासाठी १० राईस मिलर्सना कंत्राट दिला आहे. त्यामुळे या तांदळाशिवाय बाहेरगावी तांदूळ पुरविण्यासाठी अद्याप आदेश मिळाला नसल्यामुळे त्या धानाची भरडाई ठप्प आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड