शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
5
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
6
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
7
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
8
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
9
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
10
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
11
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
12
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
13
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
14
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
15
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
16
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
17
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
18
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
19
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
20
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले

पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2022 05:00 IST

२४ मे रोजी सिरोंचा तालुक्यात वादळी पावसाने चांगलाच तडाखा दिला होता. गारपीटसह झालेल्या या वादळी पावसात शहरातील व अन्य गावांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक नागरिकांची घरे कोसळली. तर अनेकांचे घरावरील टिनपत्रे उडाल्याने संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी तत्काळ सिरोंचा दौरा करून स्थानिक तहसील कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन नुकसानग्रस्तांना नुकसानभरपाई मिळावी या उदात्त हेतूने तत्काळ मोका पंचनामा करण्याचे निर्देश दिले.

लाेकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : कोरोनासह विविध संकटांमुळे शेतकरी अगोदरच हवालदिल झाला आहे आणि निसर्गानेही त्याच्यावर अवकृपा दाखविली आहे. २४ मे रोजी सिरोंचा तालुक्यात वादळी वारा, गारपीटसह अवकाळी पाऊस झाल्याने तालुका मुख्यालयासह इतरही गावांतील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे, कोसळलेल्या घरांचे व आदी नुकसानीचे त्वरित पंचनामे करून तत्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी, असे निर्देश आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी दिले.२४ मे रोजी सिरोंचा तालुक्यात वादळी पावसाने चांगलाच तडाखा दिला होता. गारपीटसह झालेल्या या वादळी पावसात शहरातील व अन्य गावांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक नागरिकांची घरे कोसळली. तर अनेकांचे घरावरील टिनपत्रे उडाल्याने संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी तत्काळ सिरोंचा दौरा करून स्थानिक तहसील कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन अवकाळीचा आढावा घेत नुकसानग्रस्तांना नुकसानभरपाई मिळावी या उदात्त हेतूने तत्काळ मोका पंचनामा करण्याचे निर्देश दिले.एवढेच नव्हे तर तालुक्यातील कुठल्याही गावात एकही नुकसानग्रस्त नागरिक व शेतकरी मदतीपासून सुटणार नाही, याची दक्षता घेण्याचेही निर्देश दिले. यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भाग्यश्री आत्राम, सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम, राष्ट्रवादीच्या विभागीय अध्यक्ष शाहीन हकीम, तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लुरी उपस्थित होते.

नुकसानग्रस्तांसोबत साधला थेट संवाद-    सिरोंचा तालुक्यात वादळी पावसाने अनेकांचे नुकसान केले. याची माहिती मिळताच आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी तालुक्यातील विविध गावांत प्रत्यक्ष भेटी देऊन नुकसानग्रस्तांशी संवाद साधत परिस्थिती जाणून घेतली. स्थानिक नगरपंचायत हद्दीतील काही प्रभागातसुद्धा त्यांनी भेट देऊन पाहणी केली. प्रशासनाकडून त्वरित नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिरोंचा तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.-    दरम्यान यावेळी सिराेंचा तालुक्यासह अहेरी उपविभागातील विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. काही नागरिकांनी रस्ते, नाली, पिण्याचे पाणी, वीजबिल आदीबाबत तक्रारी मांडल्या. या तक्रारीचे निरसन करण्याची विनंती आ.धर्मरावबाबा आत्राम यांना यावेळी केली. 

 

टॅग्स :Farmerशेतकरीgovernment schemeसरकारी योजना