शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
3
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
4
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
5
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
6
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
7
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
8
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
9
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
10
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
11
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
12
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
13
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
14
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
15
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
16
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
17
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
18
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
19
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
20
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

पत्रच नाही तर मानव विकास मिशनची बस कशी जाणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2022 05:00 IST

मानव विकास मिशनमार्फत आठवी ते बारावी व अहिल्याबाई हाेळकर याेजनेंतर्गत पाचवी ते बारावीच्या विद्यार्थिनींसाठी माेफत पासेस उपलब्ध करून दिले जातात. ज्या ठिकाणचे पासेस आहेत. त्या मार्गावर महामंडळामार्फत बसेस चालविल्या जातात. पहिल्या दिवशीपासूनच सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती राहील यासाठी मुख्याध्यापकांनी अगाेदरच कार्यवाही करणे आवश्यक आहे; मात्र सात दिवसांचा कालावधी उलटला तरी बसेस संदर्भात अजूनही पत्र प्राप्त झाले नाही. त्यामुळे अनेक मार्गांवर बसेस नाहीत. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : शाळा सुरू हाेऊन आठ दिवसांचा कालावधी उलटला तरी अजूनपर्यंत मुख्याध्यापकांनी मानव विकास मिशनची बस व पासेससाठी अर्ज केले नाहीत. त्यामुळे आगारामार्फत अंदाजानुसार बसेस साेडल्या जात आहेत. काही मार्गांवर विद्यार्थी आहेत मात्र बस नाहीत तर काही मार्गांवर बस जात आहेत मात्र विद्यार्थी नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे. गडचिराेली आगाराला मानव विकास मिशनतर्फे ४९ बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. या सर्व बसेस विद्यार्थिनींच्या प्रवासासाठी वापरायच्या आहेत. मानव विकास मिशनमार्फत आठवी ते बारावी व अहिल्याबाई हाेळकर याेजनेंतर्गत पाचवी ते बारावीच्या विद्यार्थिनींसाठी माेफत पासेस उपलब्ध करून दिले जातात. ज्या ठिकाणचे पासेस आहेत. त्या मार्गावर महामंडळामार्फत बसेस चालविल्या जातात. पहिल्या दिवशीपासूनच सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती राहील यासाठी मुख्याध्यापकांनी अगाेदरच कार्यवाही करणे आवश्यक आहे; मात्र सात दिवसांचा कालावधी उलटला तरी बसेस संदर्भात अजूनही पत्र प्राप्त झाले नाही. त्यामुळे अनेक मार्गांवर बसेस नाहीत. ज्या मार्गावर कमी प्रवासी मिळतात अशा मार्गावरील बसफेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. 

डिझेलचा तुटवडा त्यात धावतात रिकाम्या बसेस आगारात डिझेलचा नेहमीच तुटवडा राहताे. महत्त्वाच्या मार्गावरील बसेस रद्द केल्या जातात; मात्र विद्यार्थिनींची गैरसाेय हाेऊ नये, यासाठी बसेस साेडल्या जातात. काही मार्गांवर विद्यार्थिनीच नसल्याने बसेस रिकाम्या धावत आहेत. यात महामंडळाला ताेटा सहन करावा लागत आहे. 

मुख्याध्यापकांनी पत्र द्यावे-    ज्या मार्गावर बसेसची गरज आहे. त्या मार्गावरील विद्यार्थिनींच्या पासेस काढण्यासाठी मुख्याध्यापकांनी पत्र देणे आवश्यक आहे; मात्र अजूनपर्यंत एकाही मुख्याध्यापकाने पासेसबाबत पत्र दिले नाही. दहा महिने कालावधीचे पास एकाचवेळी दिले जाणार आहेत.  

स्मार्ट कार्ड काढणे सुरूज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी स्मार्ट कार्ड असणे आवश्यक करण्यात आले आहे. गडचिराेली आगारात स्मार्ट कार्ड काढणे सुरू आहे. यासाठी स्वतंत्र कक्ष आहे.

निम्म्या बसेसवर कारभारगडचिराेली आगारात एकूण १०३ बसेस आहेत. त्यापैकी २० बसेस पंढरपूरच्या जत्रेसाठी गेल्या आहेत. १५ बसेस नादुरुस्त अवस्थेत सुट्ट्या भागांसाठी आगारातच उभ्या आहेत. तर ६ बसेस चंद्रपुरातील वर्कशाॅपमध्ये उभ्या आहेत.  एकूण ४१ बसेस कमी आहेत. केवळ ६२ बसेसवर आगाराचा कारभार सुरू आहे. 

 

टॅग्स :Schoolशाळाstate transportएसटी