शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

पत्रच नाही तर मानव विकास मिशनची बस कशी जाणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2022 05:00 IST

मानव विकास मिशनमार्फत आठवी ते बारावी व अहिल्याबाई हाेळकर याेजनेंतर्गत पाचवी ते बारावीच्या विद्यार्थिनींसाठी माेफत पासेस उपलब्ध करून दिले जातात. ज्या ठिकाणचे पासेस आहेत. त्या मार्गावर महामंडळामार्फत बसेस चालविल्या जातात. पहिल्या दिवशीपासूनच सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती राहील यासाठी मुख्याध्यापकांनी अगाेदरच कार्यवाही करणे आवश्यक आहे; मात्र सात दिवसांचा कालावधी उलटला तरी बसेस संदर्भात अजूनही पत्र प्राप्त झाले नाही. त्यामुळे अनेक मार्गांवर बसेस नाहीत. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : शाळा सुरू हाेऊन आठ दिवसांचा कालावधी उलटला तरी अजूनपर्यंत मुख्याध्यापकांनी मानव विकास मिशनची बस व पासेससाठी अर्ज केले नाहीत. त्यामुळे आगारामार्फत अंदाजानुसार बसेस साेडल्या जात आहेत. काही मार्गांवर विद्यार्थी आहेत मात्र बस नाहीत तर काही मार्गांवर बस जात आहेत मात्र विद्यार्थी नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे. गडचिराेली आगाराला मानव विकास मिशनतर्फे ४९ बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. या सर्व बसेस विद्यार्थिनींच्या प्रवासासाठी वापरायच्या आहेत. मानव विकास मिशनमार्फत आठवी ते बारावी व अहिल्याबाई हाेळकर याेजनेंतर्गत पाचवी ते बारावीच्या विद्यार्थिनींसाठी माेफत पासेस उपलब्ध करून दिले जातात. ज्या ठिकाणचे पासेस आहेत. त्या मार्गावर महामंडळामार्फत बसेस चालविल्या जातात. पहिल्या दिवशीपासूनच सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती राहील यासाठी मुख्याध्यापकांनी अगाेदरच कार्यवाही करणे आवश्यक आहे; मात्र सात दिवसांचा कालावधी उलटला तरी बसेस संदर्भात अजूनही पत्र प्राप्त झाले नाही. त्यामुळे अनेक मार्गांवर बसेस नाहीत. ज्या मार्गावर कमी प्रवासी मिळतात अशा मार्गावरील बसफेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. 

डिझेलचा तुटवडा त्यात धावतात रिकाम्या बसेस आगारात डिझेलचा नेहमीच तुटवडा राहताे. महत्त्वाच्या मार्गावरील बसेस रद्द केल्या जातात; मात्र विद्यार्थिनींची गैरसाेय हाेऊ नये, यासाठी बसेस साेडल्या जातात. काही मार्गांवर विद्यार्थिनीच नसल्याने बसेस रिकाम्या धावत आहेत. यात महामंडळाला ताेटा सहन करावा लागत आहे. 

मुख्याध्यापकांनी पत्र द्यावे-    ज्या मार्गावर बसेसची गरज आहे. त्या मार्गावरील विद्यार्थिनींच्या पासेस काढण्यासाठी मुख्याध्यापकांनी पत्र देणे आवश्यक आहे; मात्र अजूनपर्यंत एकाही मुख्याध्यापकाने पासेसबाबत पत्र दिले नाही. दहा महिने कालावधीचे पास एकाचवेळी दिले जाणार आहेत.  

स्मार्ट कार्ड काढणे सुरूज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी स्मार्ट कार्ड असणे आवश्यक करण्यात आले आहे. गडचिराेली आगारात स्मार्ट कार्ड काढणे सुरू आहे. यासाठी स्वतंत्र कक्ष आहे.

निम्म्या बसेसवर कारभारगडचिराेली आगारात एकूण १०३ बसेस आहेत. त्यापैकी २० बसेस पंढरपूरच्या जत्रेसाठी गेल्या आहेत. १५ बसेस नादुरुस्त अवस्थेत सुट्ट्या भागांसाठी आगारातच उभ्या आहेत. तर ६ बसेस चंद्रपुरातील वर्कशाॅपमध्ये उभ्या आहेत.  एकूण ४१ बसेस कमी आहेत. केवळ ६२ बसेसवर आगाराचा कारभार सुरू आहे. 

 

टॅग्स :Schoolशाळाstate transportएसटी