शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
2
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
3
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
4
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
5
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
6
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
7
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
8
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
9
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
10
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
11
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
12
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
13
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
14
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
15
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
16
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
17
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
18
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
19
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
20
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र

१२ हजारांत शौचालयाचे बांधकाम होणार कसे?

By admin | Updated: November 9, 2014 23:20 IST

स्वच्छ भारत मिशन तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील कुटुंबासाठी राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक शौचालय योजनेंतर्गत शौचालय बांधकामासाठी केवळ १२ हजार रूपयांचे

गडचिरोली : स्वच्छ भारत मिशन तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील कुटुंबासाठी राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक शौचालय योजनेंतर्गत शौचालय बांधकामासाठी केवळ १२ हजार रूपयांचे अनुदान उपलब्ध करून दिले जाते. गगनाला भिडलेल्या महागाईत बांधकाम साहित्यांच्या किंमतीही प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे १२ हजार रूपयांत शौचालयाचे बांधकाम कसे करावे, असा गहण प्रश्न लाभार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे. अस्वच्छता हेच अनेक रोगांचे कारण आहे. हे शासनाच्या लक्षात आल्यानंतर मागील १० वर्षांपासून राज्यात स्वच्छता अभियान राबविल्या जात आहे. स्वच्छतेसाठी नागरिकांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी स्वच्छता राखणाऱ्या गावांना सन्मानितही करण्यात येते. गावाला पुरस्कार मिळाल्यानंतर मात्र गावकऱ्यांना स्वच्छतेचा पूर्णपणे विसर पडतो. स्वच्छता अभियानावर आजपर्यंत शासनाने कोट्यवधी रूपये खर्च केले आहेत. मात्र त्याचा अपेक्षित परिणाम दिसून आला नाही. याबाबतचे शासनाकडून मूल्यांकन करण्यात आले असता, बहुतांश नागरिकांकडे शौचालय नसल्याने नागरिक गावाच्या बाहेर किंवा शहरातील एखाद्या खुल्या जागेवर शौचास बसतात. हे शासनाच्या लक्षात आले. मात्र शौचालय बांधकामाचा खर्च अधिक असल्याने शौचालय बांधकामासाठी शासनाने पुढाकार घेतला.नगर पालिका क्षेत्रात राज्याच्या पाणीपुरवठा, स्वच्छता विभागाने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी वैयक्तिक शौचालय ही योजना सुरू केली. या योजनेंतर्गत लाभार्थ्याला शौचालय बांधकामासाठी १२ हजार रूपयांचे अनुदान दिले जात आहे. मात्र वाढलेली महागाई लक्षात घेतली तर १२ हजार रूपयात शौचालयाचा खड्डाही खोदून होणे कठीण आहे. त्यातच शौचालयाची सिट, विटा, रेती, सिमेंट, मजुरांची मजुरी, लोहा आदी खर्च कुठून करावा, असा प्रश्न लाभार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे. केंद्र व राज्य शासनाच्यावतीने स्वच्छता मोहिमेबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. गाव व शहरात स्वच्छता पाळावी, यासाठी आवाहन केले जात आहे. मात्र स्वच्छता राखण्यासाठी अत्यंत महत्वाचा घटक असलेल्या शौचालयाचे बांधकाम करण्यासाठी मात्र शासनाकडूनच अत्यंत तोकडे अनुदान उपलब्ध करून दिले जात असल्याने शासनच दुटप्पी धोरण आखत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. एकीकडे स्वच्छतेबाबत आग्रही राहायचे तर दुसरीकडे त्यासाठी आवश्यक असलेला निधीच उपलब्ध करून दिला जात नसल्याने लाभार्थी व नागरिकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. १२ हजार रूपयात शौचालयाचे अर्धेही बांधकाम पूर्ण होत नाही. ज्या लाभार्थ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती, अशा लाभार्थ्यांनी स्वत:कडचे पैसे टाकून शौचालयाचे बांधकाम केले आहे, अशी माहिती प्रत्यक्ष लाभार्थ्यांनी दिली. मात्र ज्या नागरिकांना दोन वेळच्या जेवणाची चणचण आहे, अशा लाभार्थ्यांसमोर शौचालयाचे बांधकाम कसे करावे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पैशाअभावी नागरिकांनी अपुरे बांधकाम करून ठेवले असून उसणेवारी पैसे मिळाल्यानंतर बांधकाम पूर्ण केले जाण्याची शक्यता आहे. उसणेवारी पैसे न मिळाल्यास सदर शौचालयाचे बांधकाम अपुरेच राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भाजपाचे सरकार आल्यानंतर स्वच्छता अभियान अधिक तीव्र करण्यात आले आहे. संपूर्ण देशात स्वच्छतेचा ज्वर चढला आहे. मात्र याच स्वच्छ भारत मिशन अंतर्गतही केवळ १२ हजार रूपये शौचालय बांधकामासाठी दिले जाणार असल्याने नागरिकांमध्ये या योजनेबद्दल सुद्धा नाराजी दिसून येत आहे. (नगर प्रतिनिधी)