शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

१२ हजारांत शौचालयाचे बांधकाम होणार कसे?

By admin | Updated: November 9, 2014 23:20 IST

स्वच्छ भारत मिशन तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील कुटुंबासाठी राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक शौचालय योजनेंतर्गत शौचालय बांधकामासाठी केवळ १२ हजार रूपयांचे

गडचिरोली : स्वच्छ भारत मिशन तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील कुटुंबासाठी राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक शौचालय योजनेंतर्गत शौचालय बांधकामासाठी केवळ १२ हजार रूपयांचे अनुदान उपलब्ध करून दिले जाते. गगनाला भिडलेल्या महागाईत बांधकाम साहित्यांच्या किंमतीही प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे १२ हजार रूपयांत शौचालयाचे बांधकाम कसे करावे, असा गहण प्रश्न लाभार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे. अस्वच्छता हेच अनेक रोगांचे कारण आहे. हे शासनाच्या लक्षात आल्यानंतर मागील १० वर्षांपासून राज्यात स्वच्छता अभियान राबविल्या जात आहे. स्वच्छतेसाठी नागरिकांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी स्वच्छता राखणाऱ्या गावांना सन्मानितही करण्यात येते. गावाला पुरस्कार मिळाल्यानंतर मात्र गावकऱ्यांना स्वच्छतेचा पूर्णपणे विसर पडतो. स्वच्छता अभियानावर आजपर्यंत शासनाने कोट्यवधी रूपये खर्च केले आहेत. मात्र त्याचा अपेक्षित परिणाम दिसून आला नाही. याबाबतचे शासनाकडून मूल्यांकन करण्यात आले असता, बहुतांश नागरिकांकडे शौचालय नसल्याने नागरिक गावाच्या बाहेर किंवा शहरातील एखाद्या खुल्या जागेवर शौचास बसतात. हे शासनाच्या लक्षात आले. मात्र शौचालय बांधकामाचा खर्च अधिक असल्याने शौचालय बांधकामासाठी शासनाने पुढाकार घेतला.नगर पालिका क्षेत्रात राज्याच्या पाणीपुरवठा, स्वच्छता विभागाने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी वैयक्तिक शौचालय ही योजना सुरू केली. या योजनेंतर्गत लाभार्थ्याला शौचालय बांधकामासाठी १२ हजार रूपयांचे अनुदान दिले जात आहे. मात्र वाढलेली महागाई लक्षात घेतली तर १२ हजार रूपयात शौचालयाचा खड्डाही खोदून होणे कठीण आहे. त्यातच शौचालयाची सिट, विटा, रेती, सिमेंट, मजुरांची मजुरी, लोहा आदी खर्च कुठून करावा, असा प्रश्न लाभार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे. केंद्र व राज्य शासनाच्यावतीने स्वच्छता मोहिमेबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. गाव व शहरात स्वच्छता पाळावी, यासाठी आवाहन केले जात आहे. मात्र स्वच्छता राखण्यासाठी अत्यंत महत्वाचा घटक असलेल्या शौचालयाचे बांधकाम करण्यासाठी मात्र शासनाकडूनच अत्यंत तोकडे अनुदान उपलब्ध करून दिले जात असल्याने शासनच दुटप्पी धोरण आखत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. एकीकडे स्वच्छतेबाबत आग्रही राहायचे तर दुसरीकडे त्यासाठी आवश्यक असलेला निधीच उपलब्ध करून दिला जात नसल्याने लाभार्थी व नागरिकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. १२ हजार रूपयात शौचालयाचे अर्धेही बांधकाम पूर्ण होत नाही. ज्या लाभार्थ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती, अशा लाभार्थ्यांनी स्वत:कडचे पैसे टाकून शौचालयाचे बांधकाम केले आहे, अशी माहिती प्रत्यक्ष लाभार्थ्यांनी दिली. मात्र ज्या नागरिकांना दोन वेळच्या जेवणाची चणचण आहे, अशा लाभार्थ्यांसमोर शौचालयाचे बांधकाम कसे करावे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पैशाअभावी नागरिकांनी अपुरे बांधकाम करून ठेवले असून उसणेवारी पैसे मिळाल्यानंतर बांधकाम पूर्ण केले जाण्याची शक्यता आहे. उसणेवारी पैसे न मिळाल्यास सदर शौचालयाचे बांधकाम अपुरेच राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भाजपाचे सरकार आल्यानंतर स्वच्छता अभियान अधिक तीव्र करण्यात आले आहे. संपूर्ण देशात स्वच्छतेचा ज्वर चढला आहे. मात्र याच स्वच्छ भारत मिशन अंतर्गतही केवळ १२ हजार रूपये शौचालय बांधकामासाठी दिले जाणार असल्याने नागरिकांमध्ये या योजनेबद्दल सुद्धा नाराजी दिसून येत आहे. (नगर प्रतिनिधी)