शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
4
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
5
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
6
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
7
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
8
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
9
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
10
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
11
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
12
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
13
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
14
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
15
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
16
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
17
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
18
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

चौपदरीकरणात ‘बायपास’ला आशा

By admin | Updated: January 4, 2015 23:12 IST

गडचिरोली जिल्ह्यात चार राष्ट्रीय महामार्ग मंजूर करण्यात आले आहे. या महामार्गाचे काम लवकरच निविदा प्रक्रिया काढून सुरू होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली व देसाईगंज

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात चार राष्ट्रीय महामार्ग मंजूर करण्यात आले आहे. या महामार्गाचे काम लवकरच निविदा प्रक्रिया काढून सुरू होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली व देसाईगंज या नगर पालिका क्षेत्रांमध्ये बायपास रस्ते तसेच रिंगरोडचे काम रखडलेले आहे. आता राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण होणार असल्याने त्याचवेळी या शहराच्या बायपास रस्त्याच्या कामांना त्यासोबत चालना मिळेल व बायपास रस्त्याची समस्या मार्गी लागेल, अशी आशा आहे. गडचिरोली बायपास रस्ता राज्य महामार्ग २७५ (आरमोरी रस्ता) ते राज्य महामार्ग ७ (धानोरा रस्त्याजळील लांझेडा) ते राज्य महामार्ग २८० (फॉरेस्ट डेपोजवळ) ते राज्य जिल्हा रस्ता ३१ (फॉरेस्ट नर्सरी) ते राज्य महामार्ग २७५ (सेमाना देवस्थानजवळ) ते महाराष्ट्र राज्य मार्ग ७ (नवेगावजवळ) असा असून या संपूर्ण रस्त्याची लांबी गडचिरोली तालुक्यात १०.६४ किमीची राहणार आहे. या रस्त्याच्या बांधकामासाठी १००.२७ कोटी रूपयांची खर्च अपेक्षीत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग नं. १ गडचिरोली यांनी राज्य शासनाला दिलेल्या प्रस्तावात म्हटले आहे.या रस्त्यामध्ये शेती व वनजमीनसुध्दा जाणार आहे. या बायपास रस्त्यामुळे गडचिरोली शहरातील ४२ हजार ४६८, इंदाळा येथील १ हजार २६०, नवेगाव येथील ३ हजार ६७७, मुरखळा येथील १ हजार ४१०, विसापूर येथील १ हजार ६४५, लांझेडा येथील १ हजार ९५७ लोकांना फायदा होणार आहे, असेही सार्वजनिक बांधकाम विभागाने म्हटले आहे. या बायपास मार्गासाठी ११.६५ हेक्टर जमीन वन विभागाची तर ११.६० हेक्टर जमीन खासगी शेतकी जमीन अधिग्रहीत करावी लागणार आहे. वनजमीन अधिग्रहण करण्याकरिता १८६.४० लाख रूपये खर्च येणार असून खासगी शेतकी जमीन अधिग्रहीत करण्याकरिता २३२ लाख रूपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे बांधकाम विभागाने म्हटले आहे.तसेच संदेश बोर्डासाठी १९१.५२ लाखाचा खर्च येणार आहे. रस्त्याचे बांधकाम, सीडीवर्क, छोटे पूल, रस्ता दुभाजक, फुटपाथ याकरीता ८५१२.०० लाख रूपयाचा खर्च अपेक्षित असल्याचे बांधकाम विभागाने नमूद केले आहे. तर बायपास मार्गाचे बांधकाम झाल्यानंतर विकासासाठी ४०० लाख रूपयाचा खर्च येणार आहे. एवढा निधी यापूर्वीच्या आघाडी सरकारने उपलब्ध करून दिला नाही. मागील अनेक वर्षांपासून बायपास रस्त्याच्या निर्मितीची नागरिकांना प्रतीक्षा आहे. सदर बायपास रस्त्यासाठी निधीकरिता राज्य सरकारने १७०० कोटी रूपयाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता. त्यावर अजूनही निर्णय झालेला नाही. आता केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गडचिरोली जिल्ह्यात चार राष्ट्रीय महामार्ग मंजूर केले आहेत व त्याची लवकरच निविदा प्रक्रिया होणार आहे. त्याचवेळी गडचिरोलीसह देसाईगंजच्या बायपास रस्त्याचेही काम यासोबतच केले जाईल, अशी माहिती आहे. (जिल्हा प्रतिनिधी)