शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

चौपदरीकरणात ‘बायपास’ला आशा

By admin | Updated: January 4, 2015 23:12 IST

गडचिरोली जिल्ह्यात चार राष्ट्रीय महामार्ग मंजूर करण्यात आले आहे. या महामार्गाचे काम लवकरच निविदा प्रक्रिया काढून सुरू होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली व देसाईगंज

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात चार राष्ट्रीय महामार्ग मंजूर करण्यात आले आहे. या महामार्गाचे काम लवकरच निविदा प्रक्रिया काढून सुरू होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली व देसाईगंज या नगर पालिका क्षेत्रांमध्ये बायपास रस्ते तसेच रिंगरोडचे काम रखडलेले आहे. आता राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण होणार असल्याने त्याचवेळी या शहराच्या बायपास रस्त्याच्या कामांना त्यासोबत चालना मिळेल व बायपास रस्त्याची समस्या मार्गी लागेल, अशी आशा आहे. गडचिरोली बायपास रस्ता राज्य महामार्ग २७५ (आरमोरी रस्ता) ते राज्य महामार्ग ७ (धानोरा रस्त्याजळील लांझेडा) ते राज्य महामार्ग २८० (फॉरेस्ट डेपोजवळ) ते राज्य जिल्हा रस्ता ३१ (फॉरेस्ट नर्सरी) ते राज्य महामार्ग २७५ (सेमाना देवस्थानजवळ) ते महाराष्ट्र राज्य मार्ग ७ (नवेगावजवळ) असा असून या संपूर्ण रस्त्याची लांबी गडचिरोली तालुक्यात १०.६४ किमीची राहणार आहे. या रस्त्याच्या बांधकामासाठी १००.२७ कोटी रूपयांची खर्च अपेक्षीत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग नं. १ गडचिरोली यांनी राज्य शासनाला दिलेल्या प्रस्तावात म्हटले आहे.या रस्त्यामध्ये शेती व वनजमीनसुध्दा जाणार आहे. या बायपास रस्त्यामुळे गडचिरोली शहरातील ४२ हजार ४६८, इंदाळा येथील १ हजार २६०, नवेगाव येथील ३ हजार ६७७, मुरखळा येथील १ हजार ४१०, विसापूर येथील १ हजार ६४५, लांझेडा येथील १ हजार ९५७ लोकांना फायदा होणार आहे, असेही सार्वजनिक बांधकाम विभागाने म्हटले आहे. या बायपास मार्गासाठी ११.६५ हेक्टर जमीन वन विभागाची तर ११.६० हेक्टर जमीन खासगी शेतकी जमीन अधिग्रहीत करावी लागणार आहे. वनजमीन अधिग्रहण करण्याकरिता १८६.४० लाख रूपये खर्च येणार असून खासगी शेतकी जमीन अधिग्रहीत करण्याकरिता २३२ लाख रूपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे बांधकाम विभागाने म्हटले आहे.तसेच संदेश बोर्डासाठी १९१.५२ लाखाचा खर्च येणार आहे. रस्त्याचे बांधकाम, सीडीवर्क, छोटे पूल, रस्ता दुभाजक, फुटपाथ याकरीता ८५१२.०० लाख रूपयाचा खर्च अपेक्षित असल्याचे बांधकाम विभागाने नमूद केले आहे. तर बायपास मार्गाचे बांधकाम झाल्यानंतर विकासासाठी ४०० लाख रूपयाचा खर्च येणार आहे. एवढा निधी यापूर्वीच्या आघाडी सरकारने उपलब्ध करून दिला नाही. मागील अनेक वर्षांपासून बायपास रस्त्याच्या निर्मितीची नागरिकांना प्रतीक्षा आहे. सदर बायपास रस्त्यासाठी निधीकरिता राज्य सरकारने १७०० कोटी रूपयाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता. त्यावर अजूनही निर्णय झालेला नाही. आता केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गडचिरोली जिल्ह्यात चार राष्ट्रीय महामार्ग मंजूर केले आहेत व त्याची लवकरच निविदा प्रक्रिया होणार आहे. त्याचवेळी गडचिरोलीसह देसाईगंजच्या बायपास रस्त्याचेही काम यासोबतच केले जाईल, अशी माहिती आहे. (जिल्हा प्रतिनिधी)