शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

बुलंद करा विदर्भाचा आवाज !

By admin | Updated: July 12, 2014 23:38 IST

लोकसंख्येच्या प्रमाणात लाभ मिळत नसून सर्वच बाबतीत विदर्भावर सातत्याने अन्याय होत आहे. यामुळे विदर्भाचा विकास रखडला आहे. वैदर्भीय लोकांच्या अस्मितेसाठी संघर्ष करण्याची हीच योग्य वेळ आहे.

जनजागृती कार्यक्रम : जनमंचच्या माध्यमातून विदर्भवाद्यांचे आवाहनगडचिरोली : लोकसंख्येच्या प्रमाणात लाभ मिळत नसून सर्वच बाबतीत विदर्भावर सातत्याने अन्याय होत आहे. यामुळे विदर्भाचा विकास रखडला आहे. वैदर्भीय लोकांच्या अस्मितेसाठी संघर्ष करण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यामुळे येत्या साडेतीन महिन्यात विदर्भाचा आवाज दिल्लीपर्यंत बुलंद करा, असे कळकळीचे आवाहन विदर्भवाद्यांनी केले.येथील शिवाजी महाविद्यालयात शनिवारी आयोजित ‘लढा विदर्भा’चा या कार्यक्रमात विदर्भवादी जनमंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विदर्भ राज्याची भूमिका प्रखरपणे मांडली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनमंच संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर होते. मंचावर चंद्रकांत वानखडे, विष्णू मनोहर, प्रा. शरद पाटील, अ‍ॅड. गोंविद भेंडारकर, नितीन रोगे, प्रकाश इटनकर, अरूण मुनघाटे आदी उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत वानखडे म्हणाले, विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत सरकारला काहीही सोयरसुतक नाही. केवळ पॅकेज देऊन तसेच पीककर्ज माफ करून शेतकऱ्यांना मुर्ख बनविण्याचा प्रयत्न सरकारने केला. या पॅकेज व कर्ज माफीचा सर्वाधिक फायदा पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना झाला. आजपर्यंत नेमलेल्या सरकारच्या सर्व समित्या व आयोगांनी स्वतंत्र विदर्भ राज्याचा ठराव मंजूर केला. तसेच विदर्भ राज्याची शिफारसही केली. मात्र राजकीय इच्छाशक्तीअभावी गेल्या ६० वर्षापासून विदर्भ राज्य निर्माण होऊ शकले नाही. आता विदर्भ राज्य निर्माण करण्याची योग्य वेळ आहे. विदर्भ राज्याच्या मागणीचा विचार न करणाऱ्या उमेदवारांना आगामी विधानसभा निवडणुकीत धडा शिकविल्याशिवाय राहू नका, असेही आवाहन वानखडे यांनी केले. सरकारने केलेल्या करारानुसार वैदर्भिय जनतेला लोकसंख्येच्या प्रमाणात निधी, शासकीय नोकऱ्या, शिक्षण व तंत्रशिक्षणात वाटा मिळाला पाहिजे. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील पुढाऱ्यांच्या मानसिकतेमुळे हे सर्व विदर्भाला मिळाले नाही, असेही वानखडे म्हणाले.यावेळी अ‍ॅड. अनिल किलोर म्हणाले, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षांमध्ये विदर्भातील युवकांवर अन्याय होत आहे. विदर्भातील केवळ दोन टक्केच अधिकारी नियुक्त केल्या गेले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांची संख्या अधिक असल्यामुळे शासकीय योजनांच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील लोकांचा विकास होत आहे. स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण झाल्यास विदर्भाचा झपाट्याने सर्वांगिण विकास होईल, असे अ‍ॅड. किलोर म्हणाले.प्रा. शरद पाटील म्हणाले, वैदर्भिय लोकांवर गेल्या ६० वर्षापासून सातत्याने अन्याय होत आहे. मात्र विदर्भातील पुढारी गप्पच बसतात. आता विदर्भ राज्याच्या मागणीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जनमत चाचणीत विदर्भातील लोकांनी विदर्भ राज्याच्या बाजुने ९५ टक्के कौल दिला. गरज आहे केवळ इच्छाशक्तीची. त्यामुळे वैदर्भिय लोकांनी रस्त्यावर उतरावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक अरूण पाटील मुनघाटे तर संचालन प्रा. विलास खुणे यांनी केले. (स्थानिक प्रतिनिधी)