शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर आजपासून १२ दिवस विशेष रात्रकालीन ब्लॉक
2
"...त्यावर अमित शाहांना हसू आवरलं नाही"; जागा दाखवली म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेची शिंदेवर टीका
3
एअर शोचा व्हिडीओ पाहण्यासाठी वडील युट्यूबवर शोधत होते; अचानक विंग कमांडरांच्या मृत्यूची बातमी दिसली
4
पाकिस्तानच्या तुरुंगातील खलाशांना आणा, राज्य शासनाकडे मागणी; १८ मच्छीमार तुरुंगातच!
5
Maratha Reservation: मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची आवश्यकता तरी काय? उच्च न्यायालयात युक्तिवाद 
6
४९०, ५१० किंवा ५२० रुपयांचं पेट्रोल-डिझेल टाकल्यानं फरक पडतो का? फसवणुकीपासून वाचायचं असेल तर 'या' २ गोष्टींकडे लक्ष द्या
7
IND vs SA 2nd Test : पंतही ठरला कमनशिबी! टीम इंडिया 'या' दोन बदलासह उतरली मैदानात
8
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
9
भारताविरुद्ध कारवायांसाठी पाकिस्तान बांगलादेशचा वापर करत असल्याचा आरोप; आयएसआयकडून तरुणांना प्रशिक्षण
10
Nerul: 'महाराजांवर राजकारण नको', गणेश नाईकांची अमित ठाकरेंवरील गुन्हा मागे घेण्याची मागणी
11
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
12
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
13
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
14
Air Pollution: राजधानी दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर, शाळा-महाविद्यालयांतील क्रीडा उपक्रम बंद ठेवण्याचे आदेश
15
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
16
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
17
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
18
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
19
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
Daily Top 2Weekly Top 5

पाच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 00:44 IST

जिल्ह्यात आता पावसाचा जोर वाढला असून गेल्या २४ तासात गडचिरोली, धानोरा, चामोर्शी, सिरोंचा, अहेरी या पाच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नदी, नाल्यांना पूर येऊन काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले.

ठळक मुद्देसंततधार पावसाने घरे कोसळली : तलाव व बोड्यांमधील जलसाठ्यांमध्ये वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात आता पावसाचा जोर वाढला असून गेल्या २४ तासात गडचिरोली, धानोरा, चामोर्शी, सिरोंचा, अहेरी या पाच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नदी, नाल्यांना पूर येऊन काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले.एटापल्ली : तालुक्यातील वासामुंडी मार्गावरील मरकल नाल्यावरील पुलावर पाणी चढल्याने जीव धोक्यात घालून या मार्गाने जाणारे नागरिक, वाहन चालक पुलावरून प्रवास करीत होते. एटापल्लीपासून एक किमी अंतरावर डुम्मी नाला आहे. या नाल्यावरील पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे डुम्मी व जवेली या गावांचा तालुका मुख्यालयापासून संपर्क तुटू शकतो. या पुलाची उंची वाढविण्याची मागणी होत असतानाही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पुलाजवळील डांबरी रस्त्याचा काही भाग खचला आहे. सततच्या पावसामुळे दरवर्षी हा भाग खचण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. सध्या कशीबशी एसटी जाते. पुन्हा डांबरी भाग खचल्यास वाहन जाणे कठीण होणार आहे.अहेरी : पावसामुळे अहेरी आगारातून सुटणाऱ्या एटापल्ली-जारावंडी, सिरोंचा-झिंगानूर, सिरोंचा-टेकडा या मार्गावरील बसफेऱ्या बंद ठेवण्यात आल्या होत्या.चामोर्शी : तालुक्यातील कानोली येथील मोहन मारोती देवतळे यांच्या घराची भिंत पावसामुळे ८ जुलै रोजी कोसळली. यावेळी देवतळे कुटुंब घरातच झोपले होते. सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. यामुळे १० हजार रूपयांचे नुकसान झाले. मात्र अजूनपर्यंत पंचनामा केला नसल्याची माहिती देवतळे यांनी दिली.विजेअभावी भामरागडातील जनजीवन ठप्पभामरागड तालुक्यात मागील चार दिवसांपासून सतत अतिवृष्टी सुरू आहे. शनिवारी भामरागड येथील वीज पुरवठा खंडीत झाला तेव्हापासून मंगळवारी रात्रीपर्यंत वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता. तीन दिवसांपासून सातत्याने वीज पुरवठा खंडीत असल्याने सर्वच कार्यालयांमधील बॅटऱ्या पूर्णपणे डिस्चार्ज झाल्या. विजेअभावी बँक आॅफ महाराष्ट्रमधील आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प पडले होते. शासकीय कार्यालयातीलही संगणक बंद पडल्याने शासकीय कर्मचारी केवळ कार्यालय उघडून रिकामे बसले होते. विजेअभावी पेट्रोलपंप बंद आहे. शेतीची कामे सुरू झाली आहेत. त्यामुळे काही वाहनधारक ६५ किमी अंतरावर असलेल्या आलापल्ली येथून पेट्रोल-डिेझेल आणत आहेत. बीएसएनएल सेवाही ठप्प पडली होती.भामरागडपासून चार किमी अंतरावर असलेल्या कुमरगुडा तसेच १२ किमी अंतरावर असलेल्या ताडगाव नाल्यावरील पुलावर मंगळवारी दुपारी पाणी चढले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे वाहनांची मोठी रांग लागली होती. काही वाहनधारक मात्र पाणी असतानाही पुलावरून वाहन टाकत होते. पाऊस ओसरल्याने मंगळवारी रात्री उशीरापर्यंत पुलावरील पाणी कमी होण्याची शक्यता वर्तविली जात होती.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर