शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
8
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
9
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
10
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
11
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
12
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
13
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
14
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
15
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
16
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
17
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
18
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
19
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
20
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश

पाच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 00:44 IST

जिल्ह्यात आता पावसाचा जोर वाढला असून गेल्या २४ तासात गडचिरोली, धानोरा, चामोर्शी, सिरोंचा, अहेरी या पाच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नदी, नाल्यांना पूर येऊन काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले.

ठळक मुद्देसंततधार पावसाने घरे कोसळली : तलाव व बोड्यांमधील जलसाठ्यांमध्ये वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात आता पावसाचा जोर वाढला असून गेल्या २४ तासात गडचिरोली, धानोरा, चामोर्शी, सिरोंचा, अहेरी या पाच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नदी, नाल्यांना पूर येऊन काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले.एटापल्ली : तालुक्यातील वासामुंडी मार्गावरील मरकल नाल्यावरील पुलावर पाणी चढल्याने जीव धोक्यात घालून या मार्गाने जाणारे नागरिक, वाहन चालक पुलावरून प्रवास करीत होते. एटापल्लीपासून एक किमी अंतरावर डुम्मी नाला आहे. या नाल्यावरील पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे डुम्मी व जवेली या गावांचा तालुका मुख्यालयापासून संपर्क तुटू शकतो. या पुलाची उंची वाढविण्याची मागणी होत असतानाही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पुलाजवळील डांबरी रस्त्याचा काही भाग खचला आहे. सततच्या पावसामुळे दरवर्षी हा भाग खचण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. सध्या कशीबशी एसटी जाते. पुन्हा डांबरी भाग खचल्यास वाहन जाणे कठीण होणार आहे.अहेरी : पावसामुळे अहेरी आगारातून सुटणाऱ्या एटापल्ली-जारावंडी, सिरोंचा-झिंगानूर, सिरोंचा-टेकडा या मार्गावरील बसफेऱ्या बंद ठेवण्यात आल्या होत्या.चामोर्शी : तालुक्यातील कानोली येथील मोहन मारोती देवतळे यांच्या घराची भिंत पावसामुळे ८ जुलै रोजी कोसळली. यावेळी देवतळे कुटुंब घरातच झोपले होते. सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. यामुळे १० हजार रूपयांचे नुकसान झाले. मात्र अजूनपर्यंत पंचनामा केला नसल्याची माहिती देवतळे यांनी दिली.विजेअभावी भामरागडातील जनजीवन ठप्पभामरागड तालुक्यात मागील चार दिवसांपासून सतत अतिवृष्टी सुरू आहे. शनिवारी भामरागड येथील वीज पुरवठा खंडीत झाला तेव्हापासून मंगळवारी रात्रीपर्यंत वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता. तीन दिवसांपासून सातत्याने वीज पुरवठा खंडीत असल्याने सर्वच कार्यालयांमधील बॅटऱ्या पूर्णपणे डिस्चार्ज झाल्या. विजेअभावी बँक आॅफ महाराष्ट्रमधील आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प पडले होते. शासकीय कार्यालयातीलही संगणक बंद पडल्याने शासकीय कर्मचारी केवळ कार्यालय उघडून रिकामे बसले होते. विजेअभावी पेट्रोलपंप बंद आहे. शेतीची कामे सुरू झाली आहेत. त्यामुळे काही वाहनधारक ६५ किमी अंतरावर असलेल्या आलापल्ली येथून पेट्रोल-डिेझेल आणत आहेत. बीएसएनएल सेवाही ठप्प पडली होती.भामरागडपासून चार किमी अंतरावर असलेल्या कुमरगुडा तसेच १२ किमी अंतरावर असलेल्या ताडगाव नाल्यावरील पुलावर मंगळवारी दुपारी पाणी चढले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे वाहनांची मोठी रांग लागली होती. काही वाहनधारक मात्र पाणी असतानाही पुलावरून वाहन टाकत होते. पाऊस ओसरल्याने मंगळवारी रात्री उशीरापर्यंत पुलावरील पाणी कमी होण्याची शक्यता वर्तविली जात होती.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर