शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

गॅस तुटवड्याने जिल्हाभरातील ग्राहक हैराण

By admin | Updated: February 21, 2017 00:44 IST

जिल्हाभरातील भारत गॅस एजन्सीमध्ये सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला असल्याने या एजन्सीचे ग्राहक कमालीचे त्रस्त झाले आहे.

भारत गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या रांगा : नागपूर येथील प्लान्टमध्ये लिक्विडचा तुटवडागडचिरोली : जिल्हाभरातील भारत गॅस एजन्सीमध्ये सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला असल्याने या एजन्सीचे ग्राहक कमालीचे त्रस्त झाले आहे. मागील आठ दिवसांपासून गॅसचे वाटप ठप्प पडल्याने सोमवारी सकाळपासून गडचिरोली येथील भारत गॅस एजन्सीसमोर ग्राहकांची फार मोठी रांग लागली होती. सकाळपासून रांगेमध्ये लागलेल्या ग्राहकांना दुपारी १२ वाजता संपूर्ण सिलिंडर संपल्याने खाली हातानेच परतावे लागले. गॅस सिलिंडरमध्ये लिक्वीड भरण्याचा प्लॅन्ट नागपूर येथे आहे. येथूनच संपूर्ण विदर्भात सिलिंडर भरून पाठविले जातात. मात्र मागील काही दिवसांपासून नागपूर येथील प्लॅन्टमध्ये गॅस लिक्वीडचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे एजन्सीधारकांना मागील तीन महिन्यांपासून पुरेसे सिलिंडर मिळण्यास अडचण जात आहे. गडचिरोली शहरात भारत गॅस एजन्सीचे जवळपास पाच हजार ग्राहक आहेत. दरदिवशी ७० ते ८० सिलिंडरची विक्री होते. मात्र मागील दोन महिन्यांपासून सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने सिलिंडर विक्री थांबविण्यात आली होती. सोमवारी सकाळीच सिलिंडर भरलेले वाहन गडचिरोलीत दाखल झाले. त्यामुळे सिलिंडर खरेदी करण्यासाठी भारत गॅस एजन्सीसमोर ग्राहकांची फार मोठी रांग लागली होती. काही ग्राहकांना तर १५ दिवसांपूर्वीच गॅस बुकींग करूनही गॅस मिळाली नव्हती. सकाळपासून दुपारी १२ वाजेपर्यंत ग्राहक जुना सिलिंडर धरून रांगेमध्ये लागले होते. मात्र १२ वाजताच्या सुमारास संपूर्ण सिलिंडर संपले. त्यानंतर गोदामामध्ये २० सिलिंडर होते. मात्र तेही सिलिंडर काही वेळताच संपले. त्यामुळे ७० पेक्षा अधिक ग्राहकांना परत जावे लागले. हीच परिस्थिती जिल्हाभरातील इतरही भारत गॅस एजन्सीमध्ये आहे. त्यामुळे भारत गॅस एजन्सीचे ग्राहक कमालीचे त्रस्त आहेत. ग्रामीण भागातील बहुतांश नागरिकांकडे एकच सिलिंडर उपलब्ध आहे. त्यामुळे या ग्राहकांना दुसरे सिलिंडर उपलब्ध न झाल्यास त्यांना चुलीवर स्वंयपाक केल्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. गॅस सिलिंडरच्या तुटवड्याचा प्रश्न तत्काळ निकाली काढावा, अशी मागणी होत आहे.बीपीएलधारक नागरिकांना शासनाच्या वतीने तसेच वन विभागाच्या मार्फतीनेही ग्रामीण भागातील नागरिकांना गॅसचे वितरण करण्यात आले आहे. त्यामुळे जवळपास सर्वच नागरिकांच्या घरी गॅस आहे. त्यामुळे गॅस तुटवड्याचा फटका शहरी भागातील महिलांसह ग्रामीण भागातील महिलांनाही बसला असल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)आणखी महिनाभर कायम राहणार परिस्थितीनागपूर येथील गॅस रिफिल करण्याच्या प्लान्टमध्ये लिक्विडचा तुटवडा निर्माण झाला आहे. सदर तुटवडा मागील दोन ते तीन महिन्यांपासून निर्माण झाला आहे. मात्र लिक्विडचा तुटवडा इतर गॅस एजन्सीला न निर्माण होता, भारत गॅस एजन्सीलाच का निर्माण झाला, याचे तांत्रिक कारण गडचिरोली जिल्ह्यातील गॅस एजन्सीधारकांना माहित नाही. मात्र आणखी १५ दिवस ते एक महिना गॅसचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गडचिरोलीसह नागपूर, चंद्रपूर व विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे त्याही जिल्ह्यामध्ये गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांच्या मोठमोठ्या रांगा लागत असल्याचे दिसून येत आहे. सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने मागील १५ दिवसांपासून शहरात घरपोच सिलिंडर सुविधा बंद करण्यात आली आहे.