शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल; पित्याच्या आत्महत्याप्रकरणी चार जणांना अटक
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

आरोग्य व्यवस्था कोलमडली

By admin | Updated: July 5, 2014 00:46 IST

राज्यभरातील राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी १ जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

गडचिरोली : राज्यभरातील राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी १ जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. चवथ्या दिवशीही आंदोलन सुरूच होते. त्यामुळे रूग्णांना आरोग्य सेवा मिळणे कठीण झाले आहे. विशेष करून ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याने रूग्ण व नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट अ संघटनेतर्फे १ महिन्यापूर्वी कामबंद आंदोलन केले होते. त्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी २ जून रोजी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. चर्चेदरम्यान २००९-१० मध्ये सेवा समावेशन झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पूर्वलक्षी लाभ देणे, अस्थायी बीएएमएस, डीबीएस यांचे समावेशन करणे, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६२ करणे, बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावणे, वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांप्रमाणे ३ व ६ आगाऊ वेतनवाढीचा लाभ देणे आदी समस्या १० दिवसांच्या आत मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. मात्र एक महिन्याचा कालावधी लोटूनही यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे राज्यभरातील डॉक्टरांनी ‘डॉक्टर डे’च्या दिवशीपासूनच कामबंद आंदोलनाला सुरूवात केली आहे. डॉक्टर संपावर गेल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय व जिल्हा सामान्य रूग्णालयातील आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. शहरी भागात खासगी डॉक्टरकडे जाऊन रूग्ण उपचार घेत आहेत. मात्र ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. ग्रामीण भागामध्ये खासगी डॉक्टर उपलब्ध नाही. त्यामुळे या रूग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रूग्णालयात जाऊनच उपचार करावे लागतात. मात्र रूग्णालयातील डॉक्टर संपावर गेले असल्याने काही रूग्णांना आल्यापावली परत जावे लागत आहे. पावसाळ्यात विविध साथींचे रोग ग्रामीण भागात पसरतात. नेमक्या याच वेळी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. डॉक्टर उपस्थित असतांनाही रूग्णालये हाऊसफुल राहतात. आता तर संप सुरू आहे. डॉक्टरच नसल्याने बहुतांश रूग्ण घरीच राहणे पसंत करीत आहेत. काही रूग्ण गावठी औषधी घेऊन उपचार करीत आहेत. आंदोलन आणखी काही दिवस चालल्यास आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोेलमडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शासनाने आंदोलनकर्त्या डॉक्टरांशी वाटाघाटी करून तत्काळ तोडगा काढावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.आंदोलनात राज्यभरातील सुमारे १२ हजार डॉक्टर सहभागी झाले आहेत. तर गडचिरोली जिल्ह्यातील १२० डॉक्टरांनी कामबंद आंदोलन केले आहे. जिल्ह्यातील आंदोलनकर्त्या डॉक्टरांनी नोकरीचे राजिनामे राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेचे राज्यध्यक्ष यांच्याकडे पाठविले आहेत. ११ जुलैपर्यंत कोणताही तोडगा न निघाल्यास राज्यभरातील डॉक्टर सामूहिक राजिनामे शासनाकडे सादर करणार आहेत. (नगर प्रतिनिधी)