शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

मुसळधार पावसात झाडाचा आसरा घेणेच बेतले त्याच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 13:10 IST

पऱ्ह्याच्या पेंढ्या पसरवून झाडाच्या आडोशाला गेलेल्या यश व मनीष या दोन भावंडांच्या अंगावर कडाडत वीज कोसळली आणि क्षणातच होत्याचे नव्हते झाले.

ठळक मुद्देविद्यार्थ्यावर काळाची झडप शेतातील झाडावर कोसळलेल्या वीजेने घेतला बळी

महेंद्र रामटेके ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : काळ हा कुणालाही सांगून येत नाही किंवा त्याची पुसटशी कल्पनाही कुणाला नसते. घरी आपल्या आजीशी बोलून डोंगरसावंगी येथील आपल्या नातेवाईकाच्या शेतावर रोवणीसाठी व पऱ्ह्याच्या पेंढ्या पसरविण्यासाठी गेलेल्या वडधा येथील यश वेणुदास राऊत या १६ वर्षीय विद्यार्थ्यावरही वीज बनून आलेल्या काळाने अचानक झडप घातली. पऱ्ह्याच्या पेंढ्या पसरवून झाडाच्या आडोशाला गेलेल्या यश व मनीष या दोन भावंडांच्या अंगावर कडाडत वीज कोसळली आणि क्षणातच होत्याचे नव्हते झाले.

एका झटक्यात यशला काळाने हिरावले तर त्याचा चुलत भाऊ मनीष गंभीर जखमी झाला. त्याच्यावर आरमोरीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. सर्वांचा लाडका असलेल्या यशच्या अचानक जाण्याने गावकरी हेलावून गेले. अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला. पण त्यांच्या हळहळण्याने यश परत येणार नव्हता.यश अवघ्या दोन महिन्यांचा असताना त्याच्या डोक्यावरून आईचे छत्र हरपले. जन्मदात्या आईचे प्रेम, वात्सल्य व ममतेचा स्पर्शही त्याला अनुभवता आला नाही. तान्ह्या वयात त्याच्या आजी व काकाने त्याला तळहाताच्या फोळाप्रमाणे जपले. त्याचा सांभाळ करून त्याला आईवडिलांचे प्रेम दिले. त्याच्या हसण्याखेळण्याने घर कसे आनंदाने न्हाऊन निघत होते.

यश हा वृद्ध आजीचा आधारवड होता. घरची परिस्थिती गरीबीची असतानाही त्याला चांगले शिक्षण देण्याचे व खूप शिकविण्याची काका व आजीची इच्छा होती. तो वडधा येथील किसान विद्यालयात इयत्ता दहावीमध्ये यावर्षी शिक्षण घेणार होता. मात्र अचानक काळाने त्याच्यावर झडप मारली आणि त्याला आपल्या कवेत घेतले. क्षणात हसत्या खेळत्या यशला आपल्यातून हिरावून नेले. जीवनात चांगले शिक्षण घेऊन मोठे होण्याचे स्वप्न बघणाऱ्या यशला हे जीवनच सोडून कायमचे निघून जावे लागले.

सोमवारी सकाळी जेवण करून आजी व काकासोबत बोलून यश इतर महिला मजुरांसोबत डोंगरसावंगी येथे गेला. यश व मनीष शेतावर धानाच्या पेंढ्या पसरवित होते. अचानक दुपारी २ वाजताच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाला सुरूवात झाली. पाऊस व कडाडणाºया विजेपासून बचाव करण्याकरिता त्यांनी बांधालगतच्या मोठ्या किनीच्या झाडाचा आसरा घेतला. दरम्यान याच झाडावर वीज कोसळली आणि क्षणातच विजेच्या धक्क्याने यशचा दुदैवी मृत्यू झाला तर मनीष गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ ट्रॅक्टरने आरमोरीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेची माहिती आजी कौशल्या आणि काका दिलीप यांना कळताच त्यांना धक्काच बसला. घरातील एकुलता एक असलेल्या व आजीच्या कुशीत वाढलेल्या यशच्या अचानक जाण्याने आजीसह संपूर्ण राऊत कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

शाळा बंद असल्याने झाला घातवडधा येथील यश व मनीष राऊत या चुलत भावंडांची जोडी ही राम-लक्ष्मणासारखी होती. अत्यंत शांत, संयमी व सुस्वभावी असलेल्या यशला कुणीही कोणतेही काम सांगितले तरी तो नाही म्हणायचा नाही. दोघेही भाऊ शाळेत मिळूनच जायचे. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने यावर्षी यश व मनीष हे भावंड आत्या-मामाच्या गावी डोंगरसावंगी येथे गेले. ऋषी रोहणकर यांच्या शेतात रोवणीसाठी धान रोपाच्या पेंढ्या पसरविण्यासाठी हे दोन भावंड चार ते पाच दिवसांपासून गावातील इतर मजुरांसोबत जात होते. दिवसभर शेतात पेंढ्या पसरविणे व सायंकाळी पुन्हा स्वत:च्या गावी वडधाला परतणे हा त्यांचा दिनक्रम होता.

अन् वाचला अनेकांचा जीवडोंगरसावंगीच्या ऋषी रोहणकर यांच्या शेतातील धानपीक रोवणीच्या कामावर त्या दिवशी अनेक महिला मजूर होते. सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास अचानक मेघगर्जनेसह पावसाला सुरूवात झाल्यानंतर यश व मनिष झाडाखाली आसरा घेण्यासाठी आले. पण रोवणीचे थोडेच काम शिल्लक असल्यामुळे महिला मजूर पावसातच रोवणी करीत होत्या. पाच मिनीट आधी त्यांची रोवणी संपली असती तर सर्व मजूरही या यश आणि मनीष थांबले त्याच झाडाखाली गेले असते आणि यापेक्षाही मोठी दुर्घटना घडली असती. या घटनेने त्या मजुरांना ‘काळ आला होता पण वेळ नाही’ याचा प्रत्यय आला.

टॅग्स :Deathमृत्यू