शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

कंबरभर पाण्यातून त्याने काढला मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2022 05:00 IST

गोसीखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने संध्याकाळपर्यंत गाढवी नदीची पाणीपातळी चांगलीच वाढली होती. आरमोरी-वैरागड मार्गावरील रामाळा घाटावरच्या पुलावर ३ ते ४ फूट पाणी होते. अशाही स्थितीत घरी पोहोचण्यासाठी या शेतकऱ्याने कमरेपेक्षा जास्त पाणी असताना पुलावरून चालत पैलतीर गाठण्याचे ठरविले. त्यांचे हे धाडस अपघाताला आमंत्रण देणारे ठरले असते. पण ते कसेतरी पैलतीर गाठण्यात यशस्वी झाले.

लाेकमत न्यूज नेटवर्कवैरागड : वैरागड ते आरमोरी मार्गावरील रामाळा घाटामध्ये असलेल्या गाढवी नदीच्या पुलावरून बुधवारी कमरेपेक्षा जास्त पाणी वाहत होते. अशा स्थितीतही जीव धोक्यात घालून एका शेतकऱ्याने पूल ओलांडण्याचे धाडस दाखविले. त्याचा हा प्रयत्न यशस्वी झाला असला तरी असे नसते धाडस जीवावर बेतण्याची शक्यता असते. त्यामुळे असा प्रयत्न कोणीही करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. प्राप्त माहितीनुसार, आरमोरी येथील एका शेतकऱ्याची रामाळा येथे शेती आहे. बुधवारी तो शेतावर गेला होता. दरम्यान, गोसीखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने संध्याकाळपर्यंत गाढवी नदीची पाणीपातळी चांगलीच वाढली होती. आरमोरी-वैरागड मार्गावरील रामाळा घाटावरच्या पुलावर ३ ते ४ फूट पाणी होते. अशाही स्थितीत घरी पोहोचण्यासाठी या शेतकऱ्याने कमरेपेक्षा जास्त पाणी असताना पुलावरून चालत पैलतीर गाठण्याचे ठरविले. त्यांचे हे धाडस अपघाताला आमंत्रण देणारे ठरले असते. पण ते कसेतरी पैलतीर गाठण्यात यशस्वी झाले.

पोलीस बंदोबस्त ठेवा वास्तविक पुराच्या पाण्याचा वेग अधिक असतो. याशिवाय खाली गाळ जमलेला असल्यामुळे पाण्यातून जाताना पाय घसरण्याची शक्यता असते. त्यामुळे असे धाडस कोणी करू नये आणि अनुचित घटना टाळण्यासाठी अशा पुलांच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर