शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

दिव्यांगांसाठी 350 गुन्हे डोक्यावर घेऊन फिरतोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 08:54 IST

बच्चू कडू : १७ जिल्ह्यांत गेलो, दिव्यांगांच्या दारी अभियानात दोनच ठिकाणी आमदार

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली :  दिव्यांगांच्या कल्याणासाठी डोक्यावर साडेतीनशे गुन्हे घेऊन फिरतो, चार गुन्ह्यांत दोन वर्षांची शिक्षाही झाली. मात्र, दिव्यांगांना न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका  घेऊन दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी हा उपक्रम सुरू आहे. आतापर्यंत १७ जिल्ह्यांत गेलो; पण दोनच ठिकाणी आमदार कार्यक्रमांना उपस्थित होते, अशा शब्दांत दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष व आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी खंत व्यक्त केली.  दिव्यांग या व्यक्ती पहाडाएवढे दु:ख घेऊन जगतात, त्यांच्या वेदना समजून घ्या, असे भावनिक आवाहनही त्यांनी केले. जिल्हा प्रशासनाच्या दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी कार्यक्रम आरमोरी रोडवरील संस्कृती लॉनमध्ये २७ सप्टेंबरला झाला. यावेळी आमदार कृष्णा गजबे, डॉ. देवराव होळी, जिल्हाधिकारी संजय मीणा, जि. प. सीईओ आयुषी सिंह, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांची उपस्थिती होती. 

यावेळी बच्चू कडू म्हणाले, १५ वर्षांपासून दिव्यांगांच्या न्याय-हक्कासाठी लढत आहे. विधानसभेत एकही भाषण दिव्यांगांचा शब्द उच्चारल्याशिवाय केलेले नाही.  या दरम्यान ३५० गुन्हे नोंद झाले. चार गुन्ह्यांत दोन वर्षांची शिक्षा झाली; पण ८२ शासन निर्णय काढण्यात यश आले. दिव्यांगांसाठीचा ५ टक्के निधी खर्च झाला पाहिजे, त्यांना सोयी- सवलती मिळाल्या पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सगळीच कामे राजकारणासाठी करायची नसतात तर कर्तव्य म्हणूनही करावी लागतात, हे कर्तव्य सर्वांनी पार पाडावे, लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांनीही यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात दिव्यांंगांना विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी केले. जि. प. सीईओ आयुषी सिंह, आमदार कृष्णा गजबे, डॉ. देवराव होळी यांची भाषणे झाली. दीड हजारांवर लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला. मित्र संस्थेचे अभिजित राऊत यांनी शिबिर यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

उपमुख्यमंत्र्यांसह खासदार, मंत्रीही अनुपस्थितया कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, खासदार अशोक नेते यांच्यासह आमदार अभिजित वंजारी, सुधाकर अडबाले, डॉ. रामदास अंबटकर  निमंत्रित होते; पण या सर्वांचीच अनुपस्थिती होती. 

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूGadchiroliगडचिरोली