शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

खोदतळी शेतीसाठी हरित संजीवनी

By admin | Updated: September 24, 2015 01:55 IST

जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी वन विभागाच्या पुढाकारातून खोदतळी खोदण्यात आली.

आरमोरी वन परिक्षेत्र : जलयुक्त शिवार योजना फळाला; शेतकऱ्यांमध्ये समाधानजोगीसाखरा : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी वन विभागाच्या पुढाकारातून खोदतळी खोदण्यात आली. त्यामुळे मजुरांना रोजगार तर मिळालाच शिवाय पाण्याची योग्य साठवणूकही झाली. याचाच प्रत्यय आरमोरी तालुक्यातही आला. आरमोरी वन परिक्षेत्रात खोदतळी वन विभागाच्या पुढाकारातून अनेक ठिकाणी निर्माण केल्याने या भागातील शेतीसाठी हरित संजीवनी प्राप्त झाली आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. आरमोरी वन परिक्षेत्रात अनेक ठिकाणी खोदतळी निर्माण करण्यात आली. नव्याने रूजू झालेले वन परिक्षेत्राधिकारी पी. आर. तांबटकर यांनी वन व वन्य प्राण्यांचे संरक्षण व्हावे, त्याबरोबरच जंगलातील वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करताना गावालगत जाऊन बळी पडण्याची वेळ येऊ नये, याकरिता जंगलात खोदतळी निर्माण करून बारमाही पाणी साठ्याची व्यवस्था केली. ठिकठिकाणी पाण्याची पातळी वाढविण्याचे पर्याय शोधण्यात आले. कर्तव्य व जबाबदारी स्वीकारून मोठ्या उत्साहाने वन परिक्षेत्रात तलावाची निर्मिती केली. तसेच शेतीसाठी पाण्याचा वापर होईल, अशी संकल्पना त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मांडली. वन परिक्षेत्रात खोदतळी निर्माण केल्याने पावसाळ्यात विविध ठिकाणी पाणी साचल्याने त्यांचे परिश्रम फळाला आले आहे. जलयुक्त शिवार योजनेतून खोदतळे निर्मिती, तलावांचे मजबुतीकरण, खोलीकरण केल्याने पाण्याच्या साठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे वन परिक्षेत्रात शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. (वार्ताहर)