शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
3
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
5
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
6
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
7
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
8
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
9
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
10
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
11
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
12
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
13
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
14
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
15
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
16
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
17
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
18
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
19
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
20
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल

निम्मे सत्र संपले; पण दोन तालुक्यांत शालेय गणवेशाचे अजूनही वाटप नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 15:38 IST

जुन्याच कपड्यांवर शाळेची वारी : पुरवठा करणाऱ्या यंत्रणेकडून होताहे दिरंगाई

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : नवीन शैक्षणिक सत्र सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटत आहे. महिनाभरानंतर हे सत्र संपून दिवाळीच्या सुट्याही लागतील; परंतु अजूनपर्यंत शालेय २८ हजारांवर विद्यार्थ्यांना गणवेशाचा पुरवठा करण्यात आलेला नाही. जुन्याच गणवेशात विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागत आहे, तर भामरागड व एटापल्ली तालुक्यात गणवेश पोहोचलेच नाहीत. गणवेश पुरवठा करणाऱ्या 'माविम' यंत्रणेचे नियोजन फिस्कटले की, शिक्षण विभागाचे हा चौकशीचा मुद्दा आहे. 

मागील शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांना दोन गणवेशाचा पुरवठा शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून करण्यात आलेला होता. तेव्हा विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीलाच गणवेश पुरवठा करण्यात आलेला होता; परंतु यावर्षी महिला आर्थिक विकास महामंडळाकडे गणवेश वितरणाचे टेंडर दिल्याने गणवेश वितरणासाठी दिरंगाई होत आहे. जिल्हाभरातील शाळांना वेळेत गणवेश पुरवठा करण्यात शिक्षण विभागासह माविमच्या यंत्रणेला अपयश आल्याचे दिसून येत आहे. 

६८,२३५ विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश 

  • जिल्ह्यात ६८ हजार २३५ विद्यार्थ्यांना गणवेश वितरण होणार आहे. आतापर्यंत जवळपास ४० हजार विद्यार्थ्यांना गणवेशाचा पुरवठा करण्यात आलेला आहे. अजूनही २८ हजारांवर मुलांना गणवेश वाटप करण्यात आलेले नाही. 
  • २० सप्टेंबरपर्यंत केवळ ३४ हजार ५८३ विद्यार्थ्यांनाच गणवेशाचा पुरवठा केलेला होता. भामरागड व एटापल्ली तालुक्यात गणवेश पोहोचविण्यात आलेले नव्हते.

 यंत्रणांचे एकमेकांवर खापरशासनाकडून जवळपास एक महिना कापड उशिरा प्राप्त झाले. त्यामुळे वेळेत कापड शिवून झाले नाही. पुरवठा कमी असल्याचे आढळल्याने अनेक मुख्याध्यापकांनी गणवेश परत केले, उशिरा पुरवठ्यामुळे गणवेश पुरवठा झाला नसल्याचे माविमचे म्हणणे आहे; परंतु मनुष्यबळ कमी असल्याचे कारण माविमचे अधिकारी देत नाही. केवळ एकमेकांवर खापर फोडण्याचे काम सुरू असल्याचे दिसून येते. लवकर गणवेश पुरवठा न झाल्यास आंदोलन करणार, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते राज बन्सोड यांनी दिला आहे. 

गणवेश वितरणासाठी जुन्याच पटसंख्येचा आधार 

  • भरतीपात्र विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन गणवेश वितरणासाठी नवीन पटसंख्येचा आधार घेऊन नियोजन करणे आवश्यक होते; परंतु गणवेश वितरणासाठी मागील शैक्षणिक सत्रातील विद्यार्थी पटसंख्या ग्राह्य धरून गणवेश वाटप सुरू करण्यात आले.
  • त्यामुळे बहुतांश शाळांच्या मुख्याध्यापकांनी गणवेश स्वीकारण्यास नकार दिला. कमी गणवेशामुळे गणवेश कोणाला द्यायच हा त्यांच्यासमोर प्रश्न होता. मुख्याध्यापकांनी गणवेश स्वीकारले असते तर मुलांना गणवेश मिळाला नाही अशा तक्रारी आल्या असत्या. 
टॅग्स :Gadchiroliगडचिरोली