शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
2
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
3
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
4
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
5
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
6
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
7
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
8
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
9
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
10
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
11
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
12
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
13
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
14
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
15
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
16
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
17
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
18
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
19
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

निम्मे सत्र संपले; पण दोन तालुक्यांत शालेय गणवेशाचे अजूनही वाटप नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 15:38 IST

जुन्याच कपड्यांवर शाळेची वारी : पुरवठा करणाऱ्या यंत्रणेकडून होताहे दिरंगाई

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : नवीन शैक्षणिक सत्र सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटत आहे. महिनाभरानंतर हे सत्र संपून दिवाळीच्या सुट्याही लागतील; परंतु अजूनपर्यंत शालेय २८ हजारांवर विद्यार्थ्यांना गणवेशाचा पुरवठा करण्यात आलेला नाही. जुन्याच गणवेशात विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागत आहे, तर भामरागड व एटापल्ली तालुक्यात गणवेश पोहोचलेच नाहीत. गणवेश पुरवठा करणाऱ्या 'माविम' यंत्रणेचे नियोजन फिस्कटले की, शिक्षण विभागाचे हा चौकशीचा मुद्दा आहे. 

मागील शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांना दोन गणवेशाचा पुरवठा शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून करण्यात आलेला होता. तेव्हा विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीलाच गणवेश पुरवठा करण्यात आलेला होता; परंतु यावर्षी महिला आर्थिक विकास महामंडळाकडे गणवेश वितरणाचे टेंडर दिल्याने गणवेश वितरणासाठी दिरंगाई होत आहे. जिल्हाभरातील शाळांना वेळेत गणवेश पुरवठा करण्यात शिक्षण विभागासह माविमच्या यंत्रणेला अपयश आल्याचे दिसून येत आहे. 

६८,२३५ विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश 

  • जिल्ह्यात ६८ हजार २३५ विद्यार्थ्यांना गणवेश वितरण होणार आहे. आतापर्यंत जवळपास ४० हजार विद्यार्थ्यांना गणवेशाचा पुरवठा करण्यात आलेला आहे. अजूनही २८ हजारांवर मुलांना गणवेश वाटप करण्यात आलेले नाही. 
  • २० सप्टेंबरपर्यंत केवळ ३४ हजार ५८३ विद्यार्थ्यांनाच गणवेशाचा पुरवठा केलेला होता. भामरागड व एटापल्ली तालुक्यात गणवेश पोहोचविण्यात आलेले नव्हते.

 यंत्रणांचे एकमेकांवर खापरशासनाकडून जवळपास एक महिना कापड उशिरा प्राप्त झाले. त्यामुळे वेळेत कापड शिवून झाले नाही. पुरवठा कमी असल्याचे आढळल्याने अनेक मुख्याध्यापकांनी गणवेश परत केले, उशिरा पुरवठ्यामुळे गणवेश पुरवठा झाला नसल्याचे माविमचे म्हणणे आहे; परंतु मनुष्यबळ कमी असल्याचे कारण माविमचे अधिकारी देत नाही. केवळ एकमेकांवर खापर फोडण्याचे काम सुरू असल्याचे दिसून येते. लवकर गणवेश पुरवठा न झाल्यास आंदोलन करणार, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते राज बन्सोड यांनी दिला आहे. 

गणवेश वितरणासाठी जुन्याच पटसंख्येचा आधार 

  • भरतीपात्र विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन गणवेश वितरणासाठी नवीन पटसंख्येचा आधार घेऊन नियोजन करणे आवश्यक होते; परंतु गणवेश वितरणासाठी मागील शैक्षणिक सत्रातील विद्यार्थी पटसंख्या ग्राह्य धरून गणवेश वाटप सुरू करण्यात आले.
  • त्यामुळे बहुतांश शाळांच्या मुख्याध्यापकांनी गणवेश स्वीकारण्यास नकार दिला. कमी गणवेशामुळे गणवेश कोणाला द्यायच हा त्यांच्यासमोर प्रश्न होता. मुख्याध्यापकांनी गणवेश स्वीकारले असते तर मुलांना गणवेश मिळाला नाही अशा तक्रारी आल्या असत्या. 
टॅग्स :Gadchiroliगडचिरोली