शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

निम्मे सत्र संपले; पण दोन तालुक्यांत शालेय गणवेशाचे अजूनही वाटप नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 15:38 IST

जुन्याच कपड्यांवर शाळेची वारी : पुरवठा करणाऱ्या यंत्रणेकडून होताहे दिरंगाई

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : नवीन शैक्षणिक सत्र सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटत आहे. महिनाभरानंतर हे सत्र संपून दिवाळीच्या सुट्याही लागतील; परंतु अजूनपर्यंत शालेय २८ हजारांवर विद्यार्थ्यांना गणवेशाचा पुरवठा करण्यात आलेला नाही. जुन्याच गणवेशात विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागत आहे, तर भामरागड व एटापल्ली तालुक्यात गणवेश पोहोचलेच नाहीत. गणवेश पुरवठा करणाऱ्या 'माविम' यंत्रणेचे नियोजन फिस्कटले की, शिक्षण विभागाचे हा चौकशीचा मुद्दा आहे. 

मागील शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांना दोन गणवेशाचा पुरवठा शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून करण्यात आलेला होता. तेव्हा विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीलाच गणवेश पुरवठा करण्यात आलेला होता; परंतु यावर्षी महिला आर्थिक विकास महामंडळाकडे गणवेश वितरणाचे टेंडर दिल्याने गणवेश वितरणासाठी दिरंगाई होत आहे. जिल्हाभरातील शाळांना वेळेत गणवेश पुरवठा करण्यात शिक्षण विभागासह माविमच्या यंत्रणेला अपयश आल्याचे दिसून येत आहे. 

६८,२३५ विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश 

  • जिल्ह्यात ६८ हजार २३५ विद्यार्थ्यांना गणवेश वितरण होणार आहे. आतापर्यंत जवळपास ४० हजार विद्यार्थ्यांना गणवेशाचा पुरवठा करण्यात आलेला आहे. अजूनही २८ हजारांवर मुलांना गणवेश वाटप करण्यात आलेले नाही. 
  • २० सप्टेंबरपर्यंत केवळ ३४ हजार ५८३ विद्यार्थ्यांनाच गणवेशाचा पुरवठा केलेला होता. भामरागड व एटापल्ली तालुक्यात गणवेश पोहोचविण्यात आलेले नव्हते.

 यंत्रणांचे एकमेकांवर खापरशासनाकडून जवळपास एक महिना कापड उशिरा प्राप्त झाले. त्यामुळे वेळेत कापड शिवून झाले नाही. पुरवठा कमी असल्याचे आढळल्याने अनेक मुख्याध्यापकांनी गणवेश परत केले, उशिरा पुरवठ्यामुळे गणवेश पुरवठा झाला नसल्याचे माविमचे म्हणणे आहे; परंतु मनुष्यबळ कमी असल्याचे कारण माविमचे अधिकारी देत नाही. केवळ एकमेकांवर खापर फोडण्याचे काम सुरू असल्याचे दिसून येते. लवकर गणवेश पुरवठा न झाल्यास आंदोलन करणार, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते राज बन्सोड यांनी दिला आहे. 

गणवेश वितरणासाठी जुन्याच पटसंख्येचा आधार 

  • भरतीपात्र विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन गणवेश वितरणासाठी नवीन पटसंख्येचा आधार घेऊन नियोजन करणे आवश्यक होते; परंतु गणवेश वितरणासाठी मागील शैक्षणिक सत्रातील विद्यार्थी पटसंख्या ग्राह्य धरून गणवेश वाटप सुरू करण्यात आले.
  • त्यामुळे बहुतांश शाळांच्या मुख्याध्यापकांनी गणवेश स्वीकारण्यास नकार दिला. कमी गणवेशामुळे गणवेश कोणाला द्यायच हा त्यांच्यासमोर प्रश्न होता. मुख्याध्यापकांनी गणवेश स्वीकारले असते तर मुलांना गणवेश मिळाला नाही अशा तक्रारी आल्या असत्या. 
टॅग्स :Gadchiroliगडचिरोली