शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

पर्लकोटावरील पूल अर्धा किलोमीटरचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 06:00 IST

केंद्र शासनाने आलापल्ली-भामरागड-लाहेरी हा राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केला आहे. या महामार्गावर हेमलकसा ते भामरागडदरम्यान पर्लकोटा नदी आहे. सदर नदी अगदी भामरागडला लागून आहे. या नदीवर असलेला सद्यस्थितीमधील पूल १९८५ मध्ये बांधला होता. या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात या पुलावरून वारंवार पाणी वाहून वाहतूक ठप्प पडत असल्याने भामरागडसह तालुक्यातील शंभरावर गावांचा संपर्क तुटतो.

ठळक मुद्दे७८ कोटी रुपयांचा बजेट : १ मार्चपासून होणार प्रत्यक्ष कामाला सुरूवात, शेकडो गावांना मिळणार दिलासा

रमेश मारगोनवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : पर्लकोटा नदीवर पूल बांधण्याचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून नवीन पुलाची लांबी ०.५७६ किमी म्हणजे आताच्या पुलापेक्षा जवळपास दुप्पट राहणार आहे. १ मार्चपासून प्रत्यक्ष या कामाला सुरूवात होणार असल्याचे राष्ट्रीयय महामार्ग प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.केंद्र शासनाने आलापल्ली-भामरागड-लाहेरी हा राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केला आहे. या महामार्गावर हेमलकसा ते भामरागडदरम्यान पर्लकोटा नदी आहे. सदर नदी अगदी भामरागडला लागून आहे. या नदीवर असलेला सद्यस्थितीमधील पूल १९८५ मध्ये बांधला होता. या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात या पुलावरून वारंवार पाणी वाहून वाहतूक ठप्प पडत असल्याने भामरागडसह तालुक्यातील शंभरावर गावांचा संपर्क तुटतो. केंद्र शासनाने आलापल्ली-लाहेरी हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग घोषित केल्यानंतर पर्लकोटा नदीवर पूल होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. ती आता लवकरच पूर्णत्वास येणार आहे.कंत्राटदाराने नदी पात्रात माती परीक्षणाचे काम चार दिवसांपूर्वी सुरू केले होते. मात्र परवानगी घेतली नसल्याचे कारण सांगून वन विभागाने काम थांबविले आहे. परवानगी मागितल्यानंतर वन विभाग परवानगी देणार आहे. त्यामुळे पुलाचे काम अडणार नाही. दोन्ही विभागाच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर सर्व अडसर दूर होतील. १ मार्चपासून प्रत्यक्षात कामाला सुरूवात होणार आहे. पावसाळ्यापर्यंत बांधकामासाठी चार महिन्यांचा कालावधी मिळणार असल्याने तोपर्यंत अर्ध्या पिलरचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. पावसाळ्यात नदीत पाणी राहत असल्याने काम करणे शक्य होत नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता विवेक मिश्रा यांनी मंगळवारी पुलाच्या प्रस्तावित कामाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी आलापल्ली उपविभागाचे कनिष्ठ अभियंता धनपाल मंडपे उपस्थित होते.सध्याच्या पुलापेक्षा दुप्पट लांबीनवीन पुलाची लांबी ०.५७६ किलोमीटर राहणार आहे. या पुलाला २४ मीटरचे २४ गाळे राहणार आहेत. विद्यमान पूल २८८ मीटर रूंदीचा आहे. त्याला ८ मीटरचे ३६ गाळे आहेत. नवीन पुलाच्या जोडरस्त्यांची लांबी ०.५२४ किमी तर एकूण लांबी १.१० किमी राहणार आहे. हा पूल १६ मीटर रूंदीचा आहे. मात्र त्यात वहन मार्गाची रूंदी ११ मीटर राहणार आहे. या पुलाच्या बांधकामाची एकूण किंमत ७७.९८ कोटी रुपये आहे. छत्तीसगडमधील कंत्राटदाराकडून हे काम केले जाणार असून दोन वर्षात काम पूर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. या पुलाच्या जोड रस्त्यांची लांबी गावात पोलीस स्टेशनच्या जवळपर्यंत राहणार आहे. पुलामुळे गाव दोन भागात विभागल्या जाण्याची शक्यता असल्याने पुलाला इतर रस्ते जोडले जातील.

टॅग्स :riverनदी