शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

४६ वर्षांपासून पूल अर्धवटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 06:00 IST

विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चामोर्शी तालुक्याच्या मार्र्कंडादेव येथे महामुनी मार्र्कंडेश्वराचे पुरातन मंदिर आहे. महाशिवरात्रीनिमित्त येथे २१ फेब्रुवारीपासून १० दिवस जत्रा भरणार आहे. मात्र गेल्या ४६ वर्षांपासून वैनगंगा नदीपात्रातील अर्धवट पूल तसाच कायम आहे. परिणामी गडचिरोली जिल्ह्याबाहेरील भाविकांना नदीतून कसरत करत मार्र्कंडेश्वराचे मंदिर गाठावे लागते.

ठळक मुद्देमार्र्कं डादेव येथील समस्या : जिल्ह्याबाहेरील भाविकांची ससेहोलपट कायम

संतोष सुरपाम ।लोकमत न्यूज नेटवर्कमार्र्कंडादेव : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चामोर्शी तालुक्याच्या मार्र्कंडादेव येथे महामुनी मार्र्कंडेश्वराचे पुरातन मंदिर आहे. महाशिवरात्रीनिमित्त येथे २१ फेब्रुवारीपासून १० दिवस जत्रा भरणार आहे. मात्र गेल्या ४६ वर्षांपासून वैनगंगा नदीपात्रातील अर्धवट पूल तसाच कायम आहे. परिणामी गडचिरोली जिल्ह्याबाहेरील भाविकांना नदीतून कसरत करत मार्र्कंडेश्वराचे मंदिर गाठावे लागते. भाविकांकडून सातत्याने मागणी होऊनही प्रशासनाने सदर पुलाचे काम पूर्ण केलेले नाही.मार्र्कंडेश्वर मंदिराच्या पायथ्यापासून वैनगंगा नदी वाहते. याच वैनगंगा नदीवर गेल्या ४६ वर्षांपूर्वी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याला जोडणाºया पुलाचे काम हाती घेण्यात आले. सदर पूल अद्यापही अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे भाविकांना यात्रेदरम्यान त्रास सहन करावा लागतो. प्रशासनाच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त भरणाºया यात्रेदरम्यान भाविकांसाठी सिमेंटच्या रिकाम्या पिशव्यांमध्ये रेती भरून तात्पुरत्या स्वरूपाचा रपटा तयार करण्यात येतो. यावर्षी सुद्धा असा रपटा तयार करण्यात आला आहे. रपटा बनविण्यावर आतापर्यंत लाखो रुपये खर्च झाले आहे. मात्र येथील समस्या कायमस्वरूपी मार्गी लागली नाही. मार्र्कंडा या तीर्थस्थळी दरवर्षी राज्य शासनाचे अनेक मंत्री, खासदार, आमदार, प्रशासकीय अधिकारी भेट देऊन पाहणी करतात. समस्या जाणून घेऊन त्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र त्यानंतर कुठलीही कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही. परिणामी नदीपात्रातील अर्धवट पूल आजही अनेक वर्षांपासून ‘जैसे थे’ स्थितीत आहे.२१ फेब्रुवारीपासून येथे सुरू होणाऱ्या जत्रेला चंद्रपूर जिल्ह्यातील लाखो भाविक मार्र्कंडेश्वराच्या दर्शनासाठी येतात. त्यांना कच्च्या स्वरूपाच्या रपट्यावरून पायी ये-जा करावी लागते. पावसाळ्यात पुलाअभावी हा मार्ग बंद असतो. आता तरी शासनाने मार्र्कंडा येथील वैनगंगा नदीपात्रातील अर्धवट पुलाचे काम पूर्ण करावे, अशी अपेक्षा समस्ता शिवप्रेमी भाविकांकडून केली जात आहे.जिल्हा प्रशासन जबाबदारी घेणार का?मार्र्कंडादेव येथे मार्र्कंडेश्वराचे पुरातन तीर्थस्थळ आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. मार्र्कंडेश्वर देवस्थान ट्रस्ट, मराठा धर्मशाळा व इतर ट्रस्टतर्फे अनेक उपक्रम वर्षभर राबविले जातात. या कार्यक्रमाच्या निमित्ताने येथे भाविकांची नेहमी वर्दळ असते. यात चंद्रपूर जिल्ह्यातील भाविकांचाही मोठा सहभाग असतो. मात्र नदीपात्रात पूल नसल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील भाविकांना अधिकचे अंतर कापून तसेच फेरा मारून यावे लागते. जत्रेच्या सर्व सोयीसुविधा पुरविण्याची व नियोजनाची जबाबदारी तहसील कार्यालय चामोर्शी यांच्याकडे आहे. शिवाय गडचिरोली जिल्हा प्रशासनाचाही या मंदिराशी संबंध आहे. मात्र नदीपात्रात मजबूत स्वरूपाचा पूल बांधण्यासाठी कोणत्याही यंत्रणेने आजपर्यंत गांभीर्याने लक्ष घातलेले नाही. त्यामुळे नदीपात्रात पूल उभारण्याची जबाबदारी नेमकी कुणाची, असा प्रश्न भाविकांकडून उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :riverनदी