शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

गुरूजी, शाळा कधी सुरू होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 05:01 IST

विसोरा येथील शेकडो विद्यार्थी तथा पालकांशी प्रत्यक्ष भेट घेऊन कोरोनाने बंद असलेली शाळा पुन्हा सुरू झाल्यास आपण आपल्या पाल्यास शाळेत पाठवायला तयार आहात का यावर वातार्लाप केला असता विद्यार्थी, पालकांनी अगदी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. मार्च महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात सुरू झालेला कोरोना लॉकडॉऊन दिवसेंदिवस अनलॉक होत असला तरी शाळा त्याला अपवाद ठरत आहे. एकूणच आजघडीला विद्यार्थ्यांना तब्बल पाच महिन्यांच्या सुट्ट्या मिळाल्या आहेत.

ठळक मुद्देग्रामीण पालक चिंताग्रस्त । विद्यार्थी विचारताहेत प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा : गुरुजी! शाळा कधी सुरू होणार आहे ? असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांकडून शिक्षकांना विचारला जात आहे. शाळेप्रती आपुलकी व जिव्हाळा दाखवणारा हा प्रश्न. यंदा शाळेचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन ६५ दिवस पुर्ण झाले मात्र विद्यार्थ्यांना अजूनही शाळा प्रवेशबंदी कायम आहे. त्यामुळे शाळेतील शिक्षण बंद असल्याने विद्यार्थी बिनधास्त मात्र विद्यार्थ्यांच्या भविष्याने पालक अस्वस्थ झाले आहेत.विसोरा येथील शेकडो विद्यार्थी तथा पालकांशी प्रत्यक्ष भेट घेऊन कोरोनाने बंद असलेली शाळा पुन्हा सुरू झाल्यास आपण आपल्या पाल्यास शाळेत पाठवायला तयार आहात का यावर वातार्लाप केला असता विद्यार्थी, पालकांनी अगदी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. मार्च महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात सुरू झालेला कोरोना लॉकडॉऊन दिवसेंदिवस अनलॉक होत असला तरी शाळा त्याला अपवाद ठरत आहे. एकूणच आजघडीला विद्यार्थ्यांना तब्बल पाच महिन्यांच्या सुट्ट्या मिळाल्या आहेत. भविष्यात सुट्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येण्यासारखी परिस्थिती नाही. यादरम्यान विद्यार्थी शाळेतील शिक्षणापासून दूर आहे. ऑनलाईन शिक्षण चालू आहे पण त्यात ग्रामीण विद्यार्थी, पालक भरडले जात आहेत. वास्तवात पालक केवळ आणि केवळ ऑफलाईनला पसंती देत आहेत.शाळा बंद होऊन आज तब्बल दीडशे दिवसांचा कालावधी झाला आहे. आता विद्यार्थ्याला शाळेत जाण्याची उत्सुकता आहे. पालक सुद्धा सकारात्मक दिसून येतात. पण कोरोनामुळे विद्यार्थ्यांसाठी शाळा कधी सुरू होणार हे अनिश्चित आहे. संचारबंदी असल्याने बिनधास्त गावाबाहेर नातेवाईकांना भेटायला जाणे शक्य नाही. मुले-मुली घरच्या घरी खोडकरपणा करण्यात, खेळण्यात इतके बेभान झालेत कि ते आता आई-बाबा, आजी-आजोबा यांना ऐकत नाही अशा तक्रारी वाढू लागल्यात.परिणामी पालकांना विद्यार्थ्यांच्या भविष्याबद्दल काळजी वाटू लागली आहे. गावात, रस्त्यात, घराजवळ शिक्षक दिसताच विद्यार्थी सर, शाळा कधी सुरू होणार? असा प्रश्न करीत आहे.ऑनलाईन शिक्षणात खोडाकोरोनामुळे शाळांमधील वर्ग प्रत्यक्ष भरणे बंद आहे. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न शाळांकडून सुरू आहे. मात्र आरमोरी तालुक्यासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात इंटरनेटची गती नसल्याने ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेत अडचणी येत आहे.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी