शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांना आविसंचा घेराव

By admin | Updated: June 4, 2015 01:31 IST

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांचे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी विद्यार्थी संघाच्या सिरोंचा शाखेच्या वतीने बुधवारी सकाळी ....

सिरोंचा : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांचे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी विद्यार्थी संघाच्या सिरोंचा शाखेच्या वतीने बुधवारी सकाळी कारसपल्ली गावाजवळ पालकमंत्र्यांना हजारो कार्यकर्त्यांनी घेराव घातला. यावेळी खराब झालेल्या धानाचे पोते रस्त्यावर ठेऊन कार्यकर्ते ठिय्या देऊन होते. पालकमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा सिरोंचाकडे जात असताना कारसपल्ली येथे हे आंदोलन करण्यात आले. मात्र आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी पालकमंत्री आपल्या गाडीतूनही उतरले नाही. यामुळे पालकमंत्र्यांप्रती तीव्र नाराजी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे.पालकमंत्र्यांच्या वतीने कार्यकर्त्यांना समजविण्याचा प्रयत्न करणारे भाजपचे नेते प्रकाश गेडाम यांनाही आविसं कार्यकर्त्यांनी खडे बोल सुनावले. जवळजवळ १५ मिनीट हा वाहनाचा ताफा कारसपल्ली येथे थांबून राहिला. यावेळी पालकमंत्र्यांनी निवेदन घेण्याकरिता गाडीतून उतरण्याचे सौजन्य न दाखविल्याने आविसंचे शेकडो कार्यकर्ते संतप्त झालेत. पालकमंत्री व राज्य सरकारच्या धोरणाविरोधात नारेबाजीही करण्यात आली. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते.यावेळी आविसंचे तालुकाध्यक्ष बानय्या जनगाम, रवी बोगोंनी, नगराम, कंगाली, अशोक इंगीली, अशोक हरी, लक्ष्मण बोल्लो, ग्रा. पं. उपसरपंच सडवली कुम्मरी, वासु सपाट, सडवली जनगाम, रामु इंगीली, रामु अंबाला, व्यंकटीस्वामी, डॉ. श्रीनिवास गौयकोटी आदी उपस्थित होते. अहेरी विधानसभा क्षेत्रातील विविध समस्यांचे निराकरण करण्याबाबत शासन व पालकमंत्री यांच्याकडे वारंवार मागणी करण्यात येत आहे. या समस्यांची सोडवणूक न झाल्यास आदिवासी विद्यार्थी संघटनेकडून उपोषण, आंदोलन व मोर्चाही काढला जाईल, अशी माहिती आविसंचे तालुकाध्यक्ष बानय्या जनगाम यांनी यावेळी दिली. (तालुका प्रतिनिधी)