शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
3
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
4
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
5
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
6
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
7
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
8
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
9
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
10
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
11
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
12
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
13
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
14
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
15
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
16
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
17
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
18
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
19
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
20
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!

पालकमंत्र्यांना आविसंचा घेराव

By admin | Updated: June 4, 2015 01:31 IST

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांचे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी विद्यार्थी संघाच्या सिरोंचा शाखेच्या वतीने बुधवारी सकाळी ....

सिरोंचा : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांचे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी विद्यार्थी संघाच्या सिरोंचा शाखेच्या वतीने बुधवारी सकाळी कारसपल्ली गावाजवळ पालकमंत्र्यांना हजारो कार्यकर्त्यांनी घेराव घातला. यावेळी खराब झालेल्या धानाचे पोते रस्त्यावर ठेऊन कार्यकर्ते ठिय्या देऊन होते. पालकमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा सिरोंचाकडे जात असताना कारसपल्ली येथे हे आंदोलन करण्यात आले. मात्र आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी पालकमंत्री आपल्या गाडीतूनही उतरले नाही. यामुळे पालकमंत्र्यांप्रती तीव्र नाराजी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे.पालकमंत्र्यांच्या वतीने कार्यकर्त्यांना समजविण्याचा प्रयत्न करणारे भाजपचे नेते प्रकाश गेडाम यांनाही आविसं कार्यकर्त्यांनी खडे बोल सुनावले. जवळजवळ १५ मिनीट हा वाहनाचा ताफा कारसपल्ली येथे थांबून राहिला. यावेळी पालकमंत्र्यांनी निवेदन घेण्याकरिता गाडीतून उतरण्याचे सौजन्य न दाखविल्याने आविसंचे शेकडो कार्यकर्ते संतप्त झालेत. पालकमंत्री व राज्य सरकारच्या धोरणाविरोधात नारेबाजीही करण्यात आली. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते.यावेळी आविसंचे तालुकाध्यक्ष बानय्या जनगाम, रवी बोगोंनी, नगराम, कंगाली, अशोक इंगीली, अशोक हरी, लक्ष्मण बोल्लो, ग्रा. पं. उपसरपंच सडवली कुम्मरी, वासु सपाट, सडवली जनगाम, रामु इंगीली, रामु अंबाला, व्यंकटीस्वामी, डॉ. श्रीनिवास गौयकोटी आदी उपस्थित होते. अहेरी विधानसभा क्षेत्रातील विविध समस्यांचे निराकरण करण्याबाबत शासन व पालकमंत्री यांच्याकडे वारंवार मागणी करण्यात येत आहे. या समस्यांची सोडवणूक न झाल्यास आदिवासी विद्यार्थी संघटनेकडून उपोषण, आंदोलन व मोर्चाही काढला जाईल, अशी माहिती आविसंचे तालुकाध्यक्ष बानय्या जनगाम यांनी यावेळी दिली. (तालुका प्रतिनिधी)