शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ग्रा.पं.कडे सात कोटींचे वीज बिल थकीत

By admin | Updated: September 9, 2014 23:30 IST

वेळेवर न होणाऱ्या करवसुलीमुळे बहुतांश ग्रामपंचायती उधारवाडीवरच प्रशासनाचा गाडा हाकत असून पथदिव्यांचे वीज बिलही भरण्यासाठी पैसे राहत नसल्याने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे ७ कोटी १९ लाख

गडचिरोली : वेळेवर न होणाऱ्या करवसुलीमुळे बहुतांश ग्रामपंचायती उधारवाडीवरच प्रशासनाचा गाडा हाकत असून पथदिव्यांचे वीज बिलही भरण्यासाठी पैसे राहत नसल्याने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे ७ कोटी १९ लाख ५८ हजार ३७३ रूपये एवढे वीज बिल थकीत राहिले आहे. वीज वितरण कंपनीकडून याबाबत वेळोवेळी विचारणा करून सुद्धा वीज बिलाचा भरणा करण्यात आलेला नाही.ग्रामपंचायतीला केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजनांसाठी दरवर्षी लाखो रूपयांचा निधी प्राप्त होतो. मात्र सदर निधी संबंधित विकास कामावरच खर्च करण्याचे बंधन आहे. त्यामुळे सदर निधीचा उपयोग ग्रामपंचायत प्रशासन गावाच्या दैनंदिन गरजांसाठी वापरू शकत नाही. गृहकराच्या रूपात नागरिकांकडून गोळा झालेला पैसा पथदिव्यांचे वीज बिल भरणे, हातपंप दुरूस्ती करणे, गावातील नाल्यांचा उपसा करून गावात स्वच्छता राखणे आदी बाबींवर खर्च करता येतो. मात्र बहुतांश नागरिक गृहकराचा भरणा वेळेवर करत नसल्याने ग्रामपंचायत प्रशासन अडचणीत येते. जिल्ह्यातील आजही काही ग्रामपंचायतींची ५० टक्केपेक्षा कमी करवसुली झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाकडे पैसे नसल्याने दैनंदिन खर्च कसा करावा, असा प्रश्न ग्रामपंचायत प्रशासनासमोर निर्माण होतो. ग्रामपंचायतीच्या सेवेबाबत नेहमीच बोटे मोडणारे नागरिक गृहकर भरण्यास मात्र समोर येत नाही. एका ग्रामपंचायतीमध्ये चार ते पाच गावे समाविष्ट आहेत. प्रत्येक गावासाठी स्वतंत्र वीज कनेक्शन घेण्यात आला आहे. त्याचबरोबर काही ग्रामपंचायतींनाही स्वतंत्र वीज कनेक्शन आहे. असे एकूण जिल्हाभरातील १४१० वीज कनेक्शनचे ७ कोटी १९ लाख ५८ हजार ३७३ रूपयांचे वीज बिल थकले आहे. एका ग्रामपंचायतीकडे २० ते ३० हजार रूपयांपर्यंतचे वीज बिल थकीत आहेत. या ग्रामपंचायतींना चालू बिल भरण्याची सक्ती वीज वितरण कंपनीने केली आहे. त्यामुळे अनेक ग्रामपंचायती चालू वीजबिल भरून आपली पत सांभाळत आहेत. थकीत वीज बिल भरण्याबाबत वीज वितरण कंपनीने ग्रामपंचायत प्रशासनाशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र ग्रामपंचायतीकडे पैसाच नसल्याने थकीत बिल देण्यास टाळाटाळ करीत आहेत.गावातील पथदिवे एक दिवसही बंद राहिल्यास गावातील नागरिक सरपंच, ग्रामसेवक यांच्या नावाने ओरडतात. मात्र ग्रामपंचायतीकडे पैसेच नसल्याने पथदिवे लागणार कसे, असे शहाणपण एकाही नागरिकाला सूचत नाही. भविष्यात एखादी ग्रामपंचायतीला चालू बिलाचाही भरणा करणे अशक्य झाल्यास त्यावेळी मात्र गावातील पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडीत होण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय शिल्लक राहत नाही. त्यामुळे नागरिकांनी गृहकर भरणे आवश्यक झाले आहे. (नगर प्रतिनिधी)