शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणूक अतिशय चुरशीची होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:36 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क आरमोरी : जिल्ह्यातील राजकारणाचे केंद्रबिंदू म्हणून ओळख असलेल्या आरमोरी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका अतिशय चुरशीच्या होणार आहेत. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

आरमोरी : जिल्ह्यातील राजकारणाचे केंद्रबिंदू म्हणून ओळख असलेल्या आरमोरी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका अतिशय चुरशीच्या होणार आहेत. प्रमुख राजकीय पक्षांचे संलग्नित पॅनल व गट निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे गावागावांतील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. या वेळची निवडणूक ही अतिशय रंगतदार व चुरशीची होणार आहे.

निवडणुकीच्या निमित्ताने गावखेड्यात गटातटाचे राजकारण पुन्हा उफाळून आले आहे. या निवडणुकीत अनेक माजी सरपंचांसह गावातील अनेक दिग्गज उभे आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात नवखे उमेदवार पहिल्यांदाच ग्रामपंचायतची निवडणूक लढवीत आहेत. गावातील प्रमुख गट व पॅनलसाठी ही निवडणूक अतिशय अटीतटीची ठरणारी आहे. ग्रामपचायतींवर आपली निर्विवाद सत्ता मिळविण्यासाठी सगळ्यांचा खटाटोप सुरू आहे.

आरमोरी तालुक्यातील २१४ जागांसाठी ४९९ उमेदवार एकमेकांविरोधात दंड थोपटून उभे आहेत. निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून प्रचाराला प्रत्यक्ष सुरुवात झाली. आता शेवटच्या टप्प्यात प्रचार आल्याने उमेदवारांची घामाघूम वाढत चालली आहे.

ग्रामपंचायत हा ग्रामविकासाचा महत्त्वाचा पाया असल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व आहे. राजकीयदृष्ट्या विचार करता ग्रामपंचायत ही आपल्या गटाची व पक्षाशी संलग्नित असावी व गावातील ग्रामपंचायतीवर आपलेच वर्चस्व राहावे यासाठी राजकीय पक्ष प्रयत्न करीत आहेत.

तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या वैरागड, वडधा व त्याखालोखाल जोगीसाखरा येथील ग्रामंचायत निवडणुकीकडे सर्वांचे विशेष लक्ष लागले आहे. वैरागड येथील एका माजी सरपंचाच्या एकाच परिवारातील तीन उमेदवार ग्रामपंचायतची निवडणूक लढत आहेत. या ग्रामपंचायतमध्ये तीन पॅनल एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. जोगीसाखरा येथे एका राजकीय पक्षाचा तालुकाध्यक्ष निवडणूक लढवीत आहे. एकंदरीत प्रमुख राजकीय पक्षाचे गावातील प्रमुख पदाधिकारी पॅनल उभे करून निवडणूक लढवीत आहेत. अनेक कार्यकर्ते निवडणूक रिंगणात आहेत.

बाॅक्स...

गावाच्या विकासाचा जाहीरनामा प्रसिद्ध

- लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा राजकीय पक्ष जसा निवडणूक जाहीरनामा काढतात तसाच जाहीरनामा गावाच्या विकासासंदर्भात अनेक प्रमुख गावांत काढण्यात आला आहे. काहींनी वर्षभराचे गृहकर भरण्यापासून तर गावात पिण्याचे शुद्ध पाणी, नळ जोडणी, नाल्या, रस्ते, स्वच्छता यावर भर देऊ, असे आश्वाासन गावकऱ्यांना देत आहेत. या निवडणुकीत असे आश्वासन कितपत प्रभावी ठरते हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

- ग्रामपंचायतचे प्रभाग लहान राहत असल्याने प्रत्येक मताला महत्त्व असते. त्यामुळे आपल्या माणसाची मते वाया जाऊ नयेत म्हणून उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते प्रयत्नात आहेत. गावांमधील अनेक लोक कामाच्या शोधात बाहेरगावी मिरची तोडण्यासाठी गेले आहेत. त्यांनाही मतदानासाठी आणण्याचा प्रयत्न उमेदवार करीत आहेत. मतदार यादीत नाव आहे पण ज्या मुली लग्न होऊन सासरी गेल्या व जे मतदार बाहेरगावी राहतात त्यांना शेवटच्या टप्प्यात मतदानाला आणण्यासाठी उमेदवार प्रयत्न करीत आहेत.