शहरं
Join us  
Trending Stories
1
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली ठाकरे बंधूंची खिल्ली
2
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
3
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
4
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
5
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
6
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
7
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
8
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
9
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
10
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
11
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
12
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
13
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
14
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
15
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
16
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
17
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
18
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
19
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
20
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?

ग्रामपंचायत निवडणूक अतिशय चुरशीची होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:36 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क आरमोरी : जिल्ह्यातील राजकारणाचे केंद्रबिंदू म्हणून ओळख असलेल्या आरमोरी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका अतिशय चुरशीच्या होणार आहेत. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

आरमोरी : जिल्ह्यातील राजकारणाचे केंद्रबिंदू म्हणून ओळख असलेल्या आरमोरी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका अतिशय चुरशीच्या होणार आहेत. प्रमुख राजकीय पक्षांचे संलग्नित पॅनल व गट निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे गावागावांतील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. या वेळची निवडणूक ही अतिशय रंगतदार व चुरशीची होणार आहे.

निवडणुकीच्या निमित्ताने गावखेड्यात गटातटाचे राजकारण पुन्हा उफाळून आले आहे. या निवडणुकीत अनेक माजी सरपंचांसह गावातील अनेक दिग्गज उभे आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात नवखे उमेदवार पहिल्यांदाच ग्रामपंचायतची निवडणूक लढवीत आहेत. गावातील प्रमुख गट व पॅनलसाठी ही निवडणूक अतिशय अटीतटीची ठरणारी आहे. ग्रामपचायतींवर आपली निर्विवाद सत्ता मिळविण्यासाठी सगळ्यांचा खटाटोप सुरू आहे.

आरमोरी तालुक्यातील २१४ जागांसाठी ४९९ उमेदवार एकमेकांविरोधात दंड थोपटून उभे आहेत. निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून प्रचाराला प्रत्यक्ष सुरुवात झाली. आता शेवटच्या टप्प्यात प्रचार आल्याने उमेदवारांची घामाघूम वाढत चालली आहे.

ग्रामपंचायत हा ग्रामविकासाचा महत्त्वाचा पाया असल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व आहे. राजकीयदृष्ट्या विचार करता ग्रामपंचायत ही आपल्या गटाची व पक्षाशी संलग्नित असावी व गावातील ग्रामपंचायतीवर आपलेच वर्चस्व राहावे यासाठी राजकीय पक्ष प्रयत्न करीत आहेत.

तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या वैरागड, वडधा व त्याखालोखाल जोगीसाखरा येथील ग्रामंचायत निवडणुकीकडे सर्वांचे विशेष लक्ष लागले आहे. वैरागड येथील एका माजी सरपंचाच्या एकाच परिवारातील तीन उमेदवार ग्रामपंचायतची निवडणूक लढत आहेत. या ग्रामपंचायतमध्ये तीन पॅनल एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. जोगीसाखरा येथे एका राजकीय पक्षाचा तालुकाध्यक्ष निवडणूक लढवीत आहे. एकंदरीत प्रमुख राजकीय पक्षाचे गावातील प्रमुख पदाधिकारी पॅनल उभे करून निवडणूक लढवीत आहेत. अनेक कार्यकर्ते निवडणूक रिंगणात आहेत.

बाॅक्स...

गावाच्या विकासाचा जाहीरनामा प्रसिद्ध

- लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा राजकीय पक्ष जसा निवडणूक जाहीरनामा काढतात तसाच जाहीरनामा गावाच्या विकासासंदर्भात अनेक प्रमुख गावांत काढण्यात आला आहे. काहींनी वर्षभराचे गृहकर भरण्यापासून तर गावात पिण्याचे शुद्ध पाणी, नळ जोडणी, नाल्या, रस्ते, स्वच्छता यावर भर देऊ, असे आश्वाासन गावकऱ्यांना देत आहेत. या निवडणुकीत असे आश्वासन कितपत प्रभावी ठरते हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

- ग्रामपंचायतचे प्रभाग लहान राहत असल्याने प्रत्येक मताला महत्त्व असते. त्यामुळे आपल्या माणसाची मते वाया जाऊ नयेत म्हणून उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते प्रयत्नात आहेत. गावांमधील अनेक लोक कामाच्या शोधात बाहेरगावी मिरची तोडण्यासाठी गेले आहेत. त्यांनाही मतदानासाठी आणण्याचा प्रयत्न उमेदवार करीत आहेत. मतदार यादीत नाव आहे पण ज्या मुली लग्न होऊन सासरी गेल्या व जे मतदार बाहेरगावी राहतात त्यांना शेवटच्या टप्प्यात मतदानाला आणण्यासाठी उमेदवार प्रयत्न करीत आहेत.