शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

ग्रामपंचायत निवडणूक अतिशय चुरशीची होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:36 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क आरमोरी : जिल्ह्यातील राजकारणाचे केंद्रबिंदू म्हणून ओळख असलेल्या आरमोरी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका अतिशय चुरशीच्या होणार आहेत. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

आरमोरी : जिल्ह्यातील राजकारणाचे केंद्रबिंदू म्हणून ओळख असलेल्या आरमोरी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका अतिशय चुरशीच्या होणार आहेत. प्रमुख राजकीय पक्षांचे संलग्नित पॅनल व गट निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे गावागावांतील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. या वेळची निवडणूक ही अतिशय रंगतदार व चुरशीची होणार आहे.

निवडणुकीच्या निमित्ताने गावखेड्यात गटातटाचे राजकारण पुन्हा उफाळून आले आहे. या निवडणुकीत अनेक माजी सरपंचांसह गावातील अनेक दिग्गज उभे आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात नवखे उमेदवार पहिल्यांदाच ग्रामपंचायतची निवडणूक लढवीत आहेत. गावातील प्रमुख गट व पॅनलसाठी ही निवडणूक अतिशय अटीतटीची ठरणारी आहे. ग्रामपचायतींवर आपली निर्विवाद सत्ता मिळविण्यासाठी सगळ्यांचा खटाटोप सुरू आहे.

आरमोरी तालुक्यातील २१४ जागांसाठी ४९९ उमेदवार एकमेकांविरोधात दंड थोपटून उभे आहेत. निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून प्रचाराला प्रत्यक्ष सुरुवात झाली. आता शेवटच्या टप्प्यात प्रचार आल्याने उमेदवारांची घामाघूम वाढत चालली आहे.

ग्रामपंचायत हा ग्रामविकासाचा महत्त्वाचा पाया असल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व आहे. राजकीयदृष्ट्या विचार करता ग्रामपंचायत ही आपल्या गटाची व पक्षाशी संलग्नित असावी व गावातील ग्रामपंचायतीवर आपलेच वर्चस्व राहावे यासाठी राजकीय पक्ष प्रयत्न करीत आहेत.

तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या वैरागड, वडधा व त्याखालोखाल जोगीसाखरा येथील ग्रामंचायत निवडणुकीकडे सर्वांचे विशेष लक्ष लागले आहे. वैरागड येथील एका माजी सरपंचाच्या एकाच परिवारातील तीन उमेदवार ग्रामपंचायतची निवडणूक लढत आहेत. या ग्रामपंचायतमध्ये तीन पॅनल एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. जोगीसाखरा येथे एका राजकीय पक्षाचा तालुकाध्यक्ष निवडणूक लढवीत आहे. एकंदरीत प्रमुख राजकीय पक्षाचे गावातील प्रमुख पदाधिकारी पॅनल उभे करून निवडणूक लढवीत आहेत. अनेक कार्यकर्ते निवडणूक रिंगणात आहेत.

बाॅक्स...

गावाच्या विकासाचा जाहीरनामा प्रसिद्ध

- लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा राजकीय पक्ष जसा निवडणूक जाहीरनामा काढतात तसाच जाहीरनामा गावाच्या विकासासंदर्भात अनेक प्रमुख गावांत काढण्यात आला आहे. काहींनी वर्षभराचे गृहकर भरण्यापासून तर गावात पिण्याचे शुद्ध पाणी, नळ जोडणी, नाल्या, रस्ते, स्वच्छता यावर भर देऊ, असे आश्वाासन गावकऱ्यांना देत आहेत. या निवडणुकीत असे आश्वासन कितपत प्रभावी ठरते हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

- ग्रामपंचायतचे प्रभाग लहान राहत असल्याने प्रत्येक मताला महत्त्व असते. त्यामुळे आपल्या माणसाची मते वाया जाऊ नयेत म्हणून उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते प्रयत्नात आहेत. गावांमधील अनेक लोक कामाच्या शोधात बाहेरगावी मिरची तोडण्यासाठी गेले आहेत. त्यांनाही मतदानासाठी आणण्याचा प्रयत्न उमेदवार करीत आहेत. मतदार यादीत नाव आहे पण ज्या मुली लग्न होऊन सासरी गेल्या व जे मतदार बाहेरगावी राहतात त्यांना शेवटच्या टप्प्यात मतदानाला आणण्यासाठी उमेदवार प्रयत्न करीत आहेत.