शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

राज्यात कोरोनामुळे रखडललेल्या ग्रामपंचायत निवडणुका होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 6:37 PM

राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये कोरोनामुळे रखडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांची प्रक्रिया आता पूर्ण करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने परिस्थितीची चाचपणी सुरू केली आहे.

ठळक मुद्देनिवडणूक आयोगाकडून चाचपणी१९ जिल्ह्यात मुदत संपली

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये कोरोनामुळे रखडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांची प्रक्रिया आता पूर्ण करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने परिस्थितीची चाचपणी सुरू केली आहे. ज्या गावांमधील निवडणूक प्रक्रिया थांबली आहे त्या गावांमध्ये कोरोनाची काय स्थिती आहे याची विचारणा निवडणूक आयोगाने संबंधित जिल्ह्यांकडे केली आहे.एप्रिल ते जून २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित १५६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम फेब्रुवारी महिन्यातच जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार प्रक्रियाही सुरू झाली होती. १७ मार्च रोजी उमेदवारांच्या अर्जांची छाननी होत असताना सदर प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत आहे त्या स्थितीत ठेवण्याचा आदेश धडकला. दरम्यान कोरोना लवकर आटोक्यात येणार नाही हे लक्षात आल्याने निवडणुकीची आचारसंहिता हटवून संबंधित ग्रामपंचायतींवर प्रशासकांचीही नियुक्ती करण्यात आली.

आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यासंदर्भात शासनाकडून वेळोवेळी निर्देश मिळाल्याने सद्यस्थितीचा अंदाज घेऊन रखडलेल्या ग्रामपंचायत निवडणुका घेण्याचे विचाराधीन असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने संबंधित सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळविले आहे.आता कोणत्या ग्रामपंचायतींच्या हद्दीत कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आहे, कुठे मतदान घेणे शक्य आहे याबाबतचा विस्तृत अहवाल २१ सप्टेंबरपर्यंत सादर करण्याची सूचना निवडणूक आयोगाने केली आहे.

या जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतींचा समावेशग्रामपंचायतींमधील निवडणूक प्रक्रिया अर्धवट स्थितीत थांबलेल्या जिल्ह्यांमध्ये राज्यभरातील १९ जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यात विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, नागपूर, वर्धा व गडचिरोली तसेच बाकी भागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार, पुणे, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक