शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

१0 तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक

By admin | Updated: May 30, 2014 23:44 IST

गडचिरोली : मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक आणि राजीनामा सत्रामुळे रिक्त झालेल्या ग्रा. पं. सदस्यांच्या जागेसाठी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा

गडचिरोली : मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक आणि राजीनामा सत्रामुळे रिक्त झालेल्या ग्रा. पं. सदस्यांच्या जागेसाठी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार जिल्ह्यातील १0 तालुक्यात २ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक व ९७ ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. एकूण ९७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी २२ जून रोजी मतदान होणार आहे. अहेरी तालुक्यातील येडमपल्ली व रेंगुलवाही या दोन ग्रामपंचायतीचे सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या दोन्ही ग्रामपंचायतीची मुदत जुलै व सप्टेंबर महिन्यात संपुष्टात येणार आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता २६ मेपासून आयोगाने लागू केली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ४ ते ७ जून या कालावधीत नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्यांच्या कारवाया लक्षात घेता सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ग्रा. पं. निवडणुकीच्या मतदानाची वेळ सकाळी ७.३0 ते दुपारी ३ वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यात ९७ ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणूक होत आहे. यात कोरची तालुक्यातील मोठा झेलीया यांच्यासह  कुरखेडा तालुक्यातील ८ ग्रामपंचायत, देसाईगंज ६, आरमोरी  ६, गडचिरोली ६, मुलचेरा १0, धानोरा १६, एटापल्ली २३ व अहेरी तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका होणार आहेत. जुन महिन्यात भामरागड व चामोर्शी तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका होणार नाही. या तालुक्यातील ग्रा. पं. ची मुदत संपुष्टात आली नाही. तसेच या तालुक्यात राजीनामेही नाही. मात्र १0 तालुक्यात नक्षल कारवायांची सावट अधिक राहत असल्याने भीतीपोटी अनेक ग्रा. पं. सदस्यांनी राजीनामे दिलेत. परिणामी ग्रा. पं. च्या जागा रिक्त झाल्या. दुर्गम भागात लोकशाही कमकुवत करण्याचा प्रयत्न नक्षली नेहमी करतात. (स्थानिक प्रतिनिधी)