शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
4
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
5
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
6
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
7
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
8
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
10
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
11
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
12
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
13
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
14
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
15
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
16
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
17
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
18
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
19
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
20
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश

मार्च महिन्याचे धान्य वितरण ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:37 IST

गडचिराेली, धानाेरा : स्वस्त धान्य वितरणच्या साॅफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला असल्याने मार्च महिना अर्धा संपूनही अजूनपर्यंत धान्याचे वितरण ...

गडचिराेली, धानाेरा : स्वस्त धान्य वितरणच्या साॅफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला असल्याने मार्च महिना अर्धा संपूनही अजूनपर्यंत धान्याचे वितरण करण्यात आले नाही. त्यामुळे गाेरगरिबांवर उपासमारीचे संकट काेसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

स्वस्त धान्य वितरणातील काळाबाजार थांबविण्यासाठी शासनाने मागील काही वर्षांपासून धान्य वितरणाची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक दुकानदाराला पाॅस मशीन देण्यात आली आहे. पाॅस मशीनवर संबंधित लाभार्थीचा थम्ब घेतल्यानंतरच धान्य वितरण केले जाते. संबंधित कार्डावर किती धान्य आहे, तसेच धान्याची किंमत किती रुपये झाली, याचे ऑनलाइन बिल पाॅस मशीनमधून निघते. त्यामुळे दुकानदाराला तेवढे धान्य द्यावेच लागते.

पाॅस मशीनमुळे धान्य वितरणातील काळाबाजारावर बराच अंकुश आला आहे. मात्र ही मशीन व साॅफ्टवेअर काम करीत नसल्यास धान्य वितरणात अडचणी निर्माण हाेतात. धान्य वितरणासाठी तयार केलेल्या साॅफ्टवेअरमध्ये मागील १५ दिवसांपासून काही तांत्रिक बिघाड निर्माण झाले आहेत. त्यामुळे अर्धा मार्च महिना उलटूनही धान्याचे वितरण झाले नाही. तालुकास्तरावरील गुदामावरून धान्य दुकानात धान्य पाेहाेचले आहे. मात्र तेवढ्या धान्याची नाेंद पाॅस मशीनवर ऑनलाइन पद्धतीने झाली नाही. त्यामुळे दुकानदारांनी अजूनपर्यंत धान्याच्या वितरणाला सुरुवात केली नाही. अनेक गरीब कुटुंब स्वस्त धान्य दुकानातूनच मिळणारे धान्य खातात. मात्र १५ दिवसांपासून धान्य मिळाले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीचे संकट काेसळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच नागरिकांच्या राेषाचा सामना दुकानदारांना करावा लागत आहे. तांत्रिक बिघाड तत्काळ दुरुस्त करावा, अशी मागणी हाेत आहे.

बाॅक्स...

नवीन पाॅस मशीन द्या

धानाेरा तालुक्यात एकूण १२६ स्वस्त धान्य दुकाने आहेत. त्यातील काही मशीन बिघडल्या आहेत, तर काही मशीन व्यवस्थित काम करीत नाहीत. त्यामुळे धान्य वितरणात अडचणी निर्माण हाेतात. नवीन मशीनचा पुरवठा करावा, अशी मागणी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष जाकीर कुरेशी, तालुका सचिव नरेंद्र उईके, तालुका उपाध्यक्ष सुनीता झंझाळ, प्रमिला गावडे, समीर कुरेशी, जमील शेख, रामचंद्र हलामी, जगन्नाथ राजगडे, अनिल दळांजे यांनी केली आहे.