शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

गोंविद पानसरे हल्लाप्रकरण : विविध समाजिक संघटनांचा तीव्र संताप पुरोगामी अभिव्यक्तीच्या मुस्कटदाबीचा निषेध

By admin | Updated: February 17, 2015 01:44 IST

आरमोरी : १६ फेब्रुवारी रोजी सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास कोल्हापूर येथे भाडोत्री

आरमोरी : १६ फेब्रुवारी रोजी सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास कोल्हापूर येथे भाडोत्री हल्लेखोरांनी पुरोगामी विचारवंत तथा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर गोळ्या झाडल्या. भाकपाचे जिल्हा महासचिव डॉ. महेश कोपुलवार यांच्या नेतृत्वात, या भ्याड हल्ल्याचा भाकपाच्या वतीने आरमोरी येथे चक्काजाम व निदर्शने करून निषेध केला. तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले. निवेदनात गोविंद पानसरे यांच्या हल्ल्यातील आरोपी व मुख्य सुत्रधारांना तत्काळ अटक करण्याची मागणी भाकपाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. यावेळी निवेदन देतांना देवराव चवळे, जि. प. सदस्य अमोल मारकवार, हिरालाल येरमे, अ‍ॅड. जगदिश मेश्राम, हर्षवर्धन कार, प्रदीप नागन्ना, सुकरू घरत, अनिल चहांदे, बाळकृष्ण पेंदाम, चंद्रभान मेश्राम, डंबाजी नरूले, संजय चरडुके, रमेश मेश्राम, विनोद झोडगे, एकनाथ मेश्राम, विशाल दामपल्लीवार, सरपंच शालू इंदूरकर यांच्यासह चक्काजाम आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. विचारांना संपविण्याचे प्रतिगाम्यांचे षड्यंत्र- रमेशचंद्र दहीवडे पुरोगामी विचारांचा वैचारिकदृष्ट्या आपण पराभव करू शकत नाही. हे सनातण्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी विचारवंतांनाच संपविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. नरेंद्र दाभोळकर यांच्या मारेकऱ्यांना एक वर्षाचा कालावधी लोटूनही पोलिसांनी अटक केली नाही. त्यामुळे गुंडांची हिंमत वाढत चालली आहे. या वाढलेल्या हिंमतीतूनच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा विचारवंत गोविंद पानसरे यांच्यावर केलेला हल्ला हा अत्यंत निंदनीय प्रकार आहे. पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात नेमके काय घडत आहे, हे कळायला मार्ग नाही. मारेकऱ्यांना तत्काळ अटक करावी. अशोभनीय कृत्य- नामदेव उसेंडी पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात सर्वधर्म समभाव जोपासणारे काही बोटावर मोजणारे विचारवंत आहेत. सनातणी विचारांनी बरबटलेल्या लोकांचे हे अत्यंत निंदणीय कृत्य आहे. हे महाराष्ट्राला मागे नेण्याचे फार मोठे षडयंत्र आहे. या प्रकाराची जेवढी निंदा केली तेवढे कमी आहे. सरंजामदारांचा भ्याड हल्ला- महेश कोपुलवार प्रतीगामी आणि सरंजामदारांच्या भ्याड गुंडांनी केलेल्या या हल्ल्याचा आपण निषेध करीत आहो. अ‍ॅड. गोविंद पानसरे व उमा पानसरे यांनी सदैव पुरोगामी विचारांचा प्रसार केला. त्यांच्यावर झालेला हा हल्ला भांडवलदार व्यवस्थेने केला आहे. शासनाने तत्काळ मारेकरी शोधून त्यांना कडक शिक्षा द्यावी पुरोगामी चळवळीवरील हल्ला - रोहिदास राऊत नरेंद्र दाभोळकर यांचे मारेकरी अजुनही मिळाले नाही. ते शोधणे पोलिसांसमारे आव्हान असतानाच पानसरे यांच्यावर हल्ला झाला. त्यांच्यावरील हल्ला म्हणजे समतावादी पुरोगामी चळवळीवरील हल्ला आहे. राज्य व देशाचे सामाजिक वातावरण बिघडविण्याच्या हेतूने हे हल्ले होत आहेत. पानसरे यांच्या मारेकऱ्यांना शोधून त्यांना कडक शिक्षा द्यावी.