शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

गोरगरिबांच्या घरातील चुली पेटण्याची व्यवस्था करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 13:05 IST

गोरगरीबांना महिनाभराचे धान्य आणि ५०० रुपये सानुग्रह मदत देऊन त्यांच्या घरात चूल पेटविण्याची व्यवस्था करणार, अशी माहिती राज्याचे मदत, पुनर्वसन व बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोलीत ‘लोकमत’शी बोलताना दिली.

ठळक मुद्देसरकार देणार महिनाभराचे धान्य

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोनाच्या राष्ट्रीय आपत्तीला तोंड देताना संपूर्ण व्यवहार ठप्प पडल्याने गोरगरीबांच्या घरातील चुली कशा पेटणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. पण सरकार म्हणून आम्ही आरोग्य सेवेसोबत गोरगरीबांना महिनाभराचे धान्य आणि ५०० रुपये सानुग्रह मदत देऊन त्यांच्या घरात चूल पेटविण्याची व्यवस्था करणार, अशी माहिती राज्याचे मदत, पुनर्वसन व बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोलीत ‘लोकमत’शी बोलताना दिली.कोरोनाच्या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक व्यवहारांवर आलेल्या निर्बंधामुळे मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागणार आहे. यात सर्वाधिक फटका गोरगरीबांना बसणार असून त्यांच्यापुढे जगण्याचा प्रश्न उभा ठाकणार आहे. अशा स्थितीत त्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांच्या घरातील चुली पेटण्यासाठी महिनाभराचे धान्य त्यांच्या घरपोच देण्याची व्यवस्था करू. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आणखी काय-काय मदत देता येईल याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे ना.वडेट्टीवार म्हणाले.कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी शासन-प्रशासनाकडून केल्या जात असलेल्या उपाययोजनांना सर्व नागरिकांनी सहकार्य करावे. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी सर्वांनी आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करून योग्य ती खबरदारी घेतल्यास या संकटावर मात करता येईल, असे ते म्हणाले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार