शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

शेणखताला सोन्याचे दिवस, शेतात १ ट्रॅक्टर टाकायला मोजा २ हजार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2024 15:57 IST

Gadchiroli : पशुधन घटल्याने आता शेणखताला सोन्याचे दिवस

लोकमत न्यूज नेटवर्क चामोर्शी : आधीच दुष्काळी परिस्थिती, त्यात पशुधन घटल्याने आता शेणखतालाही सोन्याचे दिवस आले आहेत. शेतीसाठी महत्त्वाचा घटक असलेल्या शेणखताचे दर प्रतिट्रॅक्टर ट्राली दोन हजार रुपयांपर्यंत वाढल्याने शेतकऱ्यांसमोर अडचण निर्माण झाली आहे. शेतीसाठी लागणारे शेणखत महागल्याने जमिनीचा पोत टिकवून ठेवण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे.

शेतकऱ्यांकडील पशुधन पूर्वीच्या तुलनेत कमी झाल्याने शेतीमध्ये शेणखताचा वापर कमी झाला आहे. परिणामी, रासायनिक खतांमुळे जमिनीचा पोत खालावत चालला आहे. सद्यःस्थितीत दोन हजार ट्रॉलीने खत मिळत आहे. ग्रामीण भागात पशुधन कमी झाल्याने शेणखताचा तुटवडा निर्माण झाला. सध्या उन्हाचा कडाका, तर दुसरीकडे शेतकरी रब्बी संपवून शेती मशागत करून खरिपाची तयारी करीत आहेत. सध्या शेतात ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेणखत टाकण्याच्या धावपळीत आहेत. जनावरांची संख्या कमी झाल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. पैसे देऊनही चांगले शेणखत मिळत नसल्याचे जाणकार शेतकरी सांगत आहेत.

जमिनीला रासायनिक खतांचा अतिरेक होत असून, वर्षभरात दोन पिके घेतली जातात. त्यामुळे जमीन कसदार राहण्यासाठी शेणखत उपयुक्त आहे. मात्र, पशुधनाची संख्या कमी झाल्यामुळे शेणखताची टंचाई निर्माण होत आहे. तालुक्यातील काही मोजके शेतकरी सेंद्रीय शेती करताना दिसून येत आहेत. खरीप हंगामात तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी सेंद्रीय पद्धतीने शेती करून धानाचे उत्पादन घेतले.

वाढत्या किमतीमुळे शेतकरी जनावरे पाळणे बंद केल्याने जनावराची संख्या कमी झाली आहे. शेणखतही दुर्मीळ होत असून चांगले शेणखत मिळत नाही. पर्याय नसल्याने रासायनिक खत वापरावे लागते. त्यामुळे जमिनीचा दर्जा, पोत घसरत आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होत आहे.- विश्वनाथ सोमनकर, शेतकरी, चामोर्शी

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीAgriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेती